शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

नदीजोड प्रकल्पाने एक लाख हेक्टर सिंचनक्षेत्रात वाढ, हैदराबादच्या एनडब्ल्यूडीएचा सर्व्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 16:02 IST

अमरावती : पूर्व विदर्भात गोदावरीच्या (वैनगंगा) खो-यातील अतिरिक्त पाणी पश्चिम विदर्भातील कमी पावसाच्या तापी (नळगंगा) नदीच्या खो-यात वळविण्याचे नियोजन असलेला नदी जोड प्रकल्प व-हाडासाठी संजीवनी ठरणार आहे.

गजानन मोहोडअमरावती : पूर्व विदर्भात गोदावरीच्या (वैनगंगा) खो-यातील अतिरिक्त पाणी पश्चिम विदर्भातील कमी पावसाच्या तापी (नळगंगा) नदीच्या खो-यात वळविण्याचे नियोजन असलेला नदी जोड प्रकल्प व-हाडासाठी संजीवनी ठरणार आहे. ना. नितीन गडकरी यांच्या अखत्यारीतील मंत्रालयांतर्गत ४४० किमी. लांबीचा हा प्रकल्प विदर्भातील सहा जिल्ह्यांत मार्गक्रमित होऊन बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पाला जोडण्यात येणार आहे. यामुळे एक लाख चार हजार हेक्टर सिंचन क्षेत्रातवाढ, तर १२ साठवण तलावाद्वारे ८६० टीएमसी पाणीसाठाही वाढणार आहे.राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार १९१२ दलघमी पाणी विचारात घेऊन वैनगंगा ते नळगंगा नदीजोड कालव्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल हैदराबाद येथील राष्ट्रीय जलविकास प्राधिकरण (एनडब्ल्यूडीए)द्वारा तयार करण्यात येत आहे. एकूण ४४० किमी लांबीचा हा जोड कालवा गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजव्या तिरावरून सुरू होऊन त्याची संरेखा भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम व अकोला या जिल्ह्यांतून मार्गक्रमित होणार आहे. शेवटच्या टप्प्यात हा प्रकल्प बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पस्थळी सोडण्याचे नियोजन आहे.जलसंपदा विभागाच्या बैठकीत या जोड कालवा प्रकल्पाला अंशत: मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या ३०८ किमीच्या जोड कालव्याचे सर्वेक्षण एनडब्ल्यूडीएद्वारा पूर्ण झालेले आहे. या जोड कालव्याची अमरावती जिल्ह्यात लांबी ९० किमीची आहे. यामध्ये निम्न वर्धा प्रकल्पाजवळ ५० किमीची लिफ्ट प्रस्तावित आहे, तर २३८ ते ४४० किमी दरम्यानची लांबी अकोला व बुलडाणा जिल्ह्यात आहे. यामध्ये काटेपूर्णा प्रकल्पाजवळ २७ मीटर उंचीची लिफ्ट राहणार आहे. अमरावतीच्या जिल्ह्यात आठ साठवण तलाव प्रस्तावित आहेत. या तलावामध्ये ४६२ टीएमसी साठवण होऊन ७८ दलघमी साठ्याच्या माध्यमातून अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील २०२ किमी लांबीच्या अंतरात सहा साठवण तलावातील ३९६.३७ दलघमी साठ्याच्या माध्यमातून ३४ हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.३०८ किमी लांबीचे संरेखा सर्वेक्षण पूर्णराष्ट्रीय जलविकास प्राधिकरण, हैदराबादद्वारा साखळी क्रमांक ३०८ किमीपर्यंतच्या जोड कालव्याचे संरेखा सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. ४४० किमीपर्यंत म्हणजेच नळगंगापर्यंतच्या संरेखाला मुख्य अभियंत्याच्या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली. जोड कालव्याच्या बाजूला असणा-या कालव्यामधून उपलब्ध होणा-या पाण्याचा वापर रबी सिंचनासाठी साठवण तलाव निर्माण करण्यासाठी होणार आहे.केंद्राच्या अखत्यारीतील हा नदीजोड प्रकल्प पश्चिम विदर्भासाठी नवसंजीवनी ठरणार असल्याची चर्चा रविवारी ना. नितीन गडकरी यांच्याशी झाली. प्रकल्पाची किंमतवाढ झाल्याने यावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.- निवेदिता चौधरी,प्रदेश सचिव, भाजप

टॅग्स :riverनदी