शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

राजुराबाजारला पाणी टंचाईच्या तीव्र झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 00:18 IST

राजूराबाजारसह परिसरातील ११ गांवाना पाणीपुरवठा व्हावा म्हणून कोट्यवधी रूपये खर्च करून तयार केलेली ११ गाव

११ गावे योजना कुचकामी : १५ पासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे उपोषण वरूड : राजूराबाजारसह परिसरातील ११ गांवाना पाणीपुरवठा व्हावा म्हणून कोट्यवधी रूपये खर्च करून तयार केलेली ११ गाव ग्रामीण पाणीपुरवठा योजना पूर्णत: कुचकामी ठरली आहे. राजुराबाजार गावांत उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवत आहेत. यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा उद्रेक झाला असून ही योजना राजुराबाजार ग्रापंला हस्तांतरित करण्याची मागणी पूर्ण न झाल्यास १५ मार्चपासून उपोषणाचा इशारा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. ११ गावे पाणीपुरवठा योजनेचे सद्यस्थितीत तीनतेरा वाजले आहेत. १० गावे योजनेंतर्गत पाणी घेत नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राजुराबाजार येथील पाण्याची भीषण समस्या लक्षात घेता ही योजना राजुराबाजार ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्याची मागणी होत आहे. याची पूर्तता न झाल्यास १५ मार्चपासून बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा सरपंच, उपसरपंच तसेच पदाधिकाऱ्यांनी जि.प. सीईओंना सादर निवेदनातून दिला आहे. सद्यस्थितीत राजुराबाजार गावांत तीव्र पाणीटंचाई आहे. ग्रामस्थांना सात दिवसांआड पाणी मिळते. केवळ दोन खासगी बोअर अधिग्रहित करून गावकऱ्यांची तहान भागविली जात असल्यामुळे या योजनेत समाविष्ट इतर १० गावांनी पर्यायी व्यवस्था करून सदर योजनेतून पाणी घेण्यास नकार देऊन तसे ठरावसुद्धा पारित केले. तरीसुद्धा योजनेची विद्युत देयके या ग्रामंपचायतींवरच लादली जात आहेत. सद्यस्थितीत या योजनेतून केवळ राजुराबाजार ग्रामपंचायत पाणी घेत आहे. परंतु पाणीटंचाईचे कायम सावट असल्याने पाणीपुरवठा समितीने ही योजना राजुराबाजार ग्रामपंचायतीला हस्तांतरित करावी, अशी मागणी सरपंच रेखा साबळे, उपसरपंच शिवा शिवहरेसह सदस्यांनी केली आहे. भविष्यात योजनेतून बाहेर पडलेल्या १० गावांना पाणीटंचार्ई भासली, तर नियम व अटींच्या अधीन राहून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासनसुद्धा पत्रामध्ये दिले आहे. योजनेवर विद्युत देयके किंवा इतर सर्व प्रकारची थकबाकी निरंक करून ही योजना हस्तांतरित करण्यास तयार आहे. या योजनेतून पाणी मिळाल्यास राजुराबाजारच्या नागरिकांची तहान भागविणे शक्य होईल. योजनेचे हस्तातंरण न केल्यास सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांसह १५ मार्चपासून वरूड पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आणि जनआंदोलन करण्याचा इशारा जि.प.मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना सादर पत्रातून दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा राजुराबाजारची तीव्र पाणीटंचाई चव्हाट्यावर आली आहे. (तालुका प्रतिनिधी)