शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

महानुभाव पंथीयांची काशी रिद्धपूर आता रेल्वेच्या नकाशावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 17:38 IST

महानुभाव पंथीयांची काशी म्हणून भारतभर प्रख्यात असलेल्या श्री क्षेत्र रिद्धपूर येथून अमरावती- नरखेड रेल्वे मार्ग जात आहे.

- गजानन मोहोड अमरावती -  महानुभाव पंथीयांची काशी म्हणून भारतभर प्रख्यात असलेल्या श्री क्षेत्र रिद्धपूर येथून अमरावती- नरखेड रेल्वे मार्ग जात आहे. या ठिकाणीच रेल्वे स्टेशनची निर्मिती करावी, अशी मागणी अ. भा. महानुभाव परिषदेचे अध्यक्ष महंत गोपीराज बाबा शास्त्री यांनी लावून धरली. रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांच्या सुचनेनूसार नागरिकांनी श्रमदानातून मातीचा प्लॅटफार्म तयार केला, आता या ठिकाणी आता आषाढी यात्रेच्या मुहूर्तावर रेल्वे थांबणार आहे.प्रसिद्ध तीर्थश्रेत्र असल्यामुळेच रिद्धपूरला शासनाने ‘ब’ दर्जा दिला. रिद्धपूर या गावाच्या हद्दीत असतानादेखील कोळविहीर या गावाला रेल्वे स्टेशन बलविल्या गेले. श्रीक्षेत्र रिद्धपूरला देश-विदेशातील पर्यटक व भाविकांची सदैव गर्दी असते, येथे स्टेशन झाल्यास लगतच्या २० ते २५ गावांना फायदा होणार आहे. या खा. रामदास तडस यांचेसह महंत गोपीराजबाबा ७ मार्च २०१८ ला दिल्ली येथे जावून रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन सादर केले. ना. गोयल यांनी आश्वासन देऊन नागपूरच्या अधिकाºयांशी फोनवरून चर्च्चा केली व  रिद्धपूर येथे रेल्वे स्टेशनला मान्यता प्रदान केली. नागपूरच्या अधिकाºयांनी जागेची पाहणी केली व ४०० मीटर लांबीचा प्लॉटफार्म निश्चित केला व मातीचा भराव घालण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला केल्यात. ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले तरी नागरिकांनी श्रमदान व लोकसहभागातून निधी गोळा केला व १३०० फूट लांब व २० फूट रूंद असा मातीचा प्लॉटफार्म तयार केला. २७ जुलै रोजी रिद्धपूरला आषाढी यात्रा आहे. या मुहूर्तावर रेल्वे थांबविण्याचा संकल्प खा. आनंदराव अडसूळ यांनी केला. नागपूर विभागीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष खा. रामदास तडस यांचे प्रयत्न व महंत गोपीराज बाबा शास्त्री यांच्या पाठपुराव्यामुळे श्रीक्षेत्र रिद्धपूर आता रेल्वेच्या नकाशावर येणार आहे.

असे आहे रिद्धपूरचे महात्ममराठी साहित्याची गंगोत्री म्हणून श्री क्षेत्र रिद्धपूर ओळखल्या जाते. मराठीचा आद्य ग्रंथ ‘लीळाचरीत्र’ येथे लिहिला गेला. यादवकालीन महाराष्ट्राच्या सांस्कृतिक तथा दार्शनिक इतिहासाचे दर्शन या ग्रंथामधून होते. श्री गोमविंदप्रभूचे चरित्र आद्य मराठी कवयित्री महदंबेचे ‘धवळे’ हे काव्य या ठिकाणीच लिहिले गेले. महेश्वर पंडितांचे ‘ॠ षीपूर महात्मे’, नारायणव्यास बहाळिये यांचे ‘ॠ द्धीपूर वर्णन, कवी डिंभाचे ‘रिद्धपूर महात्म’, सारगंर्ध पुसदेकरांच्या ‘रिद्धपूर तीर्थमालिका’ आदी सुरस काव्यरचना रिद्धपूरचे वर्णन करतात. अमेरीकेचे डॉ. अ‍ॅन फिल्डहाऊस यांचे इंग्रजीमधील ‘ द डीड्स आॅफ गॉड इन रिद्धपूर हे पुस्तक अमेरिकेतील न्युयॉर्क येथून प्रसिद्ध झाल्याने रिद्धपूरची जगभर ओळख झाली. गोविंदप्रभुकालीन सात विहीरी आजही अस्तित्वात आहेत.

टॅग्स :AmravatiअमरावतीIndian Railwayभारतीय रेल्वे