शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

पेढी नदीवरील पुलाच्या कठड्यांची होणार दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:34 IST

वलगाव येथील पेढी नदीच्या पुलावर आठवड्याभरात दोन अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पेढीनदीचा पूल मजबूत आहे की नाही, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. तथापि, पूल मजबूत असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आला.

ठळक मुद्देदुरुस्तीच्या कामांना प्रारंभ :पुलाने केले शतक पार; मजबूत असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वलगाव येथील पेढी नदीच्या पुलावर आठवड्याभरात दोन अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पेढीनदीचा पूल मजबूत आहे की नाही, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. तथापि, पूल मजबूत असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आला. पुलावरील कठड्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली. सदर पूल ब्रिटिशकालीन असून, पुलाने एक शतक पार केले आहे.पेढी नदीवरील पुलाची उंची जमिनीपासून २५ मीटर असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली. १५ वर्षांपूर्वी बांधकाम विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता धनंजय धवड यांनी पेढी नदीच्या पुलाचे फाऊंडेशन कायम ठेवून कँटिलियर वाइंडिंग पद्धतीने पुलाच्या दोन्ही बाजूला दीड मीटरने रुंदी वाढविली होती. म्हणजे पूर्वीचा साडेचार मीटर रुंदीचा पूल साडेसात मीटरचा केला होता. तेव्हापासून पूलावर एकही मोठा अपघात झाला नाही.सदर पुलावरून दररोज दहा हजारांहून अधिक वाहने ये-जा करीत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. आता आठवडाभरात दोन वेळा पुलावर अपघात झाले आहेत. भरधाव ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन्ही बाजूचे कठडे तोडून ट्रक नदीत कोसळला होता. दुसरा अपघातसुद्धा याच पूलावर झाला. खासगी बस व ट्रकमध्ये आमने-सामने धडक झाल्याने दोन तास वाहतूक व्यवस्था ठप्प पडली होती. या अपघातानंतर पूलावर गर्दी झाली होती.आठवड्यातच दोन अपघातांमुळे सदर पूल चर्चेत आला. घटनास्थळी आमदार यशोमती ठाकूर यांनी भेट देऊन या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करण्यात येणार असून, त्यासंदर्भात त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चासुद्धा केली आहे.जिल्ह्यात ६२ ब्रिटिशकालीन पूलजिल्ह्यात लहान-मोठे ६२ ब्रिटिशकालीन पूल असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे. कोकणातील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. तेव्हा जिल्ह्यातील ६२ पुलांचेही स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. पूल सुस्थितीत असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे. वलगावच्या पुलाएवढीच उंची आसेगाव पूर्णा येथील पूर्णा नदीच्या पूलाची असल्याची माहिती आहे.वर्दळीचा पूलअमरावतीला चांदूर बाजार, परतवाडा, अचलपूर, दर्यापूर, धारणी या प्रमुख शहरांना जोडणारा हा पूल असल्याने त्यावरून वाहनांची नेहमी वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. वलगाव पोलीस ठाणे येथून हाकेच्या अंतरावर आहे. आठवडाभरात दोन अपघात झाल्याने सायकल, दुचाकीने जाणाºया प्रवाशांमध्ये दडपण तयार झाले आहे. वलगाव पोलिसांनी भरधाव वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलावीत आणि प्रवाशांना अभय द्यावे, अशी मागणी होत आहे.पुलाचे कठडे दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात येत आहेत. आणखी किमान पाच दिवस लागणार आहेत. जनरेटरच्या माध्यमातून काँक्रीट ब्रेकिंग करून कामे करावी लागणार आहे. आता पोलिसांनी खबरदारी म्हणून बॅरिकेट्स लावले आहेत.- विनोद बोरसे, कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती.

टॅग्स :riverनदी