शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

दिवाळीनंतर परतीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST

दिवाळीत घर गाठण्यासाठी अनेकांनी दोन महिन्यांपूर्वीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळविले. वेळेवर ज्यांना दिवाळीत घर गाठायचे होते, अशांनी रेल्वे दलालांकडून चढ्या दरात तिकीट मिळविले. घर गाठण्याची कशीतरी व्यवस्था झाली. दिवाळीत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आता अनेकांना परत जाण्याचे वेध लागले आहेत.

ठळक मुद्देरेल्वेमध्ये चिक्कार गर्दी : ट्रॅव्हल्सचे अव्वाच्या सव्वा दर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बाहेरगावी नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि रोजगारासाठी असलेल्यांनी कसेबसे दिवाळीत घर गाठले. मात्र, दिवाळी आप्तस्वकीयांसह साजरी केल्यानंतर आता परतीचे वेध लागले आहेत. तथापि, परतीचा प्रवास कसा करावा, हा गंभीर प्रश्न अनेकांपुढे निर्माण झालेला आहे. रेल्वे गाड्यांमध्ये चिक्कार गर्दी, तर ट्रॅव्हल्स संचालक अव्वाच्या सव्वा दर आकारत असल्यामुळे परतीच्या प्रवासाचे नियोजन कोलमडण्याचे संकेत आहेत.दिवाळीत घर गाठण्यासाठी अनेकांनी दोन महिन्यांपूर्वीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळविले. वेळेवर ज्यांना दिवाळीत घर गाठायचे होते, अशांनी रेल्वे दलालांकडून चढ्या दरात तिकीट मिळविले. घर गाठण्याची कशीतरी व्यवस्था झाली. दिवाळीत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आता अनेकांना परत जाण्याचे वेध लागले आहेत. मात्र, रेल्वे गाड्यांमध्ये नोव्हेंबरपर्यंत ‘नो रूम’ असे आरक्षण खिडक्यांवर झळकत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदाबाद, सुरत, दिल्ली, चेन्नै आदी मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळेनासे झाले आहे. विशेषत: ट्रॅव्हल्स संचालकांनी अमरावतीवरून नाशिक, पुणे, औरंगाबादचे प्रवास भाडे दुप्पट, तिप्पट आकारण्याची शक्कल लढविली आहे. रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण नाही, तर ट्रॅव्हल्सचे अव्वाच्या सव्वा दर असल्याने दिवाळीत कुटुंबीयांसह घरी आलेल्यांना परत कसे जावे, हाच गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.अमरावती-मुंबई, नागपूर-पुणे गरीब रथ, गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, हावडा-मुंबई मेल, अमरावती-पुणे एक्स्प्रेस, हावडा-पुणे सुपर डिलक्स, भुसावळ-निझामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस आदी महत्वाच्या रेल्वे गाड्यांमध्ये चिक्कार गर्दी आहे. दिवाळीतील गर्दी हेरून काही रेल्वे तिकीट दलालांनी जादा आरक्षण करून ठेवले आहे. आता रेल्वे गाड्यांच्या आरक्षणासाठी तिप्पट दर घेण्यात येत आहे तसेच बुधवारपासून नोकरदारांना कार्यालय गाठावे लागत असल्याने मंगळवारी प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे चढ्या दरात तिकीट घेत प्रवासाचे नियोजन करण्याला काही जणांनी पसंती दिली आहे.रेल्वे तिकीट दलालांची ‘बल्ले बल्ले’मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर असे तीन महिने रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळणार नाही, अशी स्थिती आहे. रेल्वे तिकीट दलालांनी पुणे, मुंबई प्रवासाचे आरक्षण अगोदरच बूक केले आहे. आता रेल्वेत आरक्षण नाही. त्यामुळे नाइलाजास्तव दिवाळीत घरी आलेल्यांना दलालांकडून अतिरिक्त दरात रेल्वे आरक्षणाचे तिकीट घेऊन सोय करावी लागत आहे. दिवाळीनंतर खºया अर्थाने रेल्वे तिकीट दलालांची ‘बल्ले बल्ले’ असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे