शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

२० गावांतील पुनर्वसन निधीअभावी रखडले

By admin | Updated: December 9, 2014 22:42 IST

२००७ मधील महापुराने बेघर झालेले १३१३ पुनर्वसनग्रस्त कुटुंब मदतीची अपेक्षा करीत असून शासनाने गेल्या सात वर्षांपासून या पुनर्वसनासाठी निधीच दिला नसल्यामुळे २० गावांतील पुनर्वसनग्रस्त बेघर आहेत.

संदीप मानकर - दर्यापूर२००७ मधील महापुराने बेघर झालेले १३१३ पुनर्वसनग्रस्त कुटुंब मदतीची अपेक्षा करीत असून शासनाने गेल्या सात वर्षांपासून या पुनर्वसनासाठी निधीच दिला नसल्यामुळे २० गावांतील पुनर्वसनग्रस्त बेघर आहेत. दर्यापूर तालुक्यातील पुनर्वसनग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्याना निवेदन देऊन या संदर्भात निधी मागणार असल्याचे मतदारसंघाचे आमदार रमेश बुंदिले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. महापुरात २३ गावात १५४४ कुटुंब बेघत झाले. तत्कालिन डझनभर मंत्री तालुक्याचा दौरा करुन गेले. परंतु अद्यापही पुनर्वसनग्रस्तांना न्याय मिळाला नाही. यामधून तीन गावे व २३१ कुटुंब पुनर्वसनातून वगळण्यात आले. परंतु अद्यापही २० गावातल १३१३ कुटुंबांचा प्रश्न कायम आहे. आतापर्यंत ६० वर्षात फक्त ३० टक्के पुनर्वसन पूर्ण झाले असून ७० टक्के पुनर्वसन अद्यापही शासनाच्या उदासीन धोरणामुळे व लोकप्रतिनिधींच्या अपयशामुळे रखडले असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक कुटुंबाला घरे बांधणीसाठी १ लाखाप्रमाणे म्हणजे १३ कोटी १३ लक्ष रुपयांची आवश्यकता असताना आतापर्यंत प्रत्यक्षात वाटप ४ कोटी ९६ लक्ष १५ हजार रुपयांचा झाल्याचे शासकीय अहवाल आहे. परंतु अद्यापही पुनर्वसन ग्रस्तांसाठी ८ कोटी १६ लक्ष ८५ हजार रुपयांची आवश्यकता असताना मात्र अनेक दिवसांपासून निधीच नसल्यामुळे पुनर्वसनग्रस्त हवालदील झाले आहे. अनेक वेळा पुनर्वसनग्रस्तांनी आंदोलने केली. उपोषणे केली. तहसील कार्यालयाचे भोवती चकरा मारल्या. परंतु त्यांचा आवाज कोणीही ऐकला नाही. पुनर्वसनानंतर लागणाऱ्या नागरिक सुविधा सुध्दा मिळालेल्या नसून जेथे पुनर्वसन झाले आहे तिथे वीज नाही. पाणी नाही, रस्ते नाहीत, अशी परिस्थिती झाली आहे. नागरिक सुविधेतील विजेसाठी १७ लक्ष ९८ हजार रुपयांची निधीची आवश्यक आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी ९३ लक्ष ९६ हजार रुपयांची मागणी शासनाला स्थानिक पातळीवरुन करण्यात आली आहे. तालुक्यातील खल्लार शिवर, रामगाव, नरदोडा, नालवाडा, बेंबळा, बु. सावंगा खु., खानपूर चिपर्डा, तोंगलाबाद, नाचोना, लेहेगाव, गोळेगाव, रामतीर्थ, कान्होली, माहुली धांडे, हसनपूर, बाभळी, दर्यापूर, कोळंबी, खुर्माबाद आदी २० गावात १३१३ पुनर्वसन ग्रस्त कुटुंब असून अद्याप ७ वर्षापासून त्यांची दिवाळी अंधारात गेली आहे.