शहरं
Join us  
Trending Stories
1
iPhone 17 सीरीजचे चार नवे मॉडेल्स लॉन्च, Pro Motion डिस्प्लेसह यांत काय-काय आहे खास? जाणून घ्या
2
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
3
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
4
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
5
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
6
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
7
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
8
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
9
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
10
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
11
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
12
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
13
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
14
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
15
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
16
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
17
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
18
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
19
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?

आरटीई ७९७ प्रवेश रद्द १६५९ मुलांना मिळाला प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 05:00 IST

जिल्ह्यात आरटीई अंतर्गत आतापर्यंत २ हजार ४५६ पैकी १,६५९ प्रवेश निश्चित झाले आहेत. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यातील २४३ शाळांत आरटीईच्या २,४८६ जागांसाठी ९००३ अर्ज प्राप्त झाले. त्यातील सोडतीच्या पहिल्या फेरीत २,३५० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली. त्यापैकी आतापर्यंत केवळ १,६५९ पाल्यांचे प्रवेश निश्चित झालेत. निवड यादीतील प्रवेशासंदर्भात शिक्षण विभागाकडे जवळपास ३० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विभागाने तक्रारीचे अनुषंगाने निवड यादीतील ३० पालकांची तपासणी केली असता, २ तक्रारींचा निपटारा करण्यात आला.

ठळक मुद्देशिक्षण हक्क कायदा : नऊ हजार तीन विद्यार्थ्यांचे अर्ज

जितेंद्र दखने ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात आरटीई अंतर्गत आतापर्यंत २ हजार ४५६ पैकी १,६५९ प्रवेश निश्चित झाले आहेत. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यातील २४३ शाळांत आरटीईच्या २,४८६ जागांसाठी ९००३ अर्ज प्राप्त झाले. त्यातील सोडतीच्या पहिल्या फेरीत २,३५० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली. त्यापैकी आतापर्यंत केवळ १,६५९ पाल्यांचे प्रवेश निश्चित झालेत. निवड यादीतील प्रवेशासंदर्भात शिक्षण विभागाकडे जवळपास ३० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विभागाने तक्रारीचे अनुषंगाने निवड यादीतील ३० पालकांची तपासणी केली असता, २ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. निवड यादीतील २८ जणांच्या तपासणीपैकी २२ पाल्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले. याशिवाय प्रतीक्षा यादीतील ५४ पालकांची तपासणी केली असता, त्यातील ३० पाल्यांचे प्रवेश विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आले. शिक्षण विभागामार्फत आरटीई अंतर्गत आथिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, दिव्यांग प्रवर्गातील पात्र बालकांना इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत पहिलीत एकूण प्रवेशित संख्येपैकी २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो. यंदा कोरोना विषाणू संसर्गामुळे मोफत प्रवेश प्रक्रियादेखील प्रभावित झाली. मार्च महिन्यात पुणे येथे पहिली सोडत काढण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील २३५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात केल्यानुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र या मुदतीत सोडतीतील २३५० पैकी १६५९ बालकांचेच प्रवेश झाले. काहींचे प्रवेश विविध कारणांमुळे होऊ शकले नाही. त्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, यामध्ये अद्याप एकही प्रवेश झालेला नाही.आरटीई प्रवेश प्रक्रियेसंदर्भात पालकाकडून शिक्षण विभागाकडे ३० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी २ तक्रारींचा निपटारा झाला. उर्वरित २८ तक्रारींची पडताळणी करून २२ पाल्यांचे प्रवेश रद्द झाले. प्रतीक्षा यादीतील ५४ पालकांची तपासणी केली असता, यात दोषी ३० पाल्यांचे प्रवेश रद्दची कारवाई सीईओंच्या मार्गदर्शनात करण्यात आली.२४५६ पैकी १६५९ विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला. प्रतीक्षा यादीतील प्रवेशप्रक्रिया २३ ऑक्टोबरपर्यंत राबविली जाईल. सीईओंच्या आदेशानुसार पात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम ठेवून अपात्र विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले आहेत.- ई.झेड खान, शिक्षणाधिकारी

टॅग्स :Educationशिक्षण