शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो मजुरांना कोरडा दिलासा !

By admin | Updated: April 18, 2015 01:05 IST

यावर्षी पडलेल्या कोरड्या दुष्काळामुळे ग्रामीण नागरिकांची रोजगारासाठी धडपड सुरू आहे.

मंगेश भांडेकर चंद्रपूरयावर्षी पडलेल्या कोरड्या दुष्काळामुळे ग्रामीण नागरिकांची रोजगारासाठी धडपड सुरू आहे. अशातच रोजगार हमी योजनेची कामे प्रत्येक ग्राम पंचायतस्तरावर सुरू करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यावर्षी दुष्काळ पडूनही रोहयोच्या मजुरीत शासनाने नाममात्र १३ रूपयांची वाढ केली. या वाढीव दरानुसार नव्या आर्थिक वर्षात मजूरी मिळणार असून शासनाने आमची थट्टा केल्याचा आरोप मजुरांकडून होत आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात अनेक कामे करण्यात येत आहेत. या कामांवर शेकडो मजूर काम करीत आहेत. मात्र मजुरांना दिलासा देण्याऐवजी राज्य शासनाने थट्टाच केली आहे. यापूर्वी रोहयो मजुरांना १६८ रूपये मजुरी दिली जायची. १ एप्रिलपासून १३ रूपये वाढ म्हणजे १८१ रूपये मजुरी मिळणार आहे. केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने १३ रूपयाने ही वाढ केली असून, ही वाढ मजुरांची खिल्ली उडविणारी आहे.चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सद्य:स्थितीत जलयुक्त शिवार यासह ग्रामीण पातळीवरील जलसिंचनाच्या विविध योजनांची कामे केली जात आहेत. यामध्ये विहिरी, फलोत्पादन, राजीव गांधी भवन, रोपवाटिका, रस्त्यांची कामे अशा विविध योजनांची कामे दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने हाती घेण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण बाराशेच्या जवळपास कामे सुरू आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यात १६ हजार मजूर काम करीत आहेत. त्यांना नवीन दराने प्रतिदिन १८१ रूपये मजुरी मिळणार आहे. २०१३-१४ साली १६२ रूपये प्रतिदिन मजुरीचा दर होता. तर २०१४-१५ साठी १६८ रूपये प्रतिदिन मजुरीचा दर करण्यात आला. आणि आता त्यात १३ रूपयांनी वाढ करून २०१५-१६ साठी १८१ रुपये प्रतिदिन मजुरी दिली जाणार आहे. मागील दोन वर्षांत केवळ १३ रूपयांनी मजुरी वाढल्याने केंद्र शासनाने रोहयो मजुरांची खिल्ली उडविली असल्याची चर्चा मजूरवर्गात व्यक्त होत आहे. महागाईच्या परिस्थितीत खाजगी कामांमध्ये प्रतिदिन महिलांना २०० ते ३०० रूपये तर पुरुषांना ३०० ते ४०० रूपये मिळत आहेत. तर शासनाने प्रतिदिन केवळ १८१ रूपये मजुरी देऊन या मजुरांची उपेक्षा केली आहे. दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये मजुरांना भरगच्च वाढ देण्याऐवजी शासनाने मजुरीमध्ये केवळ १३ रूपयांची वाढ केल्याने मजुर वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.