शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
2
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
3
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
4
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
5
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
6
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
7
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
8
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
9
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
10
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
11
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
12
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
13
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
14
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
15
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
16
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
17
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
18
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
19
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
20
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!

जलयुक्त समितीचे अधिकार वाढले, काम न करणा-या कंत्राटदारांवर कारवाईस मुभा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 17:11 IST

अमरावती : जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या कामांमध्ये कसूर करणा-या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आता जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीला देण्यात आले आहेत.

अमरावती : जलयुक्त शिवार अभियानांतर्गतच्या कामांमध्ये कसूर करणा-या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आता जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीला देण्यात आले आहेत. त्यामुळे कंत्राटदारांकडून कामांबाबत होणा-या दिरंगाईला चाप बसणार आहे.सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी राज्यात सन २०१५-१६ या वर्षापासून जलयुक्त शिवार अभियान हा अत्यंत महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यात दरवर्षी किमान पाच हजार गावांची टंचाईमुक्तीसाठी निवड केली जात आहे. या कार्यक्रमांतर्गत पाच वर्षांत राज्यातील २५ हजार गावे टंचाईमुक्त करण्याचे धोरण शासनाने निश्चित केलेले आहे.या अभियान निवडलेल्या गावांतील प्रस्तावित कामे कृती आराखड्यानुसार मर्यादित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र पावसाळा सुरू असताना व त्यानंतर नाल्यामधील पाणी ओसरेपर्यंत कामे करता येत नाहीत. या अभियानाच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेणे, गावांची व तेथील कामांची निवड करणे, त्यास मान्यता देणे, कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे व अभियानाचे संनियंत्रण आणि समन्वय करणे आदी जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. त्याठिकाणी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित केलेली आहे. या अभियानांतर्गत होणारी कामे सार्वजनिक बांधकाम विभागात नोंदणीकृत असलेल्या कंत्राटदारामार्फत केली जातात. या कामामध्ये कंत्राटदाराने कसूर केल्यास किंवा काम निकृष्ट दर्जाचे केल्यास किंवा काम सुरू न केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविला जात असे. मात्र, या कार्यपद्धतीमुळे कालापव्यय होत असून अभियानांतर्गत करावयाची कामे तातडीने व मुदतीत पूर्ण करणे शक्य होत नसल्याचे दिसून आले.कामातील दिरंगाईला बसणार चापया कामांमध्ये कंत्राटदाराने निविदा करारातील अटी व शर्तीचे पालन न केल्यास कामात कसूर केल्यास काम नित्कृष्ट दर्जाचे केल्यास अथवा विहित मुदतीत काम सुरू न केल्यास अशा कंत्राटदारावर शासन निर्णयानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. जलयुक्तच्या कामांवर आता जिल्हास्तरीय समितीचे लक्ष राहणार असल्याने कंत्राटदारांकडून कामाबाबत होणाºया दिरंगाईला चाप बसणार आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारAmravatiअमरावती