शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चार हजार आरागिरणी परवान्यांचे नियमबाह्य नूतनीकरण; उद्योग व कामगार विभागाचे आदेश गुंडाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 18:24 IST

शासनाच्या उद्योग व कामगार विभागाने आरागिरणी उद्योग हे धोकादायक उद्योग जाहीर केले आहेत. दरवर्षी आरागिरणी परवान्यांचे नूतनीकरण करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्या तपासून घेणे बंधनकारक आहे. मात्र, किमान प्रदूषण प्रमाणपत्र नसतानासुद्धा राज्यात चार हजार आरागिरणी परवान्यांचे नूतनीकरण होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

- गणेश वासनिक

अमरावती : शासनाच्या उद्योग व कामगार विभागाने आरागिरणी उद्योग हे धोकादायक उद्योग जाहीर केले आहेत. दरवर्षी आरागिरणी परवान्यांचे नूतनीकरण करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून त्या तपासून घेणे बंधनकारक आहे. मात्र, किमान प्रदूषण प्रमाणपत्र नसतानासुद्धा राज्यात चार हजार आरागिरणी परवान्यांचे नूतनीकरण होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.केंद्र सरकारच्या जल (प्रतिबंध प्रदूषण आणि नियंत्रण) अधिनियम १९७४, वायू (प्रतिबंध प्रदूषण आणि नियंत्रण) अधिनियम १९८१, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ व नियम, घातक कायदा व्यवस्थापन आणि हाताळणी अधिनियम १९८९ (वर्गवारी बी ३०५०) नुसार कायदे आणि नियमांचे पालन आरागिरणी मालकांनी करणे बंधनकारक केले आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाच्या उद्योग व कामगार विभागाने ९ जुलै १९८१ रोजी उद्योग व कामगार विभागाने आरागिरणी व्यवसायाला धोकादायक उद्योग जाहीर केले. त्यामुळे आरागिरणीचे स्वरूप, व्यवस्था, हवा, पाणी, प्रदूषण, कामगारांची आरोग्य तपासणी, परिसर आदी बाबी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणी करून किमान प्रदूषण प्रमाणपत्र मिळविणे नियमावलीत समाविष्ट आहे. मात्र, १८९२ पासून ३६ वर्षांत एकाही आरागिरणी संचालकाने प्रदूषण नियंत्रण मंडळाक डून आरागिरण्यांची तपासणी केलेली नाही. वनविभागाच्या नोंदी राज्यात चार हजार आरागिरणी आहेत. बहुतांश आरागिरण्या नागरी वस्त्यांमध्ये असून, यातून निघणाºया धुरामुळे हवेत मोठ्या प्रमाणात प्रदूषण पसरते. मात्र, वनाधिकाºयांकडून आरागिरणी तपासणी करतेवेळी ठरलेल्या पॅटर्ननुसार परवान्याचे नूतनीकरण केले जाते. हा शिरस्ता नियमांना छेद देणारा असून,  ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा वनविभागाचा कारभार सुरू आहे. राज्यात ११ प्रादेशिक वनविभाग व ५१ आरागिरणी परवाना नूतनीकरण करणारे उपवनसंरक्षक यांनी नियमांचा भंग केल्याचे स्पष्ट होते. सर्वोच्च न्यायालयाने आरागिरण्यांचे नियम बदलू नये, असे आदेशित केले आहे. तथापि, नियमांना छेद देत आरागिरणी परवान्यांचे नूतनीकरण केले जात असल्याचे वास्तव आहे.

आॅनलाइन परवाना नूतनीकरणात ‘फिक्सिंग’आरागिरणी परवान्यांचे नूतनीकरण आता आॅनलाइन करण्यात येते. मात्र,  परवाना नूतनीकरणासाठी आॅनलाइन अर्ज सादर केले असता, व्हिजिट अधिकाºयांशी संगनमत करून मालकांकडून आरागिरणी ‘ओके’ असल्याचे ‘फिक्सिंग’ होत असल्याची माहिती आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ‘किमान प्रदूषण प्रमाणपत्र’ देखील तपासण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. आरागिरणी परवाने नूतनीकरणाची साखळी असून, यात दलालांचे साटेलोटे असल्याचे बोलले जात आहे.

प्रदूषण मंडळाचे शुल्क बुडाले१९८२ पासून आरागिरणी परवान्यांची नूतनीकरणासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणी झालेली नाही. त्यामुळे प्रदूषण तपासणीचे प्रति आरागिरणी तीन हजार रुपये शुल्क बुडविण्यास वनविभाग जबाबदार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

आरागिरणी परवान्यांचे नूतनीकरण आॅनलाइन असल्याने गैरप्रकाराला आळा बसणार आहे. नियमानुसारच आरागिरणी परवाने नूतनीकरण होईल. - हेमंत मिणाउपवनसंरक्षक, अमरावती.

टॅग्स :Amravatiअमरावती