शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

कुपोषणमुक्तीचा संकल्प, विकासकामांना प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:24 IST

प्र्रभावी संपर्क यंत्रणा, डेडिकेटेड टीमवर्कद्वारे यंदा मेळघाटमधील कुपोषण निर्मूलनाचा जिल्हा प्रशासनाचा संकल्प आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : वर्षभरात नियोजित कामांचे प्रारूप तयार

आॅनलाईन लोकमतअमरावती : प्र्रभावी संपर्क यंत्रणा, डेडिकेटेड टीमवर्कद्वारे यंदा मेळघाटमधील कुपोषण निर्मूलनाचा जिल्हा प्रशासनाचा संकल्प आहे. यासह जिल्ह्यात जनकल्याणाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वर्षभऱ्यात नियोजित कामांचे प्रारूप तयार असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सांगितले.मेळघाटात भक्कम आरोग्य यंत्रणेसह विविध विकासकामांची भरीव अंमलबजावणी करण्यात येत आहे. सर्वांसाठी घरे, कृषी पंप वीज जोडणी, जलयुक्त शिवार योजना, धडक सिंचन विहिरी, मागेल त्याला शेततळे, आवास योजनांसह यंदाच्या वर्षात प्रशासनाकडून होणाºया नव्या कामांची आखणी व गतवर्षी झालेल्या कामांचा आढावा जिल्हाधिकाºयांनी घेतला. मेळघाटातील दिया येथील सिपना नदीवरील सौर ऊर्जाधारित उपसा सिंचन योजना व चिखलदरा-धारणीत दुध उत्पादनासाठीचे क्लस्टर अशा विविध कामांमुळे रोजगार निर्मितीसह अपारंपरिक ऊर्जा निमितीला गती देण्याचा प्रयत्न आहे. दुग्ध उत्पादन व त्यातून रोजगारनिर्मितीचे मदर डेअरीचे सहकार्य मिळाले आहे. त्याला जोडूनच वॉटर कपअंतर्गत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर केली जाणार आहेत.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी पदांची भरती नुकतीच करण्यात आली. मेळघाटात प्रथम श्रेणी डॉक्टरांसह विशेष तज्ज्ञही नेमण्याचे नियोजन आहे. मेघाटात कुपोषण निर्मूलनासाठी ग्रामपातळीवरील विविध अधिकारी, कर्मचाºयांचा समन्वय, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती यासह स्वयंसेवी संस्था व इतर संस्थांचे सहकार्य मिळविण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ३० डिसेंबरपर्यंत ८५ हजारांवर शेतकºयांना लाभ मिळाला. जिल्ह्यात रेमण्डसारखा भव्य प्रकल्प सुरू झाला. वस्त्रोद्योग पार्कसह इतरही विविध उद्योगांना चालना देऊन तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सांगितले.कृषी संजीवनीमुळे विकासाला गतीमागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत १८०० शेततळे पूर्ण झाले आहेत. या कामाला गती देण्यासाठी कृषी सहायकांना उद्दिष्ट देण्यात आले आहेत. जलयुक्त शिवार योजनेत खारपाणपट्ट्यात २७ गावांतील २४६ काम सुरू आहेत. सद्यस्थितीत ३,६०० कामे पूर्णत्वास गेली आहेत. खारपाणपट्ट्यावर लक्ष केंद्रित करून तिथे शेततळ्यांचे अधिक उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत. यासह नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामुळे विकास प्रक्रियेला गती मिळेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.