शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जात नाही जात 'भाऊ', खत खरेदी करताना येते आडवी!

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: March 30, 2023 11:07 IST

रासायनिक खतांची खरेदी करताना ई-पाॅसमध्ये शेतकऱ्यांच्या जात प्रवर्गाची नोंद

अमरावती : एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना दुसरीकडे रासायनिक खतांची खरेदी करताना शेतकऱ्यांना आजही जात सांगावी लागत आहे. निविष्ठा विक्रेत्यांद्वारा जात, प्रवर्गाची विचारणा करताच जात अन् खताचा संबंध काय, यासह अनेक प्रश्नांचा भडीमार होत आहे. याबाबत केंद्र शासनाचा निषेध करीत अनेक शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार जेवढे रासायनिक खत शेतकरी खरेदी करेल, त्याची ऑनलाइन नोंद ई-पॉस मशीनवर होते व तेवढ्याच प्रमाणात कंपनीला सबसिडी देण्यात येत आहे. यासाठी चार वर्षांपासून विक्रेत्यांना ई-पॉस मशीन देण्यात आलेल्या आहेत. अनेक ठिकाणी कनेक्टिव्हिटीचा त्रास असल्याने मोबाइल ॲपदेखील काही खत कंपन्यांद्वारा विक्रेत्यांना उपलब्ध करण्यात आलेले आहे.

येथपर्यत सर्व ठीक आहे. मात्र, ज्यावेळी शेतकऱ्यांनी खत विकत घेतल्याची नोंद करण्यात येते, त्यावेळी शेतकऱ्याचे नाव, गाव, खताचे नाव, किती बॅग घेतल्या यासह त्याची जात किंवा जातीचा प्रवर्ग नोंदविला जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. रासायनिक खत खरेदीसोबत जातीचा संबंध काय, असा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे. यामध्ये तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांद्वारा होत आहे.

सॅाफ्टवेअर अपडेटनंतर वाढला प्रवर्गाचा रकाना

अलीकडे ई-पॉस मशीनसंबंधी सॉफ्टवेअरचे अपडेशन करण्यात आल्यानंतर यामध्ये जातीचा रकाना वाढविण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली. यानुसार आता खते खरेदी करताना शेतकऱ्यांची जात प्रवर्गनिहाय वर्गवारी केली जात आहे. त्यामुळे खत विकत घ्यायचे झाल्यास शेतकऱ्यांना प्रवर्ग सांगावा लागत असल्याने त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत.

प्रवर्ग कशासाठी, कृषी विभागही अनभिज्ञ

ई-पॉस किंवा यासंबंधीच्या ॲपवर शेतकऱ्यांचा जातीनिहाय प्रवर्ग कशासाठी नोंदविला जात आहे. याची माहिती कृषी विभागाजवळही नाही. मात्र, प्रवर्ग नोंदविल्याशिवाय खत मिळत नाही. यासंबधी शासनाकडून काही माहिती आलेली नाही, ही सर्व प्रक्रिया केंद्र शासनाच्या अखत्यारीत असल्याचे सांगण्यात आले.

विधिमंडळात चर्चा, शासनाचे केंद्राला पत्र'

या अनुषंगाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा झाली. यावर मंत्र्यांनी ही बाब केंद्र शासनाच्या अख्यत्यारीत असल्याने केंद्र शासनाला याविषयी पत्र देऊन जात प्रवर्गाचा रकाना कमी करण्यात येईल, असे आश्वासन सभागृहाला देण्यात आले होते. आता अधिवेशनही संपले असताना प्रवर्गाचा रकाना कायम आहे.

पैसे घ्या अन् खत द्या. रासायनिक खत अन् शेतकऱ्यांच्या जातीचा संबंध काय, शेतकऱ्यांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या सरकारद्वारा होत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो.

- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस (ग्रा)

टॅग्स :agricultureशेतीAmravatiअमरावतीFarmerशेतकरी