शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

अभियांत्रिकीचे प्राचार्य, प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 11:24 AM

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६२ व ६० वरून ७० व ६५ वर्षे अनुक्रमे केले आहे.

ठळक मुद्देअमरावती विद्यापीठाचे दिशानिर्देशराज्यपालांकडे तक्रार, संभ्रम दूर करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६२ व ६० वरून ७० व ६५ वर्षे अनुक्रमे केले आहे. असाधारण दिशानिर्देश ५०/२०१९ अन्वये १३ डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले आहे. शासनाची परवानगी न घेता वय वाढविल्याप्रकरणी राज्यपालांकडे तक्रार करण्यात आली असून, याबाबत संभ्रम दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे संचालक नितीन हिवसे यांनी अमरावती विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाची तक्रार केली आहे. प्राचार्य अथवा प्राध्यापकांचे निवृत्तीचे वय वाढविणे किंवा कमी करणे हे अधिकार शासनाला आहे. मात्र, अमरावती विद्यापीठाने दिशानिर्देशाचा आधार घेत अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६२ वरून ७० आणि प्राध्यापकांचे ६० वरून ६५ वर्ष वाढविली आहे. या दिशानिर्देशामुळे निवृत्ती संबंधी महाविद्यालयीन प्रशासन आणि संस्था चालकांची अडचण झाली आहे. त्यामुळे संस्थाचालकांनी शासन की, विद्यापीठ कुणाचे नियम पाळावे, ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. राज्यात इतर अभियांत्रिकी महाविद्यालयांत शासन नियमानुसार निवृत्तीचे वय ग्राह्य धरण्यात येते. अमरावती विद्यापीठाने निर्गमित केलेल्या अध्यादेशाने अभियांत्रिकी महाविद्यालयांत एकच गोंधळ उडाला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांचे निवत्ती वयाबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नसताना अचानक अमरावती विद्यापीठाने निवृत्तीचे वय बदलविल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. हा संभ्रम राज्यपालांनी दूर करावा, अशी मागणी नितीन हिवसे यांनी केली आहे. याप्रकरणी केंद्र व राज्य शासनाकडे तक्रार पाठविली आहे.२३ अभियांत्रिकीमध्ये संभ्रमाची स्थितीअमरावती विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांत २३ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. विद्यापीठाने दिशानिर्देश जारी करून प्राचार्य, प्राध्यापकांच्या निवृत्तीत वाढ केल्यामुळे महाविद्यालयीन प्रशासन गोंधळले आहे. नेमके निवृत्तीचे वय कोणते ग्राह्य धरावे, याबाबत स्पष्टता नाही. संस्थाचालकही ठोस निर्णय घेऊ शकत नाही, हे वास्तव आहे. आता याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.विद्यापीठाकडे उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे दिशानिर्देश काढले आहे. शासनाच्या गाइडलाइननुसार कार्यवाही करण्यात आली आहे.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र