शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

परतीच्या पावसाने घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 5:00 AM

गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र संततधार पावसामुळे सोयाबीन पिकावर रोगराईने पीक खराब झाले आहे. पिकांवर आलेल्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी शेतकरी निरनिराळ्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. पण, पावसात औषधांची केलेली फवारणी धुवून निघत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन व तूर पिकांची लागवड करतात.

ठळक मुद्देखर्च निघणेही कठीण : शेतात पाणी, तूर-कपाशी पिकासाठी धोकादायक

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : जिल्ह्यात मोसमी पाऊस सर्वत्र संततधार कोसळल्यानंतर आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अगोदर संततधार पावसाने पिकांवर आलेल्या रोगराईने हाहाकार माजविला. त्यात सखल भागातील काही शेतांमध्ये अजूनही पाणी साचले आहे. आता परतीचा पाऊस आला, तर तूर, सोयाबीन, मिरची पिकांसाठी तो धोकादायक ठरणार आहे.गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र संततधार पावसामुळे सोयाबीन पिकावर रोगराईने पीक खराब झाले आहे. पिकांवर आलेल्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी शेतकरी निरनिराळ्या कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. पण, पावसात औषधांची केलेली फवारणी धुवून निघत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने सोयाबीन व तूर पिकांची लागवड करतात. परंतु, गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन पिकाला भाव नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशी पिकाची लागवड केली. काही शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची लागवड केली होती. मात्र, यंदा दमदार हजेरी लावणाऱ्या पावसात ही पिके कोलमडून पडली. सोयाबीन पीक यंदा कमी पावसामुळे येणार की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना वाटू लागली होती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाने अर्धा पावसाळा उलटल्यावर आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थीपासून पावसाने कहरच केला. यादरम्यान संततधार पावसाने अनेकदा शेतात पाणी साचले होते. या साचलेले पाण्याने पिकांवर निरनिराळ्या रोगांनी खरीप पिके धोक्यात आली, शिवाय ती पिवळी पडली.आधीच सततच्या पावसाने खरीप पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला. परंतु, आता सोयाबीन पीक हातात आले असताना, ऐन मळणीच्या वेळीच परतीचा पाऊस कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक होत्याचे नव्हते झाले आहे. हाती काहीच आलेले नसल्याने तूर, कपाशी पिकावर आलेल्या रोगाकरिता औषधाची फवारणी कशी करावी, असा प्रश्नही शेतकऱ्यांपुढे आहे.तालुक्यात सोयाबीन पिकावर रोग आला असल्याने कुठे पिकांमध्ये जनावरे घातली, तर काही शेतकऱ्यांनी तीन महिन्यांची वाया जाऊ नये म्हणून मिळेल ते पीक काढून घेण्यासाठी धडपड चालविली आहे. त्यांना अवघे एकरी दोन ते तीन क्विंटल सोयाबीन पीक मिळत आहे.कोरोनाकाळात प्रदूषणाला आळा बसल्याने पाऊस चांगला कोसळण्याचे भाकीत वर्तविले जात होते. त्यानुसार पाऊसदेखील कोसळला. मात्र, त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला नाही. खरिपाच्या सुरुवातीपासून पिकांच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांनी खर्च केला. मात्र, आज पीक घरात येताना मोबदला तर दूर, खर्च निघणेही कठीण झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती