शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण, आॅडिटर्सने नोंदविले 51 लेखा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 17:26 IST

एक दोन नव्हे, तर चक्क १३ योजनांमधून गाव-खेड्यांत पाणीपुरवठा योजना राबविली जाते. मात्र राज्यात ४३,६६४ गावे अजूनही टंचाईमुक्त झाले नसल्याचे भीषण वास्तव आहे.

गणेश वासनिकअमरावती : एक दोन नव्हे, तर चक्क १३ योजनांमधून गाव-खेड्यांत पाणीपुरवठा योजना राबविली जाते. मात्र राज्यात ४३,६६४ गावे अजूनही टंचाईमुक्त झाले नसल्याचे भीषण वास्तव आहे. आजही ग्रामीण भागात आया-बहिणींना तीन ते चार किलोमीटरचे अंतर गाठून पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पाणीपुरवठ्याच्या योजना यशस्वीपणे राबविल्या नसून यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आक्षेप नोंदवून ५१ मुद्द्यांचा अहवाल लेखापरीक्षकांनी सन २०१२-२०१३ मध्ये शासनाकडे पाठविला.केंद्र आणि राज्य शासनाकडून राष्ट्रीय पेलजल योजनेसाठी निधी, अनुदान प्राप्त होते. जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हा परिषद त्यानंतर योजना मंजूर होताच त्या गावातील ग्रामीण पाणीपुरवठा समितीकडे निधी वळता केला जातो. त्यामुळे या योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याचे वास्तव आहे. जिल्हा परिषदांमध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता हा स्वतंत्र विभाग आहे.मात्र, १७ मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत लोकसहभाग आवश्यक केला. योजनेच्या अंमलबजावणीसाठी वेगळे खाते असण्याबाबतचे धोरण निश्चित केले. त्यामुळे जिल्हा परिषदांनी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी खर्च केलेल्या निधीचे राज्यात आॅडिट झाले नाही. स्थानिक निधी लेखा विभागाने लेखा परीक्षण करणे नियमावली आहे. मात्र, आजतागायत या विभागाने आॅडिट केले नाही. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत होणाºया भ्रष्टाचारापासून राज्य विधिमंडळाची पंचायत राज समितीदेखील कोसो दूर आहे.दरवर्षी १ आॅक्टोबर रोजी टंचाईग्रस्त गावांची सिंचन क्षमता तपासून पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर केला जातो. परंतु ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबविताना पाण्याचे स्त्रोत न तपासता अंमलबजावणी केली जाते. योजनेतून वर्ष, दोन वर्षे पाणी मिळते. त्यानंतर पाणीपुरवठा ह्यजैसे थेह्ण ही स्थिती राज्यभर आहे.परिणामी १ मे १९६० पासून महाराष्ट्र निर्मितीनंतरही गत ५७ वर्षांपासून गावांत पाणी टंचाईचा शाप कायम आहे. आतापर्यंत हजारो कोटी रुपयांची ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवर उधळण झाली. मात्र, निधी कोठे गेला, हा संशोधनाचा विषय आहे. शासनाकडून या योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही. तथापि, जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणीपुरवठा अभियंता, पदाधिकारी व लोकल फंड यांच्या आशीर्वादाने या योजनेतील निधीची सर्रास लूट होत आहे. सहा महिन्यांपूर्वी वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यात ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची बाब निदर्शनास आली आहे.सनदी आॅडिटर्सकडून लेखापरीक्षणस्थानिक स्वराज्य संस्थांचे आॅडिट करण्यासाठी लोकल आॅडिट फंड असताना शासनाने २६ मे २०१६ रोजीच्या निर्णयानुसार ग्रामीण पाणीपुरवठ्याचे लेखापरिक्षणाकरिता सनदी लेखापरीक्षकांची नेमणूक करण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे या योजनेत जिल्हा परिषदांचे पदाधिकारी, संनियंत्रण करणारे अधिकारी व सक्षम प्राधिकरण यांना भ्रष्टाचार करण्यास वाव मिळत आहे. गत १५ वर्षांपासून पाणीपुरवठा योजनेत ह्यपाणी मुरतह्ण आहे.१३ योजनांमधून पाणीपुरवठ्याचा निधीग्रामीण भागात पाणीपुरवठ्यासाठी दलित वस्ती, पथदर्शी प्रकल्प, जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद स्तरावर २० टक्के निधी योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, आमदार निधी, खासदार निधी, युआडीएमटी, एलआयसी, राष्ट्रीय पेयजल योजना, पथदर्शी प्रकल्प, भारत निर्माण योजनेतून निधी मिळतो.

टॅग्स :AmravatiअमरावतीWaterपाणी