शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

कृत्रिम पाणवठ्यांमुळे वाघांना दिलासा

By admin | Updated: April 28, 2015 00:13 IST

सूर्य आग ओकू लागला की, जंगलात वन्यपशुंना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

३२५ पेक्षा जास्त निर्मित : मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सौर ऊर्जेने पाणी पुरवठाअमरावती : सूर्य आग ओकू लागला की, जंगलात वन्यपशुंना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक पानवठ्यासह कृत्रिम पाणवठे निर्माण करुन वाघांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाघांनी पाणी व मांस भक्षाच्या शोधासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेबाहेर जाऊ नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एकूण ९२५ पाणवठे असून यात नैसर्गिक ६०० तर कृत्रिम ३२५ पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. मेळघाटचे जंगल दऱ्या-खोऱ्यांचे असल्यामुळे काही दुर्गम भागात टँकरने पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यामळे दुर्गम भागात निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यावर सौर ऊर्जेने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही कृत्रिम पाणवठ्यांमध्ये स्वंयचलित प्रणालीने पाणीपुरवठा केला जात आहे. कृत्रिम पाणवठे निर्माण करणे म्हणजे निधीचा अपव्यय असा काही वर्षांपूर्वींचा समज होता. परंतु हल्ली मेळघाटात वन्यपशुंना कृत्रिम पाणवठ्यांनी जीवनदान मिळत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सौरऊर्जा, हातपंप, सिमेंट बंधारे, प्लॉस्टिक टाकीद्वारे कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या पारा ४५ अंश सेल्सिअसवर जात असून मे महिन्यात व्याघ्र प्रकल्पात भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता वनअधिकाऱ्यांनी नैसर्गिक पाणवठ्यांना पर्याय म्हणून कृत्रिम पाणवठ्यांकडे लक्ष वेधले आहे. दुर्गम, अतिदुर्गम भागात निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यांमुळे विशेषत: वाघांची शिकार करण्याच्या मनसुब्याने सापळा रचणाऱ्यांना या भागात पोहोचणे कठीण झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणवठ्यांवर येणाऱ्या वाघांची शिकार करण्याच्या घटना घडत असे. परंतु यावर्षी कृत्रिम पाणवठ्यांवर मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याने वाघ आपली सीमा सोडून बाहेर पडण्याची शक्यता धुसर झाल्याचे चित्र आहे. गत महिन्यात अवकाळी पाऊस बरसल्याने मेळघाटच्या काही भागातील जंगलात उन्हाळ्यात आजही हिरवळ आहे. त्यामुळे जंगलात असलेली हिरवळ ही वाघांचे भक्ष असलेल्या वन्यपशुंच्या आहारासाठी ते पोषक मानले जात आहे. (प्रतिनिधी)मध्यंतरीच्या पावसाने बराच दिलासा मिळाला. जंगलात वन्यपशुंसाठी उत्तम वातावरण आहे. वाघांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत असल्याने ते संरक्षित क्षेत्रातच वावरत आहेत. कृत्रिम पाणीपुरवठ्यामुळे बरीच समस्या निकाली निघाली आहे.- दिनेश त्यागी,क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प.