शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

काटआमला पुलाला जोडणारा रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:01 IST

बडनेरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील काटआमला गावानजीक शिवणी बु. मार्गे मोठा नाला वाहतो. त्यावरील खोलगट पुलाचा रस्ता एका बाजूने खचला आहे. त्यामुळे परिसरातील गावांकरिता हा पूल धोक्याचा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी लगतच्या पारधी बेड्यावरील दुचाकीस्वार वाहनासह नाल्यात पडले. सुदैवाने ते पाण्याच्या बाहेर आले. खचलेला रस्ता एका पावसातच पूर्णपणे वाहून जाईल, अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देप्रशासन सुस्त : शहरानजीकच्या रस्त्याला अवकळा; मोठे भगदाड पडले, ग्रामस्थांना अपघाताची भीती

श्यामकांत सहस्त्रभोजने ।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : काटआमला ते शिवणी बु. यांसह बऱ्याच गावांना जोडणाºया पुलालगतचा रस्ता खचल्याने तेथे मोठे भगदाड पडले आहे. यामुळे एक वर्षापूर्वीच्या अपघाताच्या पुनरावृत्तीची भीती ग्रामस्थांमध्ये घर करून आहे. प्रशासनाने मात्र रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कुठलेही पाऊल उचललेले नाही.बडनेरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील काटआमला गावानजीक शिवणी बु. मार्गे मोठा नाला वाहतो. त्यावरील खोलगट पुलाचा रस्ता एका बाजूने खचला आहे. त्यामुळे परिसरातील गावांकरिता हा पूल धोक्याचा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी लगतच्या पारधी बेड्यावरील दुचाकीस्वार वाहनासह नाल्यात पडले. सुदैवाने ते पाण्याच्या बाहेर आले. खचलेला रस्ता एका पावसातच पूर्णपणे वाहून जाईल, अशी स्थिती आहे.खरबी, दाढी-पेढी, लहान-मोठी शिवणी, टाकळी, बहादरपूर, बहिलोलपूर अशा गावांना याच पुलावरून जावे लागते. दररोज बडनेरा किंवा अमरावतीला कामकाजासाठी शेकडो लोक, विद्यार्थी हा पूल ओलांडून जात असतात तसेच शेतीच्या कामासाठी जाणाऱ्यांची संख्यादेखील बरीच आहे. पाऊस आला की, हा पूल ओसंडून वाहतो. तासन्तास लोकांना अडकून राहण्याची वेळ येते. त्यामुळे गंभीर अवस्था झालेल्या पुलाचे काम केव्हा करणार, याची प्रतीक्षा परिसरातील ग्रामस्थांना आहे.वर्षभरापूर्वी दोन चिमुकले गेले वाहूनएक वर्षापूर्वी बडनेराहून बहादरपूर येथे जाणाºया दुचाकीस्वारांचा याच खोलगट पुलाने घात केला. एका व्यक्तीला दोन्ही चिमुकले गमवावे लागले. पुलाच्या चुकीच्या बांधणीचा मुद्दा तेव्हा चर्चेत होता. ग्रामस्थांंच्या संतप्त प्रतिक्रियांवर राजकारण्यांनी आश्वासने देऊन मागील निवडणूक पार पाडली. मात्र, पुलाच्या पुनर्निर्मितीचे काम सुरू होण्यास मुहूर्त अद्याप सापडला नाही.पूल ओलांडून शेतात जावे लागते. पुलाला जोडणारा रस्ता खचला आहे. पावसात हा भाग दिसतच नाही. नव्याने पूल व रस्ता निर्मिती करावी.- अंकुश वडे,शेतकरी, काटआमलायंदाच्या पावसाळ्यात रस्त्यासह पुलालादेखील मोठा धोका आहे. आम्ही जीव मुठीत घेऊनच ये-जा करतो. ग्रामवासी घाबरले आहेत. रस्त्याचे काम नव्याने करावे.- सुनील मालधुरे, काटआमला

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक