शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आयकरदात्या शेतकऱ्यांकडून पीएम किसान निधीची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 05:00 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : आयकराचा भरणा करताना जिल्ह्यातील ५,७४५ शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या  ५ कोटी १३ ...

ठळक मुद्देमहसूलने बजावल्या नोटिशी, ५.१३ कोटी वसूलपात्र, ३० हजारांचीच वसुली

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आयकराचा भरणा करताना जिल्ह्यातील ५,७४५ शेतकऱ्यांनी पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या  ५ कोटी १३ लाख ७६ हजारांच्या निधीचा लाभ घेतला आहे. हा निधी परत घेण्यासाठी महसूल विभागाद्वारे तलाठ्यामार्फत आता या शेतकऱ्यांना निधी परत देण्यासाठी नोटीस बजावली आहे. केवळ धारणी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांच्या १५ हप्त्यांचे ३० हजार रुपये आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयास परत मिळाले आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान योजना सुरू केली. जिल्ह्यात या योजनेचे ३ लाख ३३ हजार ९११ लाभार्थी आहेत. या योजनेच्या आतापर्यंत दोन हजारांचे प्रत्येकी सहा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. या प्रक्रियेत लाभार्थी हा खरा शेतकरीच आहे, ही खातरजमा ऑनलाईन प्रक्रियेत झाली नसल्याने आयकर भरणाऱ्या ६ हजार ४१३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात साधारणपणे ५.१३ कोटी रुपये जमा झाल्याची बाब आात उघडकीस आली. महसूल विभागाद्वारा ही  रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. याशिवाय अनेक अपात्र शेतकऱ्यांच्याही खात्यात हे हप्ते जमा झाले आहेत. काही पात्र शेतकऱ्यांची मदत अन्य खात्यात जमा झाल्याच्याही तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. काही प्रकरणांत खातेदारांच्या मृत्यूनंतरही खात्यात निधी जमा झालेला आहे. यासाठी केंद्र शासनाने एसओपी पाठविली. त्यानुसार आता निधी परत घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. राज्याच्या कृषी आयुक्तालयाने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना  जिल्हास्तरावर दिल्या आहेत.वसुलीची प्रक्रिया सुरूजिल्ह्यातील १४ तालुक्यांत आयकर भरत असताना योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नोटीस बजावणे व रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सद्यस्थितीत धारणी तालुक्यातील तीन शेतकऱ्यांकडून १५ हप्तांची ३० हजारांची रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. इतर तालुक्यांतही नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. सद्यस्थितीत ४० टक्क्यांवर रक्कम तालुकास्तरावर वसूल करण्यात आली असली तरी जिल्हा कार्यालयात जमा करण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले.

सात-बारावर बोजा चढविणारआयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील रकमेच्या वसुलीसाठी महसूल विभागाद्वारे फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशा आशयाच्या नोटीस बजावल्या जात आहेत. ज्या शेतकऱ्यांनी असहकार्य केले, त्यांच्यावर आरआरसीद्वारे कारवाई करण्यात येणार आहे. न जुमानल्यास सात-बारावर बोजा चढविला जाणार आहे. बोजा कमी करण्याच्या वेळी सर्व रक्कम वसूल केली जाणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी