शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

उन्हाच्या तडाख्याने रस्ते ओस

By admin | Updated: September 10, 2015 00:09 IST

पावसाळा संपता-संपता तरी पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पाऊस तर सोडाच उन्हाळासदृश उन्हाच्या झळांनी सद्यस्थितीत नागरिक हैराण झाले आहेत.

आजार बळावले : शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले अमरावती : पावसाळा संपता-संपता तरी पाऊस पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पाऊस तर सोडाच उन्हाळासदृश उन्हाच्या झळांनी सद्यस्थितीत नागरिक हैराण झाले आहेत. गत आठवडाभरापासून ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. मात्र, मंगळवारी उन्हाचा तडाखा वाढल्याचे जाणवले. प्रखर उन्हामुळे भर दिवसा रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसून येत आहे. बुधवारी ३३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. बुधवार सकाळपासून उन्हाची तीव्रता जाणवत आहे. दुपारी १२ नंतर उन्हाची दाहकता वाढत जाते. वाढत्या उन्हामुळे वर्दळीचे रस्तेही ओस पडल्याचे दिसून येते. उन्हाच्या काहिलीपासून रक्षण करण्याकरिता दुपट्टे आणि स्टोल्सचा वापर वाहनधारकांना करावा लागत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेसमोर विविध कारणांसाठी निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना कडक उन्हाचा सामना करावा लागतो. प्रचंड उकाड्याने आबालवृध्द हैराण झाले आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे शेतकरी देखील हैराण झाले आहेत. कशीबशी हाताशी उरलेली पिके करपण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषत: सोयाबीन, कपाशी, तूर या पिकांवर वाढत्या उन्हाचा विपरित परिणाम जाणवू लागला आहे. सोयाबीन ऐन फुलावर आणि शेंगा भरण्याच्या कालावधीत पावसाने दडी मारल्याने शेंगा पोचट राहण्याची शक्यता अधिक आहे. भर पावसाळ्यात पिकांना सिंचनाचे पाणी द्यावे लागत आहे. वातावरणातील अनपेक्षित बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम जाणवू लागला आहे. तीव्र उन्हामुळे डोकेदुखी, डोळ्यांचे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यातील कडक ऊन नागरिकांची अक्षरश: परीक्षा घेत आहे. नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी उपयायोजना करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)