शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पाणवठ्यांमुळे वाघांना दिलासा

By admin | Updated: April 28, 2015 00:13 IST

सूर्य आग ओकू लागला की, जंगलात वन्यपशुंना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

३२५ पेक्षा जास्त निर्मित : मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सौर ऊर्जेने पाणी पुरवठाअमरावती : सूर्य आग ओकू लागला की, जंगलात वन्यपशुंना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक पानवठ्यासह कृत्रिम पाणवठे निर्माण करुन वाघांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाघांनी पाणी व मांस भक्षाच्या शोधासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेबाहेर जाऊ नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एकूण ९२५ पाणवठे असून यात नैसर्गिक ६०० तर कृत्रिम ३२५ पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. मेळघाटचे जंगल दऱ्या-खोऱ्यांचे असल्यामुळे काही दुर्गम भागात टँकरने पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यामळे दुर्गम भागात निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यावर सौर ऊर्जेने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही कृत्रिम पाणवठ्यांमध्ये स्वंयचलित प्रणालीने पाणीपुरवठा केला जात आहे. कृत्रिम पाणवठे निर्माण करणे म्हणजे निधीचा अपव्यय असा काही वर्षांपूर्वींचा समज होता. परंतु हल्ली मेळघाटात वन्यपशुंना कृत्रिम पाणवठ्यांनी जीवनदान मिळत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सौरऊर्जा, हातपंप, सिमेंट बंधारे, प्लॉस्टिक टाकीद्वारे कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या पारा ४५ अंश सेल्सिअसवर जात असून मे महिन्यात व्याघ्र प्रकल्पात भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता वनअधिकाऱ्यांनी नैसर्गिक पाणवठ्यांना पर्याय म्हणून कृत्रिम पाणवठ्यांकडे लक्ष वेधले आहे. दुर्गम, अतिदुर्गम भागात निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यांमुळे विशेषत: वाघांची शिकार करण्याच्या मनसुब्याने सापळा रचणाऱ्यांना या भागात पोहोचणे कठीण झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणवठ्यांवर येणाऱ्या वाघांची शिकार करण्याच्या घटना घडत असे. परंतु यावर्षी कृत्रिम पाणवठ्यांवर मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याने वाघ आपली सीमा सोडून बाहेर पडण्याची शक्यता धुसर झाल्याचे चित्र आहे. गत महिन्यात अवकाळी पाऊस बरसल्याने मेळघाटच्या काही भागातील जंगलात उन्हाळ्यात आजही हिरवळ आहे. त्यामुळे जंगलात असलेली हिरवळ ही वाघांचे भक्ष असलेल्या वन्यपशुंच्या आहारासाठी ते पोषक मानले जात आहे. (प्रतिनिधी)मध्यंतरीच्या पावसाने बराच दिलासा मिळाला. जंगलात वन्यपशुंसाठी उत्तम वातावरण आहे. वाघांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत असल्याने ते संरक्षित क्षेत्रातच वावरत आहेत. कृत्रिम पाणीपुरवठ्यामुळे बरीच समस्या निकाली निघाली आहे.- दिनेश त्यागी,क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प.