शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

सहा हजार गावांतील दुष्काळस्थितीकडे ‘महसूल’ची डोळेझाक 

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: November 1, 2023 17:41 IST

सुधारीत ५३ पैसेवारी : १३७८ गावांमध्ये ५० टक्क्यांच्या आत पैसेवारी जाहीर

अमरावती : ऐन हंगामात पावसाची तूट व पीकवाढीच्या काळात ऑगस्ट महिन्यात मोठा खंड यामुळे सरासरी उत्पादनात कमी येणार आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील सुधारित पैसेवारी ५३ टक्के विभागीय आयुक्तांद्वारा मंगळवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये १३७८ गावांत दुष्काळसदृश स्थिती दर्शविण्यात आली तर ५८६१ गावांमध्ये ५० टक्क्यांवर पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

विभागात यंदाच्या पावसाळ्यात फक्त यवतमाळ जिल्ह्यात पावसाने सरासरी पार केलेली आहे. उर्वरित चार जिल्ह्यांत १५ ते ३२ टक्क्यांपर्यंत तूट राहिलेली आहे. माॅन्सून उशिरा आल्याने पेरणीला महिनाभर झालेला उशीर व त्यानंतर पिकेवाढीच्या काळात ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवसांपर्यंत अनेक तालुक्यात पावसाचा खंड राहिलेला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर नजरअंदाज ६० पैसेवारी २८ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती.यामध्ये सुधारणेला वाव असल्याने ३१ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणाऱ्या सुधारित पैसेवारीत विभागाचे काय चित्र राहते, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, अमरावती जिल्ह्यातील ४९४, वाशिम जिल्ह्यातील ७९३ व बुलडाणा जिल्ह्यातील ९१ गावांमध्ये ५० टक्क्यांच्या आत पैसेवारी विभागीय आयुक्तांद्वारा जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र ५८६१ गावांतील दुष्काळसदृश स्थितीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.५० टक्क्यांवर पैसेवारी असलेली जिल्हानिहाय गावे

अमरावती जिल्ह्यात १४९६ गावांत ५४, अकोला जिल्ह्यात ९९० गावांमध्ये ५३, यवतमाळ जिल्ह्यात २०४६ गावांमध्ये ५४ व बुलडाणा जिल्ह्यात १३२९ गावांमध्ये ५५ तसेच वाशिम जिल्ह्यातील सर्व ७९३ गावांमध्ये ४८ पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. विभागातील ७२३९ गावांमध्ये सरासरी ५३ पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रdroughtदुष्काळFarmerशेतकरीAmravatiअमरावती