शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

२० गावांतील पुनर्वसन निधीअभावी रखडले

By admin | Updated: December 9, 2014 22:42 IST

२००७ मधील महापुराने बेघर झालेले १३१३ पुनर्वसनग्रस्त कुटुंब मदतीची अपेक्षा करीत असून शासनाने गेल्या सात वर्षांपासून या पुनर्वसनासाठी निधीच दिला नसल्यामुळे २० गावांतील पुनर्वसनग्रस्त बेघर आहेत.

संदीप मानकर - दर्यापूर२००७ मधील महापुराने बेघर झालेले १३१३ पुनर्वसनग्रस्त कुटुंब मदतीची अपेक्षा करीत असून शासनाने गेल्या सात वर्षांपासून या पुनर्वसनासाठी निधीच दिला नसल्यामुळे २० गावांतील पुनर्वसनग्रस्त बेघर आहेत. दर्यापूर तालुक्यातील पुनर्वसनग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्याना निवेदन देऊन या संदर्भात निधी मागणार असल्याचे मतदारसंघाचे आमदार रमेश बुंदिले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. महापुरात २३ गावात १५४४ कुटुंब बेघत झाले. तत्कालिन डझनभर मंत्री तालुक्याचा दौरा करुन गेले. परंतु अद्यापही पुनर्वसनग्रस्तांना न्याय मिळाला नाही. यामधून तीन गावे व २३१ कुटुंब पुनर्वसनातून वगळण्यात आले. परंतु अद्यापही २० गावातल १३१३ कुटुंबांचा प्रश्न कायम आहे. आतापर्यंत ६० वर्षात फक्त ३० टक्के पुनर्वसन पूर्ण झाले असून ७० टक्के पुनर्वसन अद्यापही शासनाच्या उदासीन धोरणामुळे व लोकप्रतिनिधींच्या अपयशामुळे रखडले असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक कुटुंबाला घरे बांधणीसाठी १ लाखाप्रमाणे म्हणजे १३ कोटी १३ लक्ष रुपयांची आवश्यकता असताना आतापर्यंत प्रत्यक्षात वाटप ४ कोटी ९६ लक्ष १५ हजार रुपयांचा झाल्याचे शासकीय अहवाल आहे. परंतु अद्यापही पुनर्वसन ग्रस्तांसाठी ८ कोटी १६ लक्ष ८५ हजार रुपयांची आवश्यकता असताना मात्र अनेक दिवसांपासून निधीच नसल्यामुळे पुनर्वसनग्रस्त हवालदील झाले आहे. अनेक वेळा पुनर्वसनग्रस्तांनी आंदोलने केली. उपोषणे केली. तहसील कार्यालयाचे भोवती चकरा मारल्या. परंतु त्यांचा आवाज कोणीही ऐकला नाही. पुनर्वसनानंतर लागणाऱ्या नागरिक सुविधा सुध्दा मिळालेल्या नसून जेथे पुनर्वसन झाले आहे तिथे वीज नाही. पाणी नाही, रस्ते नाहीत, अशी परिस्थिती झाली आहे. नागरिक सुविधेतील विजेसाठी १७ लक्ष ९८ हजार रुपयांची निधीची आवश्यक आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी ९३ लक्ष ९६ हजार रुपयांची मागणी शासनाला स्थानिक पातळीवरुन करण्यात आली आहे. तालुक्यातील खल्लार शिवर, रामगाव, नरदोडा, नालवाडा, बेंबळा, बु. सावंगा खु., खानपूर चिपर्डा, तोंगलाबाद, नाचोना, लेहेगाव, गोळेगाव, रामतीर्थ, कान्होली, माहुली धांडे, हसनपूर, बाभळी, दर्यापूर, कोळंबी, खुर्माबाद आदी २० गावात १३१३ पुनर्वसन ग्रस्त कुटुंब असून अद्याप ७ वर्षापासून त्यांची दिवाळी अंधारात गेली आहे.