शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

बच्चू कडूंसोबतचा वाद आता संपलेला आहे - रवी राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2022 16:25 IST

बच्चू कडू यांच्या भाषणानंतर रवी राणांची प्रतिक्रिया

अमरावतीमाझा बच्चू कडूंबोसतचा वाद आता संपलेला आहे. लोकशाहीत असं घडत असतं, असे विषय संपवून पुढे जायला हवं असं आमदार रवी राणा म्हणाले. शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्न, बेरोजगारीसंबंधी प्रश्नासाठी आता काम करायचयं, असंही त्यांनी नमूद केलं. आज अमरावतीत प्रहार संघटनेचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात बच्चू कडूंनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली.

गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला आहे. रवी राणा यांनी आपले शब्द मागे घेत असल्याचे म्हणत दिलगिरी व्यक्त केली होती. त्यानंतर बच्चू कडूंच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागून होतं. आज प्रहारच्या मेळाव्यात बोलताना बच्चू कडू यासंदर्भात आपली भूमिका मांडली. पहिली वेळ आहे म्हणून माफ केलं पुढच्यावेळेस माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. प्रहार हा काही आंडूपाडूंचा पक्ष नाही. आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही आणि गेलो तर कोथळा काढतो, असंही कडू म्हणाले. 

Bachchu Kadu: मै झुकेगा नहीं! पहिली वेळ होती, पण पुन्हा माफी नाही; बच्चू कडूंनी स्पष्ट केली भूमिका

"रवी राणांनी झालेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्ती केली त्याचा मी आनंद व्यक्त करतोय. नाहीतर उगाच आम्हाला हातपाय हलवायला लागले असते. त्यांनी मोठेपणा घेतला आणि त्यांना आपली चूक लक्षात आली. तुम्ही दोन पावलं मागे घेतली तर आम्ही चार पावलं मागे घेऊ. आम्हाला आमची एनर्जी अशा कामात वाया घालवायची नाही. त्यामुळे हा विषय आता संपला आहे आणि राज्यातील कष्टकरी, गोरगरीब जनतेच्या कामासाठी वेळ सत्कारणी लागावा यासाठी आम्ही झटत राहू", असं बच्चू कडू म्हणाले. 

यानंतर, रवी राणा यांनी आमच्यातील वाद आत संपला असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं. माझ्या विरोधात ५० उमेदवार उभे राहतात. किती जरी उमेदवार उभे राहिले. तरी जनता माझ्यासोबत आहे. जनेतेचा आशिर्वाद ज्याच्यावर असतो, तोच जिंकून येतो असंही रवी राणा म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणRavi Ranaरवि राणाBacchu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावती