शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

बच्चू कडूंसोबतचा वाद आता संपलेला आहे - रवी राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2022 16:25 IST

बच्चू कडू यांच्या भाषणानंतर रवी राणांची प्रतिक्रिया

अमरावतीमाझा बच्चू कडूंबोसतचा वाद आता संपलेला आहे. लोकशाहीत असं घडत असतं, असे विषय संपवून पुढे जायला हवं असं आमदार रवी राणा म्हणाले. शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्न, बेरोजगारीसंबंधी प्रश्नासाठी आता काम करायचयं, असंही त्यांनी नमूद केलं. आज अमरावतीत प्रहार संघटनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात बच्चू कडूंनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली.

गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला आहे. रवी राणा यांनी आपले शब्द मागे घेत असल्याचे म्हणत दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर बच्चू कडूंच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागून होतं. आज प्रहारच्या मेळाव्यात बोलताना बच्चू कडू यासंदर्भात आपली भूमिका मांडली. पहिली वेळ आहे म्हणून माफ केलं पुढच्यावेळेस माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. प्रहार हा काही आंडूपाडूंचा पक्ष नाही. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही आणि गेलो तर कोथळा काढतो, असंही कडू म्हणाले. 

Bachchu Kadu: मै झुकेगा नहीं! पहिली वेळ होती, पण पुन्हा माफी नाही; बच्चू कडूंनी स्पष्ट केली भूमिका

"रवी राणांनी झालेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्ती केली त्याचा मी आनंद व्यक्त करतोय. नाहीतर उगाच आम्हाला हातपाय हलवायला लागले असते. त्यांनी मोठेपणा घेतला आणि त्यांना आपली चूक लक्षात आली. तुम्ही दोन पावलं मागे घेतली तर आम्ही चार पावलं मागे घेऊ. आम्हाला आमची एनर्जी अशा कामात वाया घालवायची नाही. त्यामुळे हा विषय आता संपला आहे आणि राज्यातील कष्टकरी, गोरगरीब जनतेच्या कामासाठी वेळ सत्कारणी लागावा यासाठी आम्ही झटत राहू", असं बच्चू कडू म्हणाले. 

यानंतर, रवी राणा यांनी आमच्यातील वाद आत संपला असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं. माझ्या विरोधात ५० उमेदवार उभे राहतात. किती जरी उमेदवार उभे राहिले. तरी जनता माझ्यासोबत आहे. जनेतेचा आशिर्वाद ज्याच्यावर असतो, तोच जिंकून येतो असंही रवी राणा म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणRavi Ranaरवि राणाBacchu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावती