शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

चांदुरबाजारात महसूल, नगरपालिकेची पथके बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:13 IST

पान २ ची लिड चांदूर बाजार : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जमावबंदी जाहीर केली. ...

पान २ ची लिड

चांदूर बाजार : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जमावबंदी जाहीर केली. तसेच जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी लक्षात घेता रात्रीची संचारबंदी सुरू आहे. मात्र, तालुक्यात संचारबंदीच्या वेळेतही अनेक प्रतिष्ठाने सुरू राहत असल्याने याकडे पालिका प्रशासन व तालुका प्रशासनातर्फे दुर्लक्ष केले जात आहे. शहर व तालुक्यात महसूल व नगरपालिकेची पथके बेपत्ता झाली आहेत. ग्रामीण भागात २०० ते ३०० नागरिकांच्या उपस्थितीत लग्न होत असताना कुठलीही कारवाई केली जात नाही. कोरोनाची स्थिती नेमेची येतो पावसाळा अशी झाली आहे. कुणीही त्याबाबत फारसे सजग नाही. ना सामान्य लोक ना प्रशासन. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तर निव्वळ कागदावर आहे.

दीड महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वाढला आहे. ते पाहता जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठाने सायंकाळी पाचनंतर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तहसीलस्तरावर मात्र या आदेशाला चांदूर बाजार तालुक्यात तिलांजली दिली जात आहे. सायंकाळी ५ वाजतानंतर अनेक दुकाने, पान टपऱ्या, पाणीपुरीचा गाड्या सर्रास सुरू असतात. तसेच बार व रेस्टॉरंटही सुरू असतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला डावलून बाजारपेठेत सुरू असलेल्या दुकानांवर पालिका प्रशासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष चालविले आहे. तसेच ग्रामीण भागातील हॉटेल, हातगाड्यांवरील भेळ, गुपचूपच्या गाड्यासुद्धा सर्रास सुरू असतात. यावर तालुका यंत्रणेचे हेतुपुरस्सर दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांतर्फे केला जात आहे. शहरात ऑटो, काली-पिवळी वाहनातून प्रशासनाने आखून दिलेल्या नियमाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची सर्रास वाहतूक केली जात आहे. यावर तालुका प्रशासनातर्फे कोणतीच कार्यवाही करताना दिसत नसल्याचे नागरिकांतर्फे बोलले जात आहे.

बॉक्स

किरकोळ दुकानदारांना फटका

कोरोना विषाणूचा देशात पुन्हा शिरकाव झाला असून सर्वाधिक संशयित रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. धोक्याची घंटा लक्षात घेता जिल्ह्यात या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी शासन स्तरावरून विविध निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांनी गर्दी टाळणे हा यावरचा प्रतिबंधात्मक उपाय असल्याने प्रशासन स्तरावर सातत्याने आव्हान केले जात आहे. संसर्गजन्य असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता. मात्र, या जनता कर्फ्यूचा फटका केवळ किरकोळ दुकानदारांना बसला आहे.

बॉक्स

प्रशासन बेवचक

अद्यापही जिल्ह्यातील आठवडी बाजार व मंगल कार्यालय बंद आहे. मंगल प्रतिष्ठान सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार व्यापारी वर्गातर्फे मागणी करण्यात आली. तरीही संबंधित प्रतिष्ठाने अद्यापपर्यंत उघडण्यात आलेली नाही. मात्र, जी प्रतिष्ठाने सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. ती प्रतिष्ठाने सायंकाळी साडेसहापर्यंत सर्रास उघडी असतात. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून वचक राहिला नसल्याचे बोलले जात आहे.