शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

११ जलकुंभ निर्मितीनंतरच नियमित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 22:08 IST

अंबानगरीत जीवन प्राधिकरणच्यावतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. अस्तित्वातील १५ पाण्याच्या टाकीवरून अंबानगरीला पाणीपुरवठा होत असला तरी उच्च दाबाने नागरिकांच्या घरांपर्यंत पाणी पोहचत नसल्याच्या तक्रारी आहेत.

ठळक मुद्देशहरात तोवर एक दिवसआड पाणी : मजीप्राच्या मुख्य अभियंत्यांची माहिती

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंबानगरीत जीवन प्राधिकरणच्यावतीने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. अस्तित्वातील १५ पाण्याच्या टाकीवरून अंबानगरीला पाणीपुरवठा होत असला तरी उच्च दाबाने नागरिकांच्या घरांपर्यंत पाणी पोहचत नसल्याच्या तक्रारी आहेत. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आणखी ११ नवीन टाक्या बांधल्यास नेहमीत पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असे जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सुरेश चारथळ यांनी सांगितले.अप्पर वर्धा धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. दोन वर्ष शहराला पुरेल एवढा पाणीसाठा (७० टक्के) धरणात सध्या शिल्लक आहे. परंतु तरी पूर्वी नियमित मिळणारे पाणी आता एकदिवसआड मिळत आहे. यासंदर्भात मुख्य अभियंत्यांशी चर्चा केली असता शहराची लोकसंख्या साडेआठ लाख असली तरी मजीप्राच्यावतीने अधिकृत कनेकशन ९० हजार देण्यात आले आहेत. मात्र यानंतर शहराचा नवीन विस्तार झाला असून, जुने काही कनेकशन नवीन पाईपलाईनवर जोडण्यात येणार आहे.शहराला रोज ९५ द.ल.ली प्रति रोज पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी ११ नवीन टाक्या बांधणे गरजेचे असल्याचे मत चारथळ यांनी व्यक्त केले. शहरात सुरू असलेल्या अमृत योजनेंतर्गत सदर पाणी साठवण टाक्या बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे आणखीन ११ नवीन टाक्यांचा खोडा कामयच आहे. अमृत योजनेचे कामे जरी मंदगतीने करण्यात येत असले. तरही पाणी टाक्या बांधणे गरजेचे आहे. तपोवन या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र असून, याच ठिकाणी ६५ दशलक्ष लीटर क्षमतेचे आणखी नवीन जलशुद्धीकरण केंद्र बसविण्यात येणार आहे. त्यामुळे एकाचवेळी शहराला मुबलक पाणीपुरवठा शक्य होणार आहे. प्रति माणशी पुरवठा १२५ लीटर्स प्रतिदिन एवढा करण्यात येतो.उच्च दाबाने व रात्री वाजताच्या आत शहरातील प्रत्येक प्रभागात पाणी पोहचवायचे असेल तर नवीन टाक्या, जलशुद्धीकरण केंद्र व नवीन पाइपलाइनची कामे होणे गरजेचे आहे. अमृत योजनची कामे पूर्णत्वास गेल्यावर सर्व समस्यांवर मात करणे शक्य होणार आहे.- सुरेश चारथळ, मुख्य अभियंता मजीप्रा, अमरावती

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई