शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

व्याघ्र प्रकल्पातील रस्ते निर्मिती मुद्दा गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 6:00 AM

मेळघाटातील रस्तेनिर्मितीच्या ‘एनओसी’वरून वनविभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची महत्त्वाची बैठक खासदार राणांनी मंगळवारी घेतली. आदिवासी विकासाच्या प्रवाहात येतील, जंगल आणि वन्यजिवांना हानी पोहोचणार नाही, अशा प्रस्तावांना मान्यता प्रदान करण्याबाबत खा. राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्यात.

ठळक मुद्देनवनीत राणा आक्रमक : मेळघाटातील आदिवासींची अडवणूक करू नका

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कोअर आणि बफर झोनमधील रस्ते निर्मितीला ना-हरकत (एनओसी) मिळत नसल्याने तब्बल २० रस्त्यांची निर्मिती रखडली आहे. ही आदिवासींची अडवणूक असून, सामाजिक दायित्वाच्या भावनेतून आदिवासींच्या विकासासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन खासदार नवनीत राणा यांनी अधिकाऱ्यांना केले.मेळघाटातील रस्तेनिर्मितीच्या ‘एनओसी’वरून वनविभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची महत्त्वाची बैठक खासदार राणांनी मंगळवारी घेतली. आदिवासी विकासाच्या प्रवाहात येतील, जंगल आणि वन्यजिवांना हानी पोहोचणार नाही, अशा प्रस्तावांना मान्यता प्रदान करण्याबाबत खा. राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्यात. परतवाडा ते धारणी आणि परतवाडा ते चिखलदरा या दोन मुख्य मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांचा विषय त्यांनी प्रामुख्याने हाताळल्या. काही रस्ते निर्मितीबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवा. पुढे हा प्रस्ताव केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाठवा. परंतु, आदिवासींची अडवणूक केल्यास गाठ माझ्याशी असेल, अशी तंबी खासदारांनी दिली. यावेळी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूधंती शर्मा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ विनय ठमके, उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, शिवकुमार शिवबाला, कार्यकारी अभियंता मेहत्रे, जिल्हा परिषद बांधकाम अभियंता प्रशांत गावंडे, कार्यकारी अभियंता शेंडगे आदी उपस्थित होते.दाबका ग्रामस्थांना टोलमुक्तीसाठी ओळखपत्रमेळघाट व्याघ्र प्रक ल्प अंतर्गत दाबका येथे टोलनाका आहे. मात्र, या टोलनाक्यावरून ये-जा करताना ग्रामस्थांनाही भुर्दंड पडतो. दाबका ग्रामस्थांनी ही अन्याय्य बाब खासदार नवनीत राणा यांच्या निदर्शनास आणून दिली होती. ग्रामस्थांना वनविभागाने स्वतंत्र ओळखपत्र देऊन टोलमुक्त करावे, असा निर्णय खासदारांनी दिला. या निर्णयामुळे आदिवासींना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणा