शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

रस्ता चौपदरीकरणासाठी तोडलेली वृक्षे ठरत आहे जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:25 IST

अमरावती ते बडनेरा मुख्य मार्गाच्या चौपदरीकरणासाठी एक महिन्यापूर्वी तोडण्यात आलेले वृक्ष अजूनपर्यंत तेथेच पडून आहे. रात्री अंधारात हे वृक्ष वाहनचालकांना एकाएकी दिसत नसल्याने धोक्याचे ठरत आहे. तात्काळ हटविण्याची मागणी पुढे आली आहे. संबंधित यंत्रणेने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देकंत्राटदाराला अभय : यंत्रणा केव्हा देणार लक्ष ?

श्यामकांत सहस्त्रभोजने ।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : अमरावती ते बडनेरा मुख्य मार्गाच्या चौपदरीकरणासाठी एक महिन्यापूर्वी तोडण्यात आलेले वृक्ष अजूनपर्यंत तेथेच पडून आहे. रात्री अंधारात हे वृक्ष वाहनचालकांना एकाएकी दिसत नसल्याने धोक्याचे ठरत आहे. तात्काळ हटविण्याची मागणी पुढे आली आहे. संबंधित यंत्रणेने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे.नरखेड रेल्वे उड्डाणपुलापासून ते बडनेरा रेल्वे स्टेशनजवळून गेलेल्या महामार्गावरील उड्डाणपुलापर्यंतचे वृक्ष चौपदरीकरणाच्या कामासाठी तब्बल एक महिन्यापूर्वी तोडण्यात आले. या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्यालगतच पडून असणाऱ्या वृक्षांमुळे बºयाच वाहनचालकांवर पडण्याची वेळ येत आहे. या मार्गावरून जाणाºया वाहनचालकांमध्ये याप्रती संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. वृक्ष असेच तोडून ठेवायचे होते, तर कटाईची घाई का केली, असेही बोलले जात आहे. हे तोडलेले वृक्ष येथून तात्काळ हटवावे, असे बडनेरा वासियांसह वाहन चालकांमध्ये बोलल्या जात आहे. यंत्रणा सदर कंत्राटदाराला अभय देत असल्याचे स्पष्ट होत आहे.तब्बल तीन किलोमीटरपर्यंतच्या अंतराची वृक्षकटाई करण्यात आली आहे. रस्त्यालगत पडलेले वृक्ष व खराब रस्त्यांमुळे एवढ्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ज्या भागात वृक्षकटाई करण्यात आली, तेथे पुरेशी प्रकाश व्यवस्थादेखील नाही. याचा सारासार विचार प्रशासनाने करावा, अशी मागणी नागरिकांमधूून होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वृक्ष कापण्याचे कंत्राट ज्या कंत्राटदाराला दिला, त्याने निर्धारित वेळेत कापलेले लाकूड उचलून नेऊन त्याची विल्हेवाट लावणे अनिवार्य आहे. मात्र, महिन्याचा कालावधी लोटूनही रस्त्याच्या दुतर्फा अपघातास कारणीभूत ठरणारे हे भले मोठे ओंडके जागोजागी आहे. याशिवाय या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. आता या रस्त्याच्या दुरुस्तीची प्रतीक्षा नागरिकांना लागली आहे.अमरावती मार्गावर तोडण्यात आलेली झाडे रस्त्यालगत तशीच पडून आहे. ती धोक्याची ठरत आहे. प्रशासनाने याची दखल घ्यावी व तात्काळ रस्त्यालगत पडून असणारी झाडे हटवावीत.- नितीन मांजरेसामाजिक कार्यकर्ते, बडनेरा.