शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
2
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
3
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
4
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
6
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
7
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
9
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
10
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
11
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
12
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
13
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
14
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
15
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
16
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
17
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
18
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
19
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
20
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार

काटआमला पुलाला जोडणारा रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:01 IST

बडनेरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील काटआमला गावानजीक शिवणी बु. मार्गे मोठा नाला वाहतो. त्यावरील खोलगट पुलाचा रस्ता एका बाजूने खचला आहे. त्यामुळे परिसरातील गावांकरिता हा पूल धोक्याचा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी लगतच्या पारधी बेड्यावरील दुचाकीस्वार वाहनासह नाल्यात पडले. सुदैवाने ते पाण्याच्या बाहेर आले. खचलेला रस्ता एका पावसातच पूर्णपणे वाहून जाईल, अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देप्रशासन सुस्त : शहरानजीकच्या रस्त्याला अवकळा; मोठे भगदाड पडले, ग्रामस्थांना अपघाताची भीती

श्यामकांत सहस्त्रभोजने ।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : काटआमला ते शिवणी बु. यांसह बऱ्याच गावांना जोडणाºया पुलालगतचा रस्ता खचल्याने तेथे मोठे भगदाड पडले आहे. यामुळे एक वर्षापूर्वीच्या अपघाताच्या पुनरावृत्तीची भीती ग्रामस्थांमध्ये घर करून आहे. प्रशासनाने मात्र रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कुठलेही पाऊल उचललेले नाही.बडनेरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावरील काटआमला गावानजीक शिवणी बु. मार्गे मोठा नाला वाहतो. त्यावरील खोलगट पुलाचा रस्ता एका बाजूने खचला आहे. त्यामुळे परिसरातील गावांकरिता हा पूल धोक्याचा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी लगतच्या पारधी बेड्यावरील दुचाकीस्वार वाहनासह नाल्यात पडले. सुदैवाने ते पाण्याच्या बाहेर आले. खचलेला रस्ता एका पावसातच पूर्णपणे वाहून जाईल, अशी स्थिती आहे.खरबी, दाढी-पेढी, लहान-मोठी शिवणी, टाकळी, बहादरपूर, बहिलोलपूर अशा गावांना याच पुलावरून जावे लागते. दररोज बडनेरा किंवा अमरावतीला कामकाजासाठी शेकडो लोक, विद्यार्थी हा पूल ओलांडून जात असतात तसेच शेतीच्या कामासाठी जाणाऱ्यांची संख्यादेखील बरीच आहे. पाऊस आला की, हा पूल ओसंडून वाहतो. तासन्तास लोकांना अडकून राहण्याची वेळ येते. त्यामुळे गंभीर अवस्था झालेल्या पुलाचे काम केव्हा करणार, याची प्रतीक्षा परिसरातील ग्रामस्थांना आहे.वर्षभरापूर्वी दोन चिमुकले गेले वाहूनएक वर्षापूर्वी बडनेराहून बहादरपूर येथे जाणाºया दुचाकीस्वारांचा याच खोलगट पुलाने घात केला. एका व्यक्तीला दोन्ही चिमुकले गमवावे लागले. पुलाच्या चुकीच्या बांधणीचा मुद्दा तेव्हा चर्चेत होता. ग्रामस्थांंच्या संतप्त प्रतिक्रियांवर राजकारण्यांनी आश्वासने देऊन मागील निवडणूक पार पाडली. मात्र, पुलाच्या पुनर्निर्मितीचे काम सुरू होण्यास मुहूर्त अद्याप सापडला नाही.पूल ओलांडून शेतात जावे लागते. पुलाला जोडणारा रस्ता खचला आहे. पावसात हा भाग दिसतच नाही. नव्याने पूल व रस्ता निर्मिती करावी.- अंकुश वडे,शेतकरी, काटआमलायंदाच्या पावसाळ्यात रस्त्यासह पुलालादेखील मोठा धोका आहे. आम्ही जीव मुठीत घेऊनच ये-जा करतो. ग्रामवासी घाबरले आहेत. रस्त्याचे काम नव्याने करावे.- सुनील मालधुरे, काटआमला

टॅग्स :Rainपाऊसroad transportरस्ते वाहतूक