शहरं
Join us  
Trending Stories
1
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
2
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
3
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
4
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
5
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
6
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
7
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
8
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
9
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
10
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
11
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
12
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
13
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
14
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
15
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
16
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
17
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
18
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश
19
भारतीय खासदारांचे विमान तब्बल ४० मिनिटे आकाशातच; ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्को विमानतळ होते बंद
20
७ दिवस चकवा देणारा वैष्णवीचा सासरा, दीर अखेर अटकेत; दोघांनाही २८ मेपर्यंत पोलिस कोठडी

कठड्यांचा दर्जा निकृष्ट, मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवा

By admin | Updated: May 24, 2015 00:30 IST

कित्येक लोकांचे बळी जाण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या बाभळी येथील धोकादायक पुलाला नगरपालिकेने निकृष्ट दर्जाचे ...

मागणी : दर्यापूरचा ‘तो’ पूल ठरतोय जीवघेणादर्यापूर : कित्येक लोकांचे बळी जाण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या बाभळी येथील धोकादायक पुलाला नगरपालिकेने निकृष्ट दर्जाचे कठडे बसविल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष जयंत वाकोडे यांनी दर्यापूरच्या मुख्याधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.विविध समस्यांनी ग्रस्त बाभळीवासीयांना नदीपात्रातून कसेबसे वाटचाल करीत बनोसा शहर गाठावे लागत होते. वर्षभर बाभळीवासी या नदीतून मार्गक्रमण करुन बनोसाची बाजारपेठ गाठत असत.बाभळीच्या नागरिकांनी सोय व्हावी म्हणून त्याकाळी नगरपरिषदेने हा छोटा पूल बाभळीवासीयांच्या सेवेसाठी बांधून दिला. तोपर्यंत या ठिकाणी एकाही व्यक्तीने जीव गमवला नव्हता. परंतु पूल झाल्यापासून आजपर्यंत कधी पुलावरुन पाय घसरुन तर कधी डोहात पडून अनेकांचे बळी गेले आहे. धोकादायक पुलावर संरक्षक कठडे बांधण्यासाठी काही नगरसेवकांनीच विरोध केला होता असा आरोप जयंत वाकोडे यांनी केला आहे. परंतु मनसेने आपली मागणी रेटून धरल्यामुळे नगर पालिका प्रशासनाला त्याठिकाणी कठडे लावण्यासाठी मुहूर्त सापडला. कठडे लावण्याची इच्छाच नसलेल्या काही नगरसेवकांमुळे मुख्याधिकारी पानझाडे यांनी कसेबसे कठडे उभे केले. यासंदर्भाची चौकशी वरिष्ठांनी करावी, असे जयंत वाकोडे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)अनेकांचे बळी घेणारा पूलदर्यापूर- बाभळी येथील जुळ्या शहरांना जोडणारा हा पूल अतिशय धोकादायक असून गणपती विसर्जन असो की, दुर्गा विसर्जन या काळात येथे अनेकांचे बळी गेले आहेत. कुणी नदीच्या डोहात पडून तर कुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे.परंतु नगर पालिका प्रशासनाने या जीवघेण्या पुलावर थातूरमातूर कठडे लावून नागरिकांच्या जिवाशी एकप्रकारे खेळच चालविला आहे.