शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

पश्चिम विदर्भातील वास्तव : ६ महिन्यात ५५७ शेतकऱ्यांनी ओढला मृत्यूचा फास; अस्मानी, सुल्तानी संकटाचे रोज ३ बळी

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: July 9, 2024 22:31 IST

शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करणार असल्याची घोषणा दोन दशकापासून प्रत्येक राज्यकर्त्यांद्वारा करण्यात आलेली आहे.

अमरावती : राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या पश्चिम विदर्भात होत आहेत. यंदाच्या सहा महिन्यात म्हणजेच जून अखेर ५५७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. यामध्ये सर्वाधिक १७० शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झालेल्या आहे. शासन-प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दरदिवशी तीन शेतकरी अस्मानी-सुलतानी संकटाचे बळी ठरले आहेत.

दुष्काळ, नापिकी, नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारी, कर्ज वसुलीसाठी तगादा, मुलींचे लग्न, आजारपण यासह अन्य कारणांमुळे पश्चिम विदर्भात शेतकरी मृत्यूचा फास ओढत आहे. सन २००१ पासून राज्यातील शेतकरी आत्महत्या प्रवण १४ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची नोंद घेतल्या जात आहे. त्यानुसार अमरावती विभागात आतापर्यंत २०,६३० शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यापैकी ९,५१६ प्रकरणांमध्ये शासन मदत देण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाने दिली.

शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करणार असल्याची घोषणा दोन दशकापासून प्रत्येक राज्यकर्त्यांद्वारा करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात या गंभीर विषयाकडे शासन-प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. शासन योजनांचा लाभ गरजू शेतकऱ्यांना मिळत नाही. मृत शेतकऱ्याच्या वारसाला मिळणाऱ्या एक लाखांच्या शासन मदतीच्या निकषात १९ वर्षांपासून वाढ करण्यात आलेली नसल्याचे वास्तव आहे.

सन २००१ पासून विभागातील स्थितीएकूण शेतकरी आत्महत्या : २०६३०शासन मदत प्राप्त प्रकरणे : ९५१६विविध कारणांनी नाकारली : १०६७६चौकशीसाठी प्रलंबित प्रकरणे : ३०६

अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्याराज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहे. मात्र, याची कारणमीमांसा जिल्हा प्रशासनाने केलेली नाही. शेतकरी आत्महत्यांची क्लस्टर शोधून उपाययोजना राबविण्याचे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले होते. मात्र, पुढे काही झालेच नाही. अमरावती जिल्ह्यात यंदाच्या सहा महिन्यात १७० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. दर ३० तासात एक शेतकरी आत्महत्या होत असल्याची शोकांतिका आहे.

मार्च महिन्यात सर्वाधिक ११७ प्रकरणेविभागात सहा महिन्यात ५५७ शेतकऱ्यांनी मृत्यूचा घोट घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक ११७ शेतकरी आत्महत्या मार्च महिन्यात झाल्या आहेत. जानेवारीत ९०, फेब्रुवारीमध्ये १००, एप्रिल ९६, मे ८४ व जून महिन्यात ७० शेतकरी आत्महत्या झाल्या. जूनअखेर अमरावती जिल्ह्यात १७०, यवतमाळ १५०, बुलढाणा १११, अकोला ९२ व वाशिम जिल्ह्यात ३४ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.

 

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरी