शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

सहा हजार गावांतील दुष्काळस्थितीकडे ‘महसूल’ची डोळेझाक 

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: November 1, 2023 17:41 IST

सुधारीत ५३ पैसेवारी : १३७८ गावांमध्ये ५० टक्क्यांच्या आत पैसेवारी जाहीर

अमरावती : ऐन हंगामात पावसाची तूट व पीकवाढीच्या काळात ऑगस्ट महिन्यात मोठा खंड यामुळे सरासरी उत्पादनात कमी येणार आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भातील सुधारित पैसेवारी ५३ टक्के विभागीय आयुक्तांद्वारा मंगळवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये १३७८ गावांत दुष्काळसदृश स्थिती दर्शविण्यात आली तर ५८६१ गावांमध्ये ५० टक्क्यांवर पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

विभागात यंदाच्या पावसाळ्यात फक्त यवतमाळ जिल्ह्यात पावसाने सरासरी पार केलेली आहे. उर्वरित चार जिल्ह्यांत १५ ते ३२ टक्क्यांपर्यंत तूट राहिलेली आहे. माॅन्सून उशिरा आल्याने पेरणीला महिनाभर झालेला उशीर व त्यानंतर पिकेवाढीच्या काळात ऑगस्ट महिन्यात २१ ते २५ दिवसांपर्यंत अनेक तालुक्यात पावसाचा खंड राहिलेला आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर नजरअंदाज ६० पैसेवारी २८ सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती.यामध्ये सुधारणेला वाव असल्याने ३१ ऑक्टोबरला जाहीर करण्यात येणाऱ्या सुधारित पैसेवारीत विभागाचे काय चित्र राहते, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, अमरावती जिल्ह्यातील ४९४, वाशिम जिल्ह्यातील ७९३ व बुलडाणा जिल्ह्यातील ९१ गावांमध्ये ५० टक्क्यांच्या आत पैसेवारी विभागीय आयुक्तांद्वारा जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र ५८६१ गावांतील दुष्काळसदृश स्थितीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.५० टक्क्यांवर पैसेवारी असलेली जिल्हानिहाय गावे

अमरावती जिल्ह्यात १४९६ गावांत ५४, अकोला जिल्ह्यात ९९० गावांमध्ये ५३, यवतमाळ जिल्ह्यात २०४६ गावांमध्ये ५४ व बुलडाणा जिल्ह्यात १३२९ गावांमध्ये ५५ तसेच वाशिम जिल्ह्यातील सर्व ७९३ गावांमध्ये ४८ पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. विभागातील ७२३९ गावांमध्ये सरासरी ५३ पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रdroughtदुष्काळFarmerशेतकरीAmravatiअमरावती