शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

काटआमला पुलाला जोडणारा रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:01 IST

बडनेरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील काटआमला गावानजीक शिवणी बु. मार्गे मोठा नाला वाहतो. त्यावरील खोलगट पुलाचा रस्ता एका बाजूने खचला आहे. त्यामुळे परिसरातील गावांकरिता हा पूल धोक्याचा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी लगतच्या पारधी बेड्यावरील दुचाकीस्वार वाहनासह नाल्यात पडले. सुदैवाने ते पाण्याच्या बाहेर आले. खचलेला रस्ता एका पावसातच पूर्णपणे वाहून जाईल, अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देप्रशासन सुस्त : शहरानजीकच्या रस्त्याला अवकळा; मोठे भगदाड पडले, ग्रामस्थांना अपघाताची भीती

श्यामकांत सहस्त्रभोजने ।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : काटआमला ते शिवणी बु. यांसह बऱ्याच गावांना जोडणाºया पुलालगतचा रस्ता खचल्याने तेथे मोठे भगदाड पडले आहे. यामुळे एक वर्षापूर्वीच्या अपघाताच्या पुनरावृत्तीची भीती ग्रामस्थांमध्ये घर करून आहे. प्रशासनाने मात्र रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कुठलेही पाऊल उचललेले नाही.बडनेरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील काटआमला गावानजीक शिवणी बु. मार्गे मोठा नाला वाहतो. त्यावरील खोलगट पुलाचा रस्ता एका बाजूने खचला आहे. त्यामुळे परिसरातील गावांकरिता हा पूल धोक्याचा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी लगतच्या पारधी बेड्यावरील दुचाकीस्वार वाहनासह नाल्यात पडले. सुदैवाने ते पाण्याच्या बाहेर आले. खचलेला रस्ता एका पावसातच पूर्णपणे वाहून जाईल, अशी स्थिती आहे.खरबी, दाढी-पेढी, लहान-मोठी शिवणी, टाकळी, बहादरपूर, बहिलोलपूर अशा गावांना याच पुलावरून जावे लागते. दररोज बडनेरा किंवा अमरावतीला कामकाजासाठी शेकडो लोक, विद्यार्थी हा पूल ओलांडून जात असतात तसेच शेतीच्या कामासाठी जाणाऱ्यांची संख्यादेखील बरीच आहे. पाऊस आला की, हा पूल ओसंडून वाहतो. तासन्तास लोकांना अडकून राहण्याची वेळ येते. त्यामुळे गंभीर अवस्था झालेल्या पुलाचे काम केव्हा करणार, याची प्रतीक्षा परिसरातील ग्रामस्थांना आहे.वर्षभरापूर्वी दोन चिमुकले गेले वाहूनएक वर्षापूर्वी बडनेराहून बहादरपूर येथे जाणाºया दुचाकीस्वारांचा याच खोलगट पुलाने घात केला. एका व्यक्तीला दोन्ही चिमुकले गमवावे लागले. पुलाच्या चुकीच्या बांधणीचा मुद्दा तेव्हा चर्चेत होता. ग्रामस्थांंच्या संतप्त प्रतिक्रियांवर राजकारण्यांनी आश्वासने देऊन मागील निवडणूक पार पाडली. मात्र, पुलाच्या पुनर्निर्मितीचे काम सुरू होण्यास मुहूर्त अद्याप सापडला नाही.पूल ओलांडून शेतात जावे लागते. पुलाला जोडणारा रस्ता खचला आहे. पावसात हा भाग दिसतच नाही. नव्याने पूल व रस्ता निर्मिती करावी.- अंकुश वडे,शेतकरी, काटआमलायंदाच्या पावसाळ्यात रस्त्यासह पुलालादेखील मोठा धोका आहे. आम्ही जीव मुठीत घेऊनच ये-जा करतो. ग्रामवासी घाबरले आहेत. रस्त्याचे काम नव्याने करावे.- सुनील मालधुरे, काटआमला

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक