शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा

By admin | Updated: November 18, 2015 00:28 IST

तालुक्यातील आदिवासी भागाचा विकास व्हावा याकरिता कोट्यवधी रुपयांचे रस्त्यासाठी व इतर अनेक योजनांतून निधी खेचून आणला.

निकृष्ट दर्जाचे काम : कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी वरूड : तालुक्यातील आदिवासी भागाचा विकास व्हावा याकरिता कोट्यवधी रुपयांचे रस्त्यासाठी व इतर अनेक योजनांतून निधी खेचून आणला. परंतु संबंधित ठेकेदारांनी आदिवासी भागामध्ये केलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने संपूर्ण रस्ते उखडले आहेत. जागोजागी खड्डे पडले आहेत. घरकुलाच्या इमारतींना भेगा पडल्या असून कोसळण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे अशा ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आदिवासी बांधवांकडून होत आहे.सातपुडा पर्वताच्या कुशीत अनेक खेडे वजा गावे आहेत. या परिसरात आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. आदिवासीबहुल भागातील नागरिकांना दळणवळणाची सुविधा व्हावी तसेच तालुक्यातील खेडे शहरासोबत जोडण्याकरिता ग्रामीण रस्ते मुख्य रस्त्यासोबत जोडली गेली. याकरिता प्रधामंत्री ग्रामसडक योजना, ठक्कर बाप्पा योजना तर नाबार्ड तसेच विविध योजनांतून मोठमोठे रस्ते बांधण्यात आले. परंतु रस्ते बांधताना ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे काम केले. यामुळे एकाच वर्षाच्या आत रस्त्याची दुर्दशा होऊन बांधकाम विभागाचे वाभाडे काढले. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा निधीचा दुरुपयोग झाला. रस्ते बांधकामात अंदाजपत्रकाप्रमाणे साहित्य वापरण्यात आले नसल्याने गिट्टी, डांबर दिसतच नसल्याची ओरड ग्रामस्थांमधून होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराकडे शाळेत येताना सुविधा मिळावी हा यामागचा उद्देश होता. परंतु मुख्य विषयालाच तिलांजली मिळाली आहे. परंतु रस्त्याची दुर्दशा झाल्याने वाहनेसुध्दा रस्त्यावरून धाऊ शकत नसल्याने आदिवासी ग्रामस्थांना पायदळी यावे लागते. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मुलांना पायदळी यावे लागत असल्याने मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असतो. आदिवासी भागाचा विकास व्हावा यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांचा निधी विकास कामासाठी दिला. परंतु संबंधित ठेकेदाराने अधिकाऱ्यासोबत संगनमत करून संबंधित कामे अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे केल्याने संपूर्ण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. शासनाने ठरविलेल्या अंदाजपत्रकानुसार कामे झाली नसून त्या कामावरील असलेला निधी ठेकेदार व अधिकाऱ्यांनी घशात घातला आहे. शासकीय निधीतून रस्ते किंवा कोणतेही विकासकामे करताना निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी आदिवासी बांधवांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)