शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

चांदुरबाजारात महसूल, नगरपालिकेची पथके बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:13 IST

पान २ ची लिड चांदूर बाजार : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जमावबंदी जाहीर केली. ...

पान २ ची लिड

चांदूर बाजार : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जमावबंदी जाहीर केली. तसेच जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी लक्षात घेता रात्रीची संचारबंदी सुरू आहे. मात्र, तालुक्यात संचारबंदीच्या वेळेतही अनेक प्रतिष्ठाने सुरू राहत असल्याने याकडे पालिका प्रशासन व तालुका प्रशासनातर्फे दुर्लक्ष केले जात आहे. शहर व तालुक्यात महसूल व नगरपालिकेची पथके बेपत्ता झाली आहेत. ग्रामीण भागात २०० ते ३०० नागरिकांच्या उपस्थितीत लग्न होत असताना कुठलीही कारवाई केली जात नाही. कोरोनाची स्थिती नेमेची येतो पावसाळा अशी झाली आहे. कुणीही त्याबाबत फारसे सजग नाही. ना सामान्य लोक ना प्रशासन. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तर निव्वळ कागदावर आहे.

दीड महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वाढला आहे. ते पाहता जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठाने सायंकाळी पाचनंतर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तहसीलस्तरावर मात्र या आदेशाला चांदूर बाजार तालुक्यात तिलांजली दिली जात आहे. सायंकाळी ५ वाजतानंतर अनेक दुकाने, पान टपऱ्या, पाणीपुरीचा गाड्या सर्रास सुरू असतात. तसेच बार व रेस्टॉरंटही सुरू असतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला डावलून बाजारपेठेत सुरू असलेल्या दुकानांवर पालिका प्रशासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष चालविले आहे. तसेच ग्रामीण भागातील हॉटेल, हातगाड्यांवरील भेळ, गुपचूपच्या गाड्यासुद्धा सर्रास सुरू असतात. यावर तालुका यंत्रणेचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे. शहरात ऑटो, काली-पिवळी वाहनातून प्रशासनाने आखून दिलेल्या नियमाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची सर्रास वाहतूक केली जात आहे. यावर तालुका प्रशासनातर्फे कोणतीच कार्यवाही करताना दिसत नसल्याचे नागरिकांतर्फे बोलले जात आहे.

बॉक्स

किरकोळ दुकानदारांना फटका

कोरोना विषाणूचा देशात पुन्हा शिरकाव झाला असून सर्वाधिक संशयित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. धोक्याची घंटा लक्षात घेता जिल्ह्यात या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी शासन स्तरावरून विविध निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांनी गर्दी टाळणे हा यावरचा प्रतिबंधात्मक उपाय असल्याने प्रशासन स्तरावर सातत्याने आव्हान केले जात आहे. संसर्गजन्य असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता. मात्र, या जनता कर्फ्यूचा फटका केवळ किरकोळ दुकानदारांना बसला आहे.

बॉक्स

प्रशासन बेवचक

अद्यापही जिल्ह्यातील आठवडी बाजार व मंगल कार्यालय बंद आहे. मंगल प्रतिष्ठान सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार व्यापारी वर्गातर्फे मागणी करण्यात आली. तरीही संबंधित प्रतिष्ठाने अद्यापपर्यंत उघडण्यात आलेली नाही. मात्र, जी प्रतिष्ठाने सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. ती प्रतिष्ठाने सायंकाळी साडेसहापर्यंत सर्रास उघडी असतात. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून वचक राहिला नसल्याचे बोलले जात आहे.