शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
6
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
7
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
8
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
9
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

राजुराबाजारला पाणी टंचाईच्या तीव्र झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 00:18 IST

राजूराबाजारसह परिसरातील ११ गांवाना पाणीपुरवठा व्हावा म्हणून कोट्यवधी रूपये खर्च करून तयार केलेली ११ गाव

११ गावे योजना कुचकामी : १५ पासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण वरूड : राजूराबाजारसह परिसरातील ११ गांवाना पाणीपुरवठा व्हावा म्हणून कोट्यवधी रूपये खर्च करून तयार केलेली ११ गाव ग्रामीण पाणीपुरवठा योजना पूर्णत: कुचकामी ठरली आहे. राजुराबाजार गावांत उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवत आहेत. यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा उद्रेक झाला असून ही योजना राजुराबाजार ग्रापंला हस्तांतरित करण्याची मागणी पूर्ण न झाल्यास १५ मार्चपासून उपोषणाचा इशारा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. ११ गावे पाणीपुरवठा योजनेचे सद्यस्थितीत तीनतेरा वाजले आहेत. १० गावे योजनेंतर्गत पाणी घेत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राजुराबाजार येथील पाण्याची भीषण समस्या लक्षात घेता ही योजना राजुराबाजार ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्याची मागणी होत आहे. याची पूर्तता न झाल्यास १५ मार्चपासून बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा सरपंच, उपसरपंच तसेच पदाधिकाऱ्यांनी जि.प. सीईओंना सादर निवेदनातून दिला आहे. सद्यस्थितीत राजुराबाजार गावांत तीव्र पाणीटंचाई आहे. ग्रामस्थांना सात दिवसांआड पाणी मिळते. केवळ दोन खासगी बोअर अधिग्रहित करून गावकऱ्यांची तहान भागविली जात असल्यामुळे या योजनेत समाविष्ट इतर १० गावांनी पर्यायी व्यवस्था करून सदर योजनेतून पाणी घेण्यास नकार देऊन तसे ठरावसुद्धा पारित केले. तरीसुद्धा योजनेची विद्युत देयके या ग्रामंपचायतींवरच लादली जात आहेत. सद्यस्थितीत या योजनेतून केवळ राजुराबाजार ग्रामपंचायत पाणी घेत आहे. परंतु पाणीटंचाईचे कायम सावट असल्याने पाणीपुरवठा समितीने ही योजना राजुराबाजार ग्रामपंचायतीला हस्तांतरित करावी, अशी मागणी सरपंच रेखा साबळे, उपसरपंच शिवा शिवहरेसह सदस्यांनी केली आहे. भविष्यात योजनेतून बाहेर पडलेल्या १० गावांना पाणीटंचार्ई भासली, तर नियम व अटींच्या अधीन राहून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासनसुद्धा पत्रामध्ये दिले आहे. योजनेवर विद्युत देयके किंवा इतर सर्व प्रकारची थकबाकी निरंक करून ही योजना हस्तांतरित करण्यास तयार आहे. या योजनेतून पाणी मिळाल्यास राजुराबाजारच्या नागरिकांची तहान भागविणे शक्य होईल. योजनेचे हस्तातंरण न केल्यास सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांसह १५ मार्चपासून वरूड पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आणि जनआंदोलन करण्याचा इशारा जि.प.मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना सादर पत्रातून दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजुराबाजारची तीव्र पाणीटंचाई चव्हाट्यावर आली आहे. (तालुका प्रतिनिधी)