शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

बियाण्याच्या दरात वाढ कांदा नुकसान भरून काढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 05:00 IST

सर्वसाधारणपणे पथ्रोट, अंजनगाव, अचलपूर, चांदूर बाजार तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट परिसरातील शेतकरी हे पूर्वीपासून पांढरा कांदा बियाण्याचे उत्पादन घेतात. घोपाट फुलातून बी गोळा करणे, एप्रिल ते सप्टेंबर या काळात साठवण ही जिकरीची कामे आहेत. त्यामुळे या भागातील ठरावीकच शेतकरी कांदा बियाण्याचे उत्पादन घेतात.

ठळक मुद्देपायलीला ३००० रुपये : एकीकडे कांद्याची दरवाढ, दुसरीकडे बियाणे महागले

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगावसुर्जी : एकीकडे कांद्याच्या दरवाढीने गृहिणी हवालदिल झाल्या आहेत, तर दुसरीकडे पांढऱ्या कांद्याचे बियाणे (घोपाट) दरात विक्रमी वाढ झाल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. हे बियाणे प्रतिकिलो १,२५० ते १,५०० रुपये आणि एक पायली बियाणे ३ हजार रुपये दराने विक्री होत आहे. भावातील तेजीमुळे खरिपातील पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे.सर्वसाधारणपणे पथ्रोट, अंजनगाव, अचलपूर, चांदूर बाजार तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट परिसरातील शेतकरी हे पूर्वीपासून पांढरा कांदा बियाण्याचे उत्पादन घेतात. घोपाट फुलातून बी गोळा करणे, एप्रिल ते सप्टेंबर या काळात साठवण ही जिकरीची कामे आहेत. त्यामुळे या भागातील ठरावीकच शेतकरी कांदा बियाण्याचे उत्पादन घेतात. गतवर्षी कांद्याचे दर गगनाला भिडल्याने व बियांचा कांदा न मिळाल्याने घोपाटाची कमी प्रमाणात लागवड झाली. लागवड झालेल्या घोपाटाच्या फुलांचे यावर्षी परागीकरण न झाल्याने कांदा बियाण्यांचे उत्पादन कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे कांदा बियाण्याच्या दरात यंदा विक्रमी वाढ झाली.अतिवृृृृष्टीमुळे विहिरी व कूपनलिकेतून सिंचनाकरिता पाणी हमखास मिळण्याची खात्री कांदा उत्पादकांना आहे. याशिवाय खरिपाची मूग, उडीद, सोयाबीन ही पिके हातची गेल्याने रबी कांदा लागवडीकडे बागायतदार शेतकºयांचा कल दिसत आहे.सद्यस्थितीत कृषिसेवा केंद्रांवर खासगी कंपनीचे पांढºया कांद्याचे ५०० ग्रॅम बियाणे ६००, तर लाल कांद्याचे बियाणे ५५० रुपयांच्या आसपास आहे. परंतु, या बियाण्यांबाबत दुकानदारच खात्री देत नाहीत. बियाणे खरेदीबाबत सावध राहावे, असा सल्ला जाणकार शेतकºयांनी दिला आहे.बियाणे खरेदीची लगबगसाधारणत: सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते अष्टमीपर्यंत रोवणीचा काळ असल्याने सर्व शेतकºयांनी कांदा बियाणे खरेदी सुरू केली आहे. शेतकरी कंपन्यांऐवजी इतर शेतकºयांकडील खात्रीशीर बियाण्यांवर विश्वास ठेवतात. कारण बियाणे न उगवल्यास विक्रेता शेतकरी प्रसंगी पैसेही परत करतो. यंदा चणा, गहू, सूर्यफूल, करडई, जवस, वाटाणा, तीळ या रबी पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोबत बियाणे दरवाढीची भीती व्यक्त होत आहे.यंदा अतिवृृृष्टी झाल्याने ओलिताकरिता मुबलक पाणी उपलब्ध आहे. याशिवाय कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकºयांचा लागवडीकडे कल आहे.- संजय नाठे,शेतकरी, अंजनगाव सुर्जी

टॅग्स :agricultureशेती