शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

११ जलकुंभ निर्मितीनंतरच नियमित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 22:08 IST

अंबानगरीत जीवन प्राधिकरणच्यावतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. अस्तित्वातील १५ पाण्याच्या टाकीवरून अंबानगरीला पाणीपुरवठा होत असला तरी उच्च दाबाने नागरिकांच्या घरांपर्यंत पाणी पोहचत नसल्याच्या तक्रारी आहेत.

ठळक मुद्देशहरात तोवर एक दिवसआड पाणी : मजीप्राच्या मुख्य अभियंत्यांची माहिती

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंबानगरीत जीवन प्राधिकरणच्यावतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. अस्तित्वातील १५ पाण्याच्या टाकीवरून अंबानगरीला पाणीपुरवठा होत असला तरी उच्च दाबाने नागरिकांच्या घरांपर्यंत पाणी पोहचत नसल्याच्या तक्रारी आहेत. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आणखी ११ नवीन टाक्या बांधल्यास नेहमीत पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असे जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सुरेश चारथळ यांनी सांगितले.अप्पर वर्धा धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. दोन वर्ष शहराला पुरेल एवढा पाणीसाठा (७० टक्के) धरणात सध्या शिल्लक आहे. परंतु तरी पूर्वी नियमित मिळणारे पाणी आता एकदिवसआड मिळत आहे. यासंदर्भात मुख्य अभियंत्यांशी चर्चा केली असता शहराची लोकसंख्या साडेआठ लाख असली तरी मजीप्राच्यावतीने अधिकृत कनेकशन ९० हजार देण्यात आले आहेत. मात्र यानंतर शहराचा नवीन विस्तार झाला असून, जुने काही कनेकशन नवीन पाईपलाईनवर जोडण्यात येणार आहे.शहराला रोज ९५ द.ल.ली प्रति रोज पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी ११ नवीन टाक्या बांधणे गरजेचे असल्याचे मत चारथळ यांनी व्यक्त केले. शहरात सुरू असलेल्या अमृत योजनेंतर्गत सदर पाणी साठवण टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे आणखीन ११ नवीन टाक्यांचा खोडा कामयच आहे. अमृत योजनेचे कामे जरी मंदगतीने करण्यात येत असले. तरही पाणी टाक्या बांधणे गरजेचे आहे. तपोवन या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र असून, याच ठिकाणी ६५ दशलक्ष लीटर क्षमतेचे आणखी नवीन जलशुद्धीकरण केंद्र बसविण्यात येणार आहे. त्यामुळे एकाचवेळी शहराला मुबलक पाणीपुरवठा शक्य होणार आहे. प्रति माणशी पुरवठा १२५ लीटर्स प्रतिदिन एवढा करण्यात येतो.उच्च दाबाने व रात्री वाजताच्या आत शहरातील प्रत्येक प्रभागात पाणी पोहचवायचे असेल तर नवीन टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र व नवीन पाइपलाइनची कामे होणे गरजेचे आहे. अमृत योजनची कामे पूर्णत्वास गेल्यावर सर्व समस्यांवर मात करणे शक्य होणार आहे.- सुरेश चारथळ, मुख्य अभियंता मजीप्रा, अमरावती

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई