शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

बियाण्याच्या दरात वाढ कांदा नुकसान भरून काढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 05:00 IST

सर्वसाधारणपणे पथ्रोट, अंजनगाव, अचलपूर, चांदूर बाजार तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट परिसरातील शेतकरी हे पूर्वीपासून पांढरा कांदा बियाण्याचे उत्पादन घेतात. घोपाट फुलातून बी गोळा करणे, एप्रिल ते सप्टेंबर या काळात साठवण ही जिकरीची कामे आहेत. त्यामुळे या भागातील ठरावीकच शेतकरी कांदा बियाण्याचे उत्पादन घेतात.

ठळक मुद्देपायलीला ३००० रुपये : एकीकडे कांद्याची दरवाढ, दुसरीकडे बियाणे महागले

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगावसुर्जी : एकीकडे कांद्याच्या दरवाढीने गृहिणी हवालदिल झाल्या आहेत, तर दुसरीकडे पांढऱ्या कांद्याचे बियाणे (घोपाट) दरात विक्रमी वाढ झाल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाले आहेत. हे बियाणे प्रतिकिलो १,२५० ते १,५०० रुपये आणि एक पायली बियाणे ३ हजार रुपये दराने विक्री होत आहे. भावातील तेजीमुळे खरिपातील पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे.सर्वसाधारणपणे पथ्रोट, अंजनगाव, अचलपूर, चांदूर बाजार तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट परिसरातील शेतकरी हे पूर्वीपासून पांढरा कांदा बियाण्याचे उत्पादन घेतात. घोपाट फुलातून बी गोळा करणे, एप्रिल ते सप्टेंबर या काळात साठवण ही जिकरीची कामे आहेत. त्यामुळे या भागातील ठरावीकच शेतकरी कांदा बियाण्याचे उत्पादन घेतात. गतवर्षी कांद्याचे दर गगनाला भिडल्याने व बियांचा कांदा न मिळाल्याने घोपाटाची कमी प्रमाणात लागवड झाली. लागवड झालेल्या घोपाटाच्या फुलांचे यावर्षी परागीकरण न झाल्याने कांदा बियाण्यांचे उत्पादन कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे कांदा बियाण्याच्या दरात यंदा विक्रमी वाढ झाली.अतिवृृृृष्टीमुळे विहिरी व कूपनलिकेतून सिंचनाकरिता पाणी हमखास मिळण्याची खात्री कांदा उत्पादकांना आहे. याशिवाय खरिपाची मूग, उडीद, सोयाबीन ही पिके हातची गेल्याने रबी कांदा लागवडीकडे बागायतदार शेतकºयांचा कल दिसत आहे.सद्यस्थितीत कृषिसेवा केंद्रांवर खासगी कंपनीचे पांढºया कांद्याचे ५०० ग्रॅम बियाणे ६००, तर लाल कांद्याचे बियाणे ५५० रुपयांच्या आसपास आहे. परंतु, या बियाण्यांबाबत दुकानदारच खात्री देत नाहीत. बियाणे खरेदीबाबत सावध राहावे, असा सल्ला जाणकार शेतकºयांनी दिला आहे.बियाणे खरेदीची लगबगसाधारणत: सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते अष्टमीपर्यंत रोवणीचा काळ असल्याने सर्व शेतकºयांनी कांदा बियाणे खरेदी सुरू केली आहे. शेतकरी कंपन्यांऐवजी इतर शेतकºयांकडील खात्रीशीर बियाण्यांवर विश्वास ठेवतात. कारण बियाणे न उगवल्यास विक्रेता शेतकरी प्रसंगी पैसेही परत करतो. यंदा चणा, गहू, सूर्यफूल, करडई, जवस, वाटाणा, तीळ या रबी पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोबत बियाणे दरवाढीची भीती व्यक्त होत आहे.यंदा अतिवृृृष्टी झाल्याने ओलिताकरिता मुबलक पाणी उपलब्ध आहे. याशिवाय कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकºयांचा लागवडीकडे कल आहे.- संजय नाठे,शेतकरी, अंजनगाव सुर्जी

टॅग्स :agricultureशेती