शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
5
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
6
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
7
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
8
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
9
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
10
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
11
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
12
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
13
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
14
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
15
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
16
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
17
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
18
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
19
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
20
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

पेढी नदीवरील पुलाच्या कठड्यांची होणार दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:34 IST

वलगाव येथील पेढी नदीच्या पुलावर आठवड्याभरात दोन अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पेढीनदीचा पूल मजबूत आहे की नाही, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. तथापि, पूल मजबूत असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आला.

ठळक मुद्देदुरुस्तीच्या कामांना प्रारंभ :पुलाने केले शतक पार; मजबूत असल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वलगाव येथील पेढी नदीच्या पुलावर आठवड्याभरात दोन अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पेढीनदीचा पूल मजबूत आहे की नाही, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. तथापि, पूल मजबूत असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात आला. पुलावरील कठड्यांची दुरुस्ती तातडीने करण्यात येत असल्याची माहितीही देण्यात आली. सदर पूल ब्रिटिशकालीन असून, पुलाने एक शतक पार केले आहे.पेढी नदीवरील पुलाची उंची जमिनीपासून २५ मीटर असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली. १५ वर्षांपूर्वी बांधकाम विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता धनंजय धवड यांनी पेढी नदीच्या पुलाचे फाऊंडेशन कायम ठेवून कँटिलियर वाइंडिंग पद्धतीने पुलाच्या दोन्ही बाजूला दीड मीटरने रुंदी वाढविली होती. म्हणजे पूर्वीचा साडेचार मीटर रुंदीचा पूल साडेसात मीटरचा केला होता. तेव्हापासून पूलावर एकही मोठा अपघात झाला नाही.सदर पुलावरून दररोज दहा हजारांहून अधिक वाहने ये-जा करीत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. आता आठवडाभरात दोन वेळा पुलावर अपघात झाले आहेत. भरधाव ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने दोन्ही बाजूचे कठडे तोडून ट्रक नदीत कोसळला होता. दुसरा अपघातसुद्धा याच पूलावर झाला. खासगी बस व ट्रकमध्ये आमने-सामने धडक झाल्याने दोन तास वाहतूक व्यवस्था ठप्प पडली होती. या अपघातानंतर पूलावर गर्दी झाली होती.आठवड्यातच दोन अपघातांमुळे सदर पूल चर्चेत आला. घटनास्थळी आमदार यशोमती ठाकूर यांनी भेट देऊन या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करण्यात येणार असून, त्यासंदर्भात त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चासुद्धा केली आहे.जिल्ह्यात ६२ ब्रिटिशकालीन पूलजिल्ह्यात लहान-मोठे ६२ ब्रिटिशकालीन पूल असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे. कोकणातील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. तेव्हा जिल्ह्यातील ६२ पुलांचेही स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. पूल सुस्थितीत असल्याची माहिती बांधकाम विभागाने दिली आहे. वलगावच्या पुलाएवढीच उंची आसेगाव पूर्णा येथील पूर्णा नदीच्या पूलाची असल्याची माहिती आहे.वर्दळीचा पूलअमरावतीला चांदूर बाजार, परतवाडा, अचलपूर, दर्यापूर, धारणी या प्रमुख शहरांना जोडणारा हा पूल असल्याने त्यावरून वाहनांची नेहमी वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. वलगाव पोलीस ठाणे येथून हाकेच्या अंतरावर आहे. आठवडाभरात दोन अपघात झाल्याने सायकल, दुचाकीने जाणाºया प्रवाशांमध्ये दडपण तयार झाले आहे. वलगाव पोलिसांनी भरधाव वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलावीत आणि प्रवाशांना अभय द्यावे, अशी मागणी होत आहे.पुलाचे कठडे दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात येत आहेत. आणखी किमान पाच दिवस लागणार आहेत. जनरेटरच्या माध्यमातून काँक्रीट ब्रेकिंग करून कामे करावी लागणार आहे. आता पोलिसांनी खबरदारी म्हणून बॅरिकेट्स लावले आहेत.- विनोद बोरसे, कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती.

टॅग्स :riverनदी