शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

तीन आरएफओंना रुजू करून घेण्यास टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 15:26 IST

Amravati : शासन आदेशाची पायमल्ली, आयएफएस यांचा मनमानी कारभार केव्हा थांबणार?

गणेश वासनिकलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाच्या बदली आदेशानुसार वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या (आरएफओ) बदल्या करण्यात आल्या. मात्र, काही ठिकाणी आरएफओंना अद्यापही रुजू करून घेण्यात आलेले नाही. आरएफओंनी एकतर्फी पदभार स्वीकारत कारभार सुरू केला असला तरी उपवनसंरक्षकांना ते मान्य नाही. त्यामुळे आरएफओ विरुद्ध उपवनसंरक्षक असा संघर्ष उभा ठाकला आहे.

शासनाच्या वन व महसूल विभागाने ३० मे रोजीच्या बदली आदेशानुसार मंगेश पाटील (भोकर प्रादेशिक), गणेश शेवाळे (नांदेड प्रादेशिक), रामराव देवकते (देगलूर प्रादेशिक) यांची पदस्थापना होऊन महिनाभरापेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र, नांदेड वन विभागाच्या उपवनसंरक्षकांनी या तिघांना अद्यापही रुजू करून घेतलेले नाही. आरएफओ आर. एस. देवकते यांनी देगलूर वनपरिक्षेत्राचा एकतर्फी कार्यभार घेतल्यानंतर २३ जून २०२५ रोजी नांदेड उपवनसंरक्षकांना पत्राद्वारे कळविले होते. एवढेच नव्हे तर या संदर्भातील माहिती शासनाच्या कार्यासन अधिकाऱ्यांना पाठविली होती. असे असताना नांदेड वन विभागाचे उपवनसंरक्षक बदलीने पदस्थापना झालेल्या या तीनही आरएफओंना रुजू करून घेण्यास नकार देत असल्याची माहिती आहे.

"नांदेड वन विभागात बदलीनंतरही आरएफओंना रुजू का करून घेतले जात नाही? याविषयी त्वरेने माहिती जाणून घेतो. लवकरच या संदर्भात तोडगा काढून शासन आदेशाची अंमलबजावणी केली जाईल. कोणावरही अन्याय होणार नाही."- ऋषिकेश रंजन, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सामान्य प्रशासन)

टॅग्स :forest departmentवनविभागAmravatiअमरावती