शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

आंध्र, तेलंगाणा, गुजरातमधून झाला बोंडअळीचा उद्रेक, साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटरच्या अहवालात नमूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 16:50 IST

आवश्यक उपाययोजनादेखील करण्यात आलेल्या नसल्याने गुलाबी बोंडअळीचे संकट उद्भवल्याचा गौप्यस्फोट एसएबीसी व आयएसबीआयच्या अहवालात करण्यात आलेला आहे

 अमरावती - आंध्र प्रदेश, तेलंगणा व गुजरातच्या काही भागात सन २०१५-१६ मध्ये गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला. महाराष्ट्रात या किडींचा फारसा प्रादुर्भाव आढळलेला नव्हता. मात्र, हा महाराष्ट्रात किडीचा उद्रेक होण्याचा धोक्याचा इशारा होता. दुर्दैवाने याकडे फारशा गांभीर्याने पाहण्यात आले नाही. आवश्यक उपाययोजनादेखील करण्यात आलेल्या नसल्याने गुलाबी बोंडअळीचे संकट उद्भवल्याचा गौप्यस्फोट एसएबीसी व आयएसबीआयच्या अहवालात करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्रात २००२ मध्ये बीटी बियाणे दाखल झाल्यानंतर सर्व प्रकारच्या बोंडअळीच्या प्रादुर्भावात लक्षणीय घट झाली. या बियाण्यात बोंडअळीपासूनचे अंगभूत संरक्षण पिकाला देऊ केले होते. सुरूवातीला ‘क्राय वन एसी’ हे बियाणे वापरण्यात आले होते. मात्र, एकाच बियाण्याचा वापर कायम राहिल्यास बोंडअळी स्वत:त प्रतिकारक्षमता विकसित करून पुन्हा प्रादुर्भाव करू शकतात, हे लक्षात आल्यानंतर ‘क्राय वन एसी व क्राय वन टूबी’ या दोन जनुकांचा वापर असलेल्या  बोलगार्ड-२ या तंत्रज्ञानाला मान्यता देण्यात आली. या वाणाला शेतकºयांनी उदंड प्रतिसाद दिला. सन २०१०-११ पासून राज्यात कापसाच्या एकूण क्षेत्रापैकी ९० ते ९२ टक्के क्षेत्रात बीटी कपाशीची लागवड होऊ लागली. यामध्ये भर म्हणजे, सर्वच प्रकारच्या नोंदणीकृत १००० पेक्षा जास्त बीटी वाणांचे विक्रीस परवानगी देण्यात आली. मात्र, पर्यायी भक्ष पिकांच्या (रेफ्युजी) मूलभूत अटीचे सरसकट उल्लंघन झाले. परिणामी गुलाबी बोंडअळीची प्रतिरोधक क्षमता हळूहळू वाढत गेली. कमी किंवा मध्यम कालावधीच्या वाणांची लागवड न करणे तसेच हंगाम जास्त न लांबविता वेळेतच संपविणे आदी उपाययोजना झाल्याच नसल्याने आताचे संकट ओढावले असल्याचे आयएसबीआय, मुंबई ( इंडीयन सोसायटी फॉर कॉटन इम्प्रूव्हमेंट) व एसएबीसी, नवी दिल्ली (साऊथ एशिया बायोटक्नॉलॉजी सेंटर) च्या अहवालात नमूद आहे.

बोंडअळीत प्रतिकारक्षमता विकसित होण्याची कारणे- बोंडअळीवर प्रभावी असलेल्या ‘पायरेथ्राइट’ घटक असलेल्या कीटकनाशकांची शिफारशीच्या मात्रेहून कैकपटीने अधिक फवारणी.- कपाशीच्या क्षेत्रात क्वचितच फेरबदल. वर्षानुवर्षे तीच पीक असल्यानेच किडीचा कायमस्वरूपी मुक्काम.- लागवडीसाठी परवानगी नसलेल्या अनधिकृत बीटी व तणनाशकाला सहनशील बियाण्यांचा वाढता वापर.- दीर्घ कालावधीचे संकरित वाण बोंडाळीला स्थिरावण्यास मदत व खाद्य मिळून अळीचा जीवनक्रम खंडित होत नाही.- १२० दिवसांनतर बीटी बियांण्यांच्या जनुकीय शक्तीत कमी येत असल्यानेच पीक किडीला बळी पडते.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेतीMaharashtraमहाराष्ट्रAmravatiअमरावती