शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

महानुभाव पंथीयांची काशी रिद्धपूर आता रेल्वेच्या नकाशावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 17:38 IST

महानुभाव पंथीयांची काशी म्हणून भारतभर प्रख्यात असलेल्या श्री क्षेत्र रिद्धपूर येथून अमरावती- नरखेड रेल्वे मार्ग जात आहे.

- गजानन मोहोड अमरावती -  महानुभाव पंथीयांची काशी म्हणून भारतभर प्रख्यात असलेल्या श्री क्षेत्र रिद्धपूर येथून अमरावती- नरखेड रेल्वे मार्ग जात आहे. या ठिकाणीच रेल्वे स्टेशनची निर्मिती करावी, अशी मागणी अ. भा. महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत गोपीराज बाबा शास्त्री यांनी लावून धरली. रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांच्या सुचनेनूसार नागरिकांनी श्रमदानातून मातीचा प्लॅटफार्म तयार केला, आता या ठिकाणी आता आषाढी यात्रेच्या मुहूर्तावर रेल्वे थांबणार आहे.प्रसिद्ध तीर्थश्रेत्र असल्यामुळेच रिद्धपूरला शासनाने ‘ब’ दर्जा दिला. रिद्धपूर या गावाच्या हद्दीत असतानादेखील कोळविहीर या गावाला रेल्वे स्टेशन बलविल्या गेले. श्रीक्षेत्र रिद्धपूरला देश-विदेशातील पर्यटक व भाविकांची सदैव गर्दी असते, येथे स्टेशन झाल्यास लगतच्या २० ते २५ गावांना फायदा होणार आहे. या खा. रामदास तडस यांचेसह महंत गोपीराजबाबा ७ मार्च २०१८ ला दिल्ली येथे जावून रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले. ना. गोयल यांनी आश्वासन देऊन नागपूरच्या अधिकाºयांशी फोनवरून चर्च्चा केली व  रिद्धपूर येथे रेल्वे स्टेशनला मान्यता प्रदान केली. नागपूरच्या अधिकाºयांनी जागेची पाहणी केली व ४०० मीटर लांबीचा प्लॉटफार्म निश्चित केला व मातीचा भराव घालण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला केल्यात. ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले तरी नागरिकांनी श्रमदान व लोकसहभागातून निधी गोळा केला व १३०० फूट लांब व २० फूट रूंद असा मातीचा प्लॉटफार्म तयार केला. २७ जुलै रोजी रिद्धपूरला आषाढी यात्रा आहे. या मुहूर्तावर रेल्वे थांबविण्याचा संकल्प खा. आनंदराव अडसूळ यांनी केला. नागपूर विभागीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष खा. रामदास तडस यांचे प्रयत्न व महंत गोपीराज बाबा शास्त्री यांच्या पाठपुराव्यामुळे श्रीक्षेत्र रिद्धपूर आता रेल्वेच्या नकाशावर येणार आहे.

असे आहे रिद्धपूरचे महात्ममराठी साहित्याची गंगोत्री म्हणून श्री क्षेत्र रिद्धपूर ओळखल्या जाते. मराठीचा आद्य ग्रंथ ‘लीळाचरीत्र’ येथे लिहिला गेला. यादवकालीन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक तथा दार्शनिक इतिहासाचे दर्शन या ग्रंथामधून होते. श्री गोमविंदप्रभूचे चरित्र आद्य मराठी कवयित्री महदंबेचे ‘धवळे’ हे काव्य या ठिकाणीच लिहिले गेले. महेश्वर पंडितांचे ‘ॠ षीपूर महात्मे’, नारायणव्यास बहाळिये यांचे ‘ॠ द्धीपूर वर्णन, कवी डिंभाचे ‘रिद्धपूर महात्म’, सारगंर्ध पुसदेकरांच्या ‘रिद्धपूर तीर्थमालिका’ आदी सुरस काव्यरचना रिद्धपूरचे वर्णन करतात. अमेरीकेचे डॉ. अ‍ॅन फिल्डहाऊस यांचे इंग्रजीमधील ‘ द डीड्स आॅफ गॉड इन रिद्धपूर हे पुस्तक अमेरिकेतील न्युयॉर्क येथून प्रसिद्ध झाल्याने रिद्धपूरची जगभर ओळख झाली. गोविंदप्रभुकालीन सात विहीरी आजही अस्तित्वात आहेत.

टॅग्स :AmravatiअमरावतीIndian Railwayभारतीय रेल्वे