शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

राठोडसह तिघांचे सेवानिवृत्तीनंतरचे लाभ ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : जिल्ह्यातील सुमारे सहा लाख शेतकरी, शिक्षक व अन्य खातेदारांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : जिल्ह्यातील सुमारे सहा लाख शेतकरी, शिक्षक व अन्य खातेदारांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील प्रशासकीय वर्तुळ गुन्हे दाखल झाल्याने कमालीचे घाबरले आहे. बँकेच्या तत्कालीन सीईओंसह एकूण पाच अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध १५ जून रोजी फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. त्या अनुषंगाने गुन्हे दाखल झालेल्या तीन अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे एकूणच लाभ थांबविण्यात आले आहेत.

जिल्हा बँकेने केलेल्या ७०० कोटी रुपयांच्या खासगी गुंतवणुकीपोटी ३ कोटी ३९ लाख रुपये दलाली दिली गेली. याप्रकरणी बॅँकेचे प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांच्या तक्रारीवरून बँकेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जे.सी. राठोड, निधी व लेखा अधिकारी निळकंठ बी. जगताप, मुख्य अधिकारी (प्रशासन) सुधीर ब. चांदूरकर, सांख्यिकी अधिकारी राजेंद्र गणेशराव कडू, लेखा विभागातील कर्मचारी रोहिणी सुभाष चौधरी यांच्यासह शेअर व म्युचुअल फंडचे दलाल अजितपाल हरिसिंग मोंगा, नीता राजेंद्र गांधी, पुरुषोत्तम रेड्डी, शोभा मधुसूदन शर्मा, शिवकुमार गोकुलदास गट्टाणी व राजेंद्र मोतीलाल गांधी यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१ व १२० ब अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

दरम्यान, जानेवारी महिन्यात हे दलाली प्रकरण उघड झाल्यानंतर १९ जानेवारी २०२१ रोजी सांख्यिकी अधिकारी राजेंद्र कडू यांना निलंबित करण्यात आले. लेखा विभागातील महिला कर्मचाऱ्याची मुख्य कार्यालयात बदली करण्यात आली. आता त्या महिला कर्मचाऱ्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे.

एकट्यावरच निलंबनाची कारवाई

राजेंद्र कडू यांना १९ जानेवारी रोजी याच प्रकरणामुळे निलंबित करण्यात आले. कडूंसह अन्य चार अधिकारी कर्मचाऱ्यांवरदेखील लेखापरीक्षण अहवालात ठपका ठेवण्यात आला. मात्र, त्यानंतर १० फेब्रुवारी २०२१ रोजी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले जे.सी. राठोड हे सेवानिवृत्त झाले. तत्पूर्वी, सुधीर चांदूरकर हे डिसेंबर २०२० मध्ये निवृत्त झाले. सोबतच जगतापदेखील नियत वयोमानानुसार निवृत्त झाले. हे आर्थिक अनियमिततेचे प्रकरण उघड झाल्यानंतर या तीनही निवृत्त अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतर दिले जाणारे आर्थिक लाभ थांबविण्यात आले आहेत.

-----------

अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव

३.३९ कोटी रुपयांची दलाली दिल्याप्रकरणी ११ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले, तर दुसऱ्याच दिवशी हे प्रकरण तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. त्यामुळे आपल्याला केव्हाही अटक होऊ शकते, या भीतीपोटी काहींनी अटकपूर्व जामिनासाठी धडपड चालविली आहे. आर्थिक गुन्हे शाखादेखील तपासाला वेग देणार आहे.

---------

पूर्वीच कडू यांना निलंबित करण्यात आले, तर गुन्हे दाखल झालेल्या तिघा सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे निवृत्तीनंतरचे आर्थिक लाभ थांबविण्यात आले. ज्या कार्यरत कर्मचारी महिलेविरुद्ध गुन्हे दाखल झाले, त्यांच्याविरुद्ध कारवाई प्रस्तावित आहे.

- संदीप जाधव, प्राधिकृत अधिकारी, जिल्हा बँक, अमरावती