शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

व्याघ्र प्रकल्पातील रस्ते निर्मिती मुद्दा गाजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 06:00 IST

मेळघाटातील रस्तेनिर्मितीच्या ‘एनओसी’वरून वनविभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची महत्त्वाची बैठक खासदार राणांनी मंगळवारी घेतली. आदिवासी विकासाच्या प्रवाहात येतील, जंगल आणि वन्यजिवांना हानी पोहोचणार नाही, अशा प्रस्तावांना मान्यता प्रदान करण्याबाबत खा. राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्यात.

ठळक मुद्देनवनीत राणा आक्रमक : मेळघाटातील आदिवासींची अडवणूक करू नका

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील कोअर आणि बफर झोनमधील रस्ते निर्मितीला ना-हरकत (एनओसी) मिळत नसल्याने तब्बल २० रस्त्यांची निर्मिती रखडली आहे. ही आदिवासींची अडवणूक असून, सामाजिक दायित्वाच्या भावनेतून आदिवासींच्या विकासासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन खासदार नवनीत राणा यांनी अधिकाऱ्यांना केले.मेळघाटातील रस्तेनिर्मितीच्या ‘एनओसी’वरून वनविभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची महत्त्वाची बैठक खासदार राणांनी मंगळवारी घेतली. आदिवासी विकासाच्या प्रवाहात येतील, जंगल आणि वन्यजिवांना हानी पोहोचणार नाही, अशा प्रस्तावांना मान्यता प्रदान करण्याबाबत खा. राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्यात. परतवाडा ते धारणी आणि परतवाडा ते चिखलदरा या दोन मुख्य मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांचा विषय त्यांनी प्रामुख्याने हाताळल्या. काही रस्ते निर्मितीबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवा. पुढे हा प्रस्ताव केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाठवा. परंतु, आदिवासींची अडवणूक केल्यास गाठ माझ्याशी असेल, अशी तंबी खासदारांनी दिली. यावेळी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूधंती शर्मा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ विनय ठमके, उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, शिवकुमार शिवबाला, कार्यकारी अभियंता मेहत्रे, जिल्हा परिषद बांधकाम अभियंता प्रशांत गावंडे, कार्यकारी अभियंता शेंडगे आदी उपस्थित होते.दाबका ग्रामस्थांना टोलमुक्तीसाठी ओळखपत्रमेळघाट व्याघ्र प्रक ल्प अंतर्गत दाबका येथे टोलनाका आहे. मात्र, या टोलनाक्यावरून ये-जा करताना ग्रामस्थांनाही भुर्दंड पडतो. दाबका ग्रामस्थांनी ही अन्याय्य बाब खासदार नवनीत राणा यांच्या निदर्शनास आणून दिली होती. ग्रामस्थांना वनविभागाने स्वतंत्र ओळखपत्र देऊन टोलमुक्त करावे, असा निर्णय खासदारांनी दिला. या निर्णयामुळे आदिवासींना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणा