शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

अपहरण झालेल्या प्रतीकची स्वत:च्या धाडसानेच सुटका

By admin | Updated: August 21, 2015 00:42 IST

स्थानिक पांढुर्णा चौकातून एका १४ वर्षीय मुलाचे अपहरण करुन नागपूरच्या दिशेने पळून नेल्याची घटना १७ आॅगष्ट रोजी घडली.

वरूड येथील घटना : पोलीस करणार प्रकरणाचा तपासवरूड : स्थानिक पांढुर्णा चौकातून एका १४ वर्षीय मुलाचे अपहरण करुन नागपूरच्या दिशेने पळून नेल्याची घटना १७ आॅगष्ट रोजी घडली. अपहरणकर्त्यांनी कार थांबवून लघुशंकेला उतरल्याची संधी साधून प्रतीकने कारमधून पळ काढला. अखेर रात्री १२ वाजतादरम्यान आडमार्गाने सीताबर्डी ठाण्यात पोहोचल्याने संभाव्य अनर्थ टळला. परंतु या घटनेमुळे शहरात खळबळ माजली होती. नागपूरच्या पोलिसांनी या बालकाला आईवडीलाच्या त्याब्यात दिले. घटनेविषयी शंका व्यक्त करुन उलटसुलट चर्चा होत असल्याने वरुड पोलीस घटनेचा तपास करणार असल्याचे सांगितले. स्थानिक न्यू.इंग्लिश हायर सेकंडरी स्कुलमध्ये १० व्या वर्गात शिकणारा प्रतिक जनार्दन खिरेकर हा भाडेकरु असलेल्या म्हातारीचा डोळे तपासणीसाठी डॉ.शर्मा यांच्या रुग्णालयात सोमवारी सकाळी १० वाजता गेला होता. तो घरी परतताना एका लाल रंगाच्या हुंडाई कपंनीच्या कारमध्ये बसलेल्या एका युवकाने गाडीत बस आम्ही सोडून देतो, असे म्हणून कारमध्ये जबरीने कारमध्ये बसविले, असे प्रतीकने सांगितले. रस्त्याने जातांना सुध्दा सदर युवक आपसात बोलताना एकमेकांची नावे घेताना इक्बाल, गण्या, मंग्या असे बोलत होते आणि शिवीगाळ करुन दारु पीत होते. तेव्हा नेमकी संधी साधून प्रतिकने गाडीची चावी शोधली आणि दरवाजा उघडला. त्यांची नजर चूकवून वाहनाच्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या पाईपमध्ये लपला. यावेळी रात्रीचे १२ वाजले होते. एका व्यक्तीला रडताना दिसल्याने याला सीताबर्डी पोलीस ठाण्यात पोहचविले.त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. नागपूर पोलिसांनी पहाटे दीड वाजता आईवडीलांना दुरध्वनीवरुन प्रतीकची माहिती देवून सकाळी ठाण्यात बोलविले व त्यांचे बयाण नोंदवून प्रतीकला त्यांच्या सुपूर्द केले. मात्र सीताबर्डी पोलिसांनी घटनेत कुठलाही गुन्हा दाखल केला नाही. या घटनेविषयी वरूड शहरात चर्चा होत आहे. प्रकरणात वरूड व नागपूर येथे तक्रार दाखल नाही. गुन्हा दाखल नाही. यामुळे चर्चेला पेव फुटले आहे. या घटनेबाबत शंका- कुशंका व्यक्त होत असल्याने अपहरण प्रकरणात नेमके काय घडले याचा तपास करण्याकरिता वरुड पोलिसांचे पथक नागपूर जिल्हयातील घटनास्थळावर जाणार आहे. यानंतरच सत्य काय ते पुढे येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)नागपुरात बयाण नोंदविले, गुन्हा दाखल नाही !प्रतीक खिरेकर नामक १५ वर्षीय मुलाचे वरूडातून चार युवकांनी अपहरण केले होते. परंतु सदर मुलाच्या समयसूचकतेमुळे पळून जाऊन बर्डी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याला आईवडीलाच्या स्वाधीन केले. एवढी मोठी घटना असताना बालकांच्या माहितीवरून पोलिसांनी बयाण नोंदविण्यापलीकडे कोणतेही गुन्हे दाखल केले नाही, हे विशेष.आई-वडिलांसह नातेवाईकांचा जीव भांड्यातवरुडचा अपहृत बालक प्रतीक नागपुरातील बर्डी ठाण्यात आला यावेळी त्याला जेवण दिले. आईवडिलांना दूरध्वनीवरुन माहिती दिली. अखेर त्याचे धाडस आणि पोलिसांच्या सतर्कमुळे प्रतीक घरी सुखरुप पोहोचला. अखेर प्रतीकचा शोध लागल्याने त्याच्या नातेवाईकांसह आईवडिलांचा जीव भांड्यात पडला.