शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकमधील तांदूळ शासकीय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 05:00 IST

कोरोनाकाळात मिळत असलेले रेशनचे धान्य काही जणांकडून विकले जात आहे. यात धान्य तस्कराची चांदी झाली आहे. या गैरप्रकाराकडे स्थानिक पुरवठा विभागाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतर्फे केला जात आहे. अंजनगाव सुर्जी, परतवाडा व चांदूर बाजार येथे शासकीय धान्याची खरेदी करून खुल्या बाजारात आणणारे तस्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.

ठळक मुद्देचौकशीची मागणी : दुभाजकावर चढल्याने वाहनाला अपघात; तालुक्यात धान्य तस्कर सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यात शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास अंजनगाव सुर्जीहून चांदूर बाजारात दाखल झालेला तांदुळाने भरलेला ट्रक जमापूर फाट्याजवळ रस्ता दुभाजकावर चढल्याने अपघातग्रस्त झाला. या ट्रकमध्ये असलेला तांदळाचा साठा तस्करांनी अवघ्या काही तासांतच गायब केला. मात्र, त्याचा सांडलेला सडा पुरावा देत होता. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकविरुद्ध गुन्हा नोंदवित थातूरमातूर कारवाई केली. त्यामुळे हा तांदूळ शासकीय धान्य कोट्यातील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे.कोरोनाकाळात मिळत असलेले रेशनचे धान्य काही जणांकडून विकले जात आहे. यात धान्य तस्कराची चांदी झाली आहे. या गैरप्रकाराकडे स्थानिक पुरवठा विभागाचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतर्फे केला जात आहे. अंजनगाव सुर्जी, परतवाडा व चांदूर बाजार येथे शासकीय धान्याची खरेदी करून खुल्या बाजारात आणणारे तस्कर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.शुक्रवारी रात्री झालेल्या अपघातात या तस्करांचे चेहेरे उघड पडणार होते. मात्र, पोलिसांनी वाहनात कशाचा माल आहे, याची पाहणीच केली नसल्याची माहिती दिली.अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसतानाही ट्रकचालक पसार झाल्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. स्थानिक पोलिसांनी तांदूळ साठ्याचा मालक व ट्रकमालकाविरुद्ध कारवाई केलेली नाही. त्याच वेळी परिसरातील नागरिकांनी तसेच ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ साठा असल्याची माहिती दिली. तो तातडीने रिकामा करण्यात आला तरी काही तांदूळ घटनास्थळीच पडून होते. एकंदर प्रकार पाहता, ट्रकमध्ये शासकीय तांदूळ असल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे.अपघातानंतर ठाण्याची वारीट्रकच्या अपघातानंतर चांदूर बाजार येथील एक धान्य तस्कर व अंजनगाव सुर्जी येथील धान्य तस्कर पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे अनेकांनी बघितले. त्यानंतरही पोलिसांनी केलेल्या थातूरमातूर कारवाईने संशय निर्माण केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तसेच तालुक्यातील रेशन दुकानांतील धान्य खरेदी करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतर्फे केली जात आहे.आम्ही केवळ अपघाताची नोंद घेतली. अपघातग्रस्त ट्रकमध्ये नेमके काय होते. त्याबाबत चौकशी केलेली नाही. चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई करता येईल.- उदयसिंग साळुंके,ठाणेदार, चांदूरबाजार.

टॅग्स :Accidentअपघात