शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतर परतीचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:01 IST

दिवाळीत घर गाठण्यासाठी अनेकांनी दोन महिन्यांपूर्वीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळविले. वेळेवर ज्यांना दिवाळीत घर गाठायचे होते, अशांनी रेल्वे दलालांकडून चढ्या दरात तिकीट मिळविले. घर गाठण्याची कशीतरी व्यवस्था झाली. दिवाळीत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आता अनेकांना परत जाण्याचे वेध लागले आहेत.

ठळक मुद्देरेल्वेमध्ये चिक्कार गर्दी : ट्रॅव्हल्सचे अव्वाच्या सव्वा दर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बाहेरगावी नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि रोजगारासाठी असलेल्यांनी कसेबसे दिवाळीत घर गाठले. मात्र, दिवाळी आप्तस्वकीयांसह साजरी केल्यानंतर आता परतीचे वेध लागले आहेत. तथापि, परतीचा प्रवास कसा करावा, हा गंभीर प्रश्न अनेकांपुढे निर्माण झालेला आहे. रेल्वे गाड्यांमध्ये चिक्कार गर्दी, तर ट्रॅव्हल्स संचालक अव्वाच्या सव्वा दर आकारत असल्यामुळे परतीच्या प्रवासाचे नियोजन कोलमडण्याचे संकेत आहेत.दिवाळीत घर गाठण्यासाठी अनेकांनी दोन महिन्यांपूर्वीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण मिळविले. वेळेवर ज्यांना दिवाळीत घर गाठायचे होते, अशांनी रेल्वे दलालांकडून चढ्या दरात तिकीट मिळविले. घर गाठण्याची कशीतरी व्यवस्था झाली. दिवाळीत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आता अनेकांना परत जाण्याचे वेध लागले आहेत. मात्र, रेल्वे गाड्यांमध्ये नोव्हेंबरपर्यंत ‘नो रूम’ असे आरक्षण खिडक्यांवर झळकत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदाबाद, सुरत, दिल्ली, चेन्नै आदी मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळेनासे झाले आहे. विशेषत: ट्रॅव्हल्स संचालकांनी अमरावतीवरून नाशिक, पुणे, औरंगाबादचे प्रवास भाडे दुप्पट, तिप्पट आकारण्याची शक्कल लढविली आहे. रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण नाही, तर ट्रॅव्हल्सचे अव्वाच्या सव्वा दर असल्याने दिवाळीत कुटुंबीयांसह घरी आलेल्यांना परत कसे जावे, हाच गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.अमरावती-मुंबई, नागपूर-पुणे गरीब रथ, गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, हावडा-मुंबई मेल, अमरावती-पुणे एक्स्प्रेस, हावडा-पुणे सुपर डिलक्स, भुसावळ-निझामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस आदी महत्वाच्या रेल्वे गाड्यांमध्ये चिक्कार गर्दी आहे. दिवाळीतील गर्दी हेरून काही रेल्वे तिकीट दलालांनी जादा आरक्षण करून ठेवले आहे. आता रेल्वे गाड्यांच्या आरक्षणासाठी तिप्पट दर घेण्यात येत आहे तसेच बुधवारपासून नोकरदारांना कार्यालय गाठावे लागत असल्याने मंगळवारी प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे चढ्या दरात तिकीट घेत प्रवासाचे नियोजन करण्याला काही जणांनी पसंती दिली आहे.रेल्वे तिकीट दलालांची ‘बल्ले बल्ले’मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर असे तीन महिने रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळणार नाही, अशी स्थिती आहे. रेल्वे तिकीट दलालांनी पुणे, मुंबई प्रवासाचे आरक्षण अगोदरच बूक केले आहे. आता रेल्वेत आरक्षण नाही. त्यामुळे नाइलाजास्तव दिवाळीत घरी आलेल्यांना दलालांकडून अतिरिक्त दरात रेल्वे आरक्षणाचे तिकीट घेऊन सोय करावी लागत आहे. दिवाळीनंतर खºया अर्थाने रेल्वे तिकीट दलालांची ‘बल्ले बल्ले’ असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे