शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

राज्यात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण, आॅडिटर्सने नोंदविले 51 लेखा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 17:26 IST

एक दोन नव्हे, तर चक्क १३ योजनांमधून गाव-खेड्यांत पाणीपुरवठा योजना राबविली जाते. मात्र राज्यात ४३,६६४ गावे अजूनही टंचाईमुक्त झाले नसल्याचे भीषण वास्तव आहे.

गणेश वासनिकअमरावती : एक दोन नव्हे, तर चक्क १३ योजनांमधून गाव-खेड्यांत पाणीपुरवठा योजना राबविली जाते. मात्र राज्यात ४३,६६४ गावे अजूनही टंचाईमुक्त झाले नसल्याचे भीषण वास्तव आहे. आजही ग्रामीण भागात आया-बहिणींना तीन ते चार किलोमीटरचे अंतर गाठून पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पाणीपुरवठ्याच्या योजना यशस्वीपणे राबविल्या नसून यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आक्षेप नोंदवून ५१ मुद्द्यांचा अहवाल लेखापरीक्षकांनी सन २०१२-२०१३ मध्ये शासनाकडे पाठविला.केंद्र आणि राज्य शासनाकडून राष्ट्रीय पेलजल योजनेसाठी निधी, अनुदान प्राप्त होते. जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हा परिषद त्यानंतर योजना मंजूर होताच त्या गावातील ग्रामीण पाणीपुरवठा समितीकडे निधी वळता केला जातो. त्यामुळे या योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याचे वास्तव आहे. जिल्हा परिषदांमध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता हा स्वतंत्र विभाग आहे.मात्र, १७ मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत लोकसहभाग आवश्यक केला. योजनेच्या अंमलबजावणीसाठी वेगळे खाते असण्याबाबतचे धोरण निश्चित केले. त्यामुळे जिल्हा परिषदांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी खर्च केलेल्या निधीचे राज्यात आॅडिट झाले नाही. स्थानिक निधी लेखा विभागाने लेखा परीक्षण करणे नियमावली आहे. मात्र, आजतागायत या विभागाने आॅडिट केले नाही. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत होणाºया भ्रष्टाचारापासून राज्य विधिमंडळाची पंचायत राज समितीदेखील कोसो दूर आहे.दरवर्षी १ आॅक्टोबर रोजी टंचाईग्रस्त गावांची सिंचन क्षमता तपासून पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर केला जातो. परंतु ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबविताना पाण्याचे स्त्रोत न तपासता अंमलबजावणी केली जाते. योजनेतून वर्ष, दोन वर्षे पाणी मिळते. त्यानंतर पाणीपुरवठा ह्यजैसे थेह्ण ही स्थिती राज्यभर आहे.परिणामी १ मे १९६० पासून महाराष्ट्र निर्मितीनंतरही गत ५७ वर्षांपासून गावांत पाणी टंचाईचा शाप कायम आहे. आतापर्यंत हजारो कोटी रुपयांची ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवर उधळण झाली. मात्र, निधी कोठे गेला, हा संशोधनाचा विषय आहे. शासनाकडून या योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही. तथापि, जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता, पदाधिकारी व लोकल फंड यांच्या आशीर्वादाने या योजनेतील निधीची सर्रास लूट होत आहे. सहा महिन्यांपूर्वी वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची बाब निदर्शनास आली आहे.सनदी आॅडिटर्सकडून लेखापरीक्षणस्थानिक स्वराज्य संस्थांचे आॅडिट करण्यासाठी लोकल आॅडिट फंड असताना शासनाने २६ मे २०१६ रोजीच्या निर्णयानुसार ग्रामीण पाणीपुरवठ्याचे लेखापरिक्षणाकरिता सनदी लेखापरीक्षकांची नेमणूक करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे या योजनेत जिल्हा परिषदांचे पदाधिकारी, संनियंत्रण करणारे अधिकारी व सक्षम प्राधिकरण यांना भ्रष्टाचार करण्यास वाव मिळत आहे. गत १५ वर्षांपासून पाणीपुरवठा योजनेत ह्यपाणी मुरतह्ण आहे.१३ योजनांमधून पाणीपुरवठ्याचा निधीग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी दलित वस्ती, पथदर्शी प्रकल्प, जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद स्तरावर २० टक्के निधी योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, आमदार निधी, खासदार निधी, युआडीएमटी, एलआयसी, राष्ट्रीय पेयजल योजना, पथदर्शी प्रकल्प, भारत निर्माण योजनेतून निधी मिळतो.

टॅग्स :AmravatiअमरावतीWaterपाणी