शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्याच्या दरात वाढ कांदा नुकसान भरून काढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 05:00 IST

सर्वसाधारणपणे पथ्रोट, अंजनगाव, अचलपूर, चांदूर बाजार तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट परिसरातील शेतकरी हे पूर्वीपासून पांढरा कांदा बियाण्याचे उत्पादन घेतात. घोपाट फुलातून बी गोळा करणे, एप्रिल ते सप्टेंबर या काळात साठवण ही जिकरीची कामे आहेत. त्यामुळे या भागातील ठरावीकच शेतकरी कांदा बियाण्याचे उत्पादन घेतात.

ठळक मुद्देपायलीला ३००० रुपये : एकीकडे कांद्याची दरवाढ, दुसरीकडे बियाणे महागले

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगावसुर्जी : एकीकडे कांद्याच्या दरवाढीने गृहिणी हवालदिल झाल्या आहेत, तर दुसरीकडे पांढऱ्या कांद्याचे बियाणे (घोपाट) दरात विक्रमी वाढ झाल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. हे बियाणे प्रतिकिलो १,२५० ते १,५०० रुपये आणि एक पायली बियाणे ३ हजार रुपये दराने विक्री होत आहे. भावातील तेजीमुळे खरिपातील पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे.सर्वसाधारणपणे पथ्रोट, अंजनगाव, अचलपूर, चांदूर बाजार तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट परिसरातील शेतकरी हे पूर्वीपासून पांढरा कांदा बियाण्याचे उत्पादन घेतात. घोपाट फुलातून बी गोळा करणे, एप्रिल ते सप्टेंबर या काळात साठवण ही जिकरीची कामे आहेत. त्यामुळे या भागातील ठरावीकच शेतकरी कांदा बियाण्याचे उत्पादन घेतात. गतवर्षी कांद्याचे दर गगनाला भिडल्याने व बियांचा कांदा न मिळाल्याने घोपाटाची कमी प्रमाणात लागवड झाली. लागवड झालेल्या घोपाटाच्या फुलांचे यावर्षी परागीकरण न झाल्याने कांदा बियाण्यांचे उत्पादन कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे कांदा बियाण्याच्या दरात यंदा विक्रमी वाढ झाली.अतिवृृृृष्टीमुळे विहिरी व कूपनलिकेतून सिंचनाकरिता पाणी हमखास मिळण्याची खात्री कांदा उत्पादकांना आहे. याशिवाय खरिपाची मूग, उडीद, सोयाबीन ही पिके हातची गेल्याने रबी कांदा लागवडीकडे बागायतदार शेतकºयांचा कल दिसत आहे.सद्यस्थितीत कृषिसेवा केंद्रांवर खासगी कंपनीचे पांढºया कांद्याचे ५०० ग्रॅम बियाणे ६००, तर लाल कांद्याचे बियाणे ५५० रुपयांच्या आसपास आहे. परंतु, या बियाण्यांबाबत दुकानदारच खात्री देत नाहीत. बियाणे खरेदीबाबत सावध राहावे, असा सल्ला जाणकार शेतकºयांनी दिला आहे.बियाणे खरेदीची लगबगसाधारणत: सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते अष्टमीपर्यंत रोवणीचा काळ असल्याने सर्व शेतकºयांनी कांदा बियाणे खरेदी सुरू केली आहे. शेतकरी कंपन्यांऐवजी इतर शेतकºयांकडील खात्रीशीर बियाण्यांवर विश्वास ठेवतात. कारण बियाणे न उगवल्यास विक्रेता शेतकरी प्रसंगी पैसेही परत करतो. यंदा चणा, गहू, सूर्यफूल, करडई, जवस, वाटाणा, तीळ या रबी पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोबत बियाणे दरवाढीची भीती व्यक्त होत आहे.यंदा अतिवृृृष्टी झाल्याने ओलिताकरिता मुबलक पाणी उपलब्ध आहे. याशिवाय कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकºयांचा लागवडीकडे कल आहे.- संजय नाठे,शेतकरी, अंजनगाव सुर्जी

टॅग्स :agricultureशेती