शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

दर्यापुरात उडाले मंगल कार्यालयाचे छत; पडझडीत 50 वऱ्हाडी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST

मूर्तिजापूर रोडवरील या मंगल कार्यालयात दर्यापूर येथील खोलापुरी गेट परिसरातील माणिकराव सोळंके यांच्या मुलीचा विवाह चिंचखेड (ता. भातकुली) येथील दिवाकर खानंदे यांच्या मुलाशी वैभव मंगल कार्यालयात बुधवारी झाला. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास जेवणावळी सुरू असतानाच वादळी पावसाने मंगल कार्यालयाचे टिनपत्रे उडाली. या टिनपत्र्यांचा डोम कोसळल्याने  भिंतीच्या विटा काही उपस्थित लोकांच्या अंगावर पडल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : शहरातील वैभव मंगल कार्यालयाच्या टिनपत्र्याच्या छताची लोखंडी कैची बुधवारी दुपारी वादळी पावसाने उडाली. यामुळे टीनपत्रे इतस्त: विखुरली, तर विटा, काँक्रिटच्या ढिगाऱ्यासह काही टिनपत्रे लग्न सोहळ्यातील वऱ्हाडींवर कोसळली. यात तब्बल ५० जण जखमी झाले असून, सात जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वऱ्हाडींनी परिसरात ठेवलेल्या अनेक दुचाकींचाही चुराडा झाला आहे. मूर्तिजापूर रोडवरील या मंगल कार्यालयात दर्यापूर येथील खोलापुरी गेट परिसरातील माणिकराव सोळंके यांच्या मुलीचा विवाह चिंचखेड (ता. भातकुली) येथील दिवाकर खानंदे यांच्या मुलाशी वैभव मंगल कार्यालयात बुधवारी झाला. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास जेवणावळी सुरू असतानाच वादळी पावसाने मंगल कार्यालयाचे टिनपत्रे उडाली. या टिनपत्र्यांचा डोम कोसळल्याने  भिंतीच्या विटा काही उपस्थित लोकांच्या अंगावर पडल्या.  पाऊस थांबताच आणि मंगल कार्यालयाची माहिती वाऱ्यासारखी पसरताच शहरातील नागरिक व रुग्णसेवक धावून गेले. 

दोघे जिल्हा सामान्य रुग्णालयातअमोल गवळी (रा. वाठोंडा हिंमतपूर. ता. दर्यापूर) व रंगराव भाकरे (रा. विश्रोळी, ता. चांदूर बाजार) या दोघांना छातीवर विटांचा मार लागल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

जखमींमध्ये दोन वर्षांचा चिमुकलाउपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलेल्या जखमींमध्ये प्रकाश दाभेकर, देवीदास तेलखडे, श्रीकांत काळपांडे, रोहित तसरे, अंकित ठाकरे, नवल ठाकरे, ऋतिक ठाकरे, श्रीकृष्ण दाभेकर , पांडुरंग तेलखडे, पवन सपाटे, चरणदास ठाकरे, मालू खानंदे, पायल राठोड, संजय राठोड, वेणू चक्रे, सुरेंद्र सोळंके आदींचा समावेश आहे. दोन वर्षांचा चिमुकला बिट्टू कांबळे गंभीर जखमी झाला आहे. इतरांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सर्वांची बाहेर पडण्याची धडपडटिनपत्रे मंगल कार्यालयात कोसळल्याने लग्न सोहळ्यामध्ये एकच धावपळ उडाली. सर्वच जण वाट दिसेल तिकडे धावत होते. काही वेळानंतर वारे शांत झाल्याने व पाऊस थांबल्याने जखमींना प्रथमोपचार देण्यात आले. 

१० मिनिटातच आनंदावर विरजण 

लग्नसोहळ्याला उपस्थित वऱ्हाडींमध्ये पाऊसपाण्याचीच चर्चा झडत असताना वादळी वाऱ्यांसोबत पाऊस त्यांच्या पुढ्यात दाखल झाला आणि पुढच्या अवघ्या १० मिनिटात मंगल कार्यालयातील आनंद सोहळ्याला गदारोळात पालटून निघून गेला.  

 

टॅग्स :Rainपाऊस