शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पाणवठ्यांमुळे वाघांना दिलासा

By admin | Updated: April 28, 2015 00:13 IST

सूर्य आग ओकू लागला की, जंगलात वन्यपशुंना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

३२५ पेक्षा जास्त निर्मित : मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सौर ऊर्जेने पाणी पुरवठाअमरावती : सूर्य आग ओकू लागला की, जंगलात वन्यपशुंना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक पानवठ्यासह कृत्रिम पाणवठे निर्माण करुन वाघांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाघांनी पाणी व मांस भक्षाच्या शोधासाठी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेबाहेर जाऊ नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पात एकूण ९२५ पाणवठे असून यात नैसर्गिक ६०० तर कृत्रिम ३२५ पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. मेळघाटचे जंगल दऱ्या-खोऱ्यांचे असल्यामुळे काही दुर्गम भागात टँकरने पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यामळे दुर्गम भागात निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यावर सौर ऊर्जेने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही कृत्रिम पाणवठ्यांमध्ये स्वंयचलित प्रणालीने पाणीपुरवठा केला जात आहे. कृत्रिम पाणवठे निर्माण करणे म्हणजे निधीचा अपव्यय असा काही वर्षांपूर्वींचा समज होता. परंतु हल्ली मेळघाटात वन्यपशुंना कृत्रिम पाणवठ्यांनी जीवनदान मिळत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात सौरऊर्जा, हातपंप, सिमेंट बंधारे, प्लॉस्टिक टाकीद्वारे कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या पारा ४५ अंश सेल्सिअसवर जात असून मे महिन्यात व्याघ्र प्रकल्पात भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेता वनअधिकाऱ्यांनी नैसर्गिक पाणवठ्यांना पर्याय म्हणून कृत्रिम पाणवठ्यांकडे लक्ष वेधले आहे. दुर्गम, अतिदुर्गम भागात निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यांमुळे विशेषत: वाघांची शिकार करण्याच्या मनसुब्याने सापळा रचणाऱ्यांना या भागात पोहोचणे कठीण झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणवठ्यांवर येणाऱ्या वाघांची शिकार करण्याच्या घटना घडत असे. परंतु यावर्षी कृत्रिम पाणवठ्यांवर मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्याने वाघ आपली सीमा सोडून बाहेर पडण्याची शक्यता धुसर झाल्याचे चित्र आहे. गत महिन्यात अवकाळी पाऊस बरसल्याने मेळघाटच्या काही भागातील जंगलात उन्हाळ्यात आजही हिरवळ आहे. त्यामुळे जंगलात असलेली हिरवळ ही वाघांचे भक्ष असलेल्या वन्यपशुंच्या आहारासाठी ते पोषक मानले जात आहे. (प्रतिनिधी)मध्यंतरीच्या पावसाने बराच दिलासा मिळाला. जंगलात वन्यपशुंसाठी उत्तम वातावरण आहे. वाघांना मुबलक प्रमाणात पाणी मिळत असल्याने ते संरक्षित क्षेत्रातच वावरत आहेत. कृत्रिम पाणीपुरवठ्यामुळे बरीच समस्या निकाली निघाली आहे.- दिनेश त्यागी,क्षेत्रसंचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प.