शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

रिलायन्स मोबाईल टॉवर उभारणीचा करारनामा रद्द

By admin | Updated: November 21, 2015 00:06 IST

महानगरात ४ जी सेवा पुरविण्यासाठी रिलायन्स कंपनीने मोबाईल टॉवर उभारणीसाठी केलेला करारनामा रद्द करण्याचा निर्णय महापौर चरणजितकौर नंदा यांनी शुक्रवारी घेतला.

महापौरांचा निर्णय : टॉवर उभारणीवरून सभागृहात दोन मतप्रवाहअमरावती : महानगरात ४ जी सेवा पुरविण्यासाठी रिलायन्स कंपनीने मोबाईल टॉवर उभारणीसाठी केलेला करारनामा रद्द करण्याचा निर्णय महापौर चरणजितकौर नंदा यांनी शुक्रवारी घेतला. ४५ दिवसांच्या आत करारनामा करणे अनिवार्य असताना तो करण्यात आला नसल्याचा ठपका रिलायन्सवर ठेवण्यात आला आहे. मोबाईल टॉवर उभारणीवरून महापालिकेत सदस्यांमध्ये दोन मतप्रवाह असल्याचे दिसून आले.महानगरात रस्ता दुभाजक व चौकातील आयलंड मध्ये रिलायन्स जिओ इन्को कॉम लि. ने ४ जी सेवा पुरविण्यासाठी पहिल्या टप्प्यात आठ टॉवर उभारणीला परवानगी देण्यात आली आहे. एकूण २८ टॉवर उभारणी होणार आहे. त्याकरिता २० मे रोजी झालेल्या आमसभेच्या ठरावानुसार टॉवर उभारणीचा डीपीआर तयार करून तो करारनाम्यासह मंजुरी घेणे आवश्यक होते. मात्र रिलायन्सने करारनामा केल्याशिवाय टॉवर उभारणीचा प्रताप केला आहे. ही बाब महापौरांच्या लक्षात येताच त्यांनी प्रशासनाला पत्र देऊन सविस्तर माहिती मागविली होती. मात्र सहायक संचालक नगररचना विभागाने महापौरांनी टॉवर उभारणीबाबत माहिती दिली नाही. महापौरांच्या पत्राला प्रशासन जुमानत नसेल तर सामान्य सदस्यांचे काय हाल असेल हे न विचारलेले बरे, असे विरोधी पक्ष नेता प्रवीण हरमकर यांनी सभागृहात सांगितले. दरम्यान सुजाता झाडे, प्रदीप दंदे, राजू मसराम, प्रकाश बनसोड, राजू मानकर, अविनाश मार्डीकर, अंबादास जावरे, जयश्री मोरय्या, संजय अग्रवाल, मिलिंद बांबल, प्रवीण हरमकर यांनी रिलायन्सच्या नियमबाह्य टॉवर उभारणीवर बोट ठेवले. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायचा असेल तर मोबाईल टॉवर उभारणी झालेच पाहिजे, असे दिगंबर डहाके, प्रशांत वानखडे, विलास इंगोले, राजेंद्र तायडे, अजय गोंडाने, विजय नागपुरे, प्रदीप बाजड आदींनी रिलायन्सची पाठराखण केली. पंरतु करारनाम्यानुसार ४५ दिवसांच्या आत सदर कंपनीने नोंदणी करून घेणे अनिवार्य होते. पण तसे झाले नाही. महापौरांचा अपमान खपवून घेणार नाही - प्रवीण हरमकरमहापौरांना पत्र देऊन एखादी माहिती विचारली असेल तर ती प्रशासनाला देणे बंधनकारक आहे. मात्र मोबाईल टॉवर उभारणीबाबत पत्र देऊन महापौरांवर माहिती देण्यात आली नाही, हा महापौरांचा अपमान आहे. महापौरांचा अपमान म्हणजे सभागृहाचा अपमान आहे, तो कदापिही खपवून घेणार नाही, अशी विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर म्हणाले. ४५ दिवसांच्या आत रिलायन्स कंपनीने मोबाईल टॉवर ुउभारणीसंदर्भात करारनामा करणे अनिवार्य होते. मात्र ५६ दिवसांचा कालावधी लोटला असताना करारनामा करण्यात आला नाही. त्यामुळे करारनामा रद्द ठरतो. - चरणजित कौर नंदामहापौरजास्तीत जास्त मोबाईल टॉवर उभारले तर रेडीरेशन कमी होते, हे विज्ञाननिष्ठ आहे. जास्त मोबाईल टॉवर उभारणीमुळे सुविधा देखील चांगल्या दर्जाच्या मिळतात. रिलायन्सने ४५ दिवसांच्या आत करारनामा करणे अपेक्षित ंहोते. - चंद्रकांत गुडेवारआयुक्त, महापालिका