शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

कृषिमंत्र्यांनी काहीच बोलू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला असावा - राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 18:03 IST

कापसू, तूर, सोयाबीन, धान, ऊसाला हमीभाव नाही. कर्जमाफीचा फज्जा उडाला. शेतकरी विवंचनेत असताना राज्याच्या कृषिमंत्र्यांनी यासंदर्भात काहीच बोलू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला असावा, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी येथे सोमवारी केली.

अमरावती : कापसू, तूर, सोयाबीन, धान, ऊसाला हमीभाव नाही. कर्जमाफीचा फज्जा उडाला. शेतकरी विवंचनेत असताना राज्याच्या कृषिमंत्र्यांनी यासंदर्भात काहीच बोलू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला असावा, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी येथे सोमवारी केली.अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात आमला विश्वेश्र्वर येथे आयोजित सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या दुष्काळ परिषदेत सहभागी होण्यासाठी आले असता त्यांनी पत्रपरिषेदतून केंद्र आणि राज्य सरकारवर प्रहार केला. निसर्गाच्या लहरीपणामुळे विदर्भात कापूस, सोयाबीनचे ६० ते ७० टक्के उत्पादन घटले. विदर्भात बोंडअळीचे आक्रमण हे कृषी खात्याचे अपयश आहे. शेतकºयांना वेळीच प्रगत तंत्रज्ञानाची माहिती दिली नाही. बीेटी आणि बोगस बियाणांमुळे शेतक-यांवर ही परिस्थिती आल्याचा आरोप त्यांनी केला. जेमतेम पीक हाती आले असताना शेतक-यांना बाजारपेठेत हमीभाव नाही, तर दुसरीकडे सरकार शासकीय खरेदी केंद्र सुरू करीत नाही, असे विदारक चित्र आहे. विषारी कीटकनाशक फवारणीने अनेक शेतक-यांचे बळी गेले, हे कृषी खात्याचे अपयश आहे. कृषी अधिकारी हे कृषी सेवा केंद्र, औषध कंपन्यांकडून हप्ते वसुलीत मग्न असल्याचा आरोप त्यांनी केला. बोंडअळीने नुकसान भरपाईचे तातडीने पंचनामे करून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी सरकारकडे मागणी असेल. दलाल, व्यापा-यांच्या पाठीशी हे शासन असल्याने नाफेड, एफसीआय यावर पीएचडी करावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पत्रपरिषदेला रविकांत तुपकर, अमित अढाऊ, प्रवीण मोहोड, शाम अडथळे, जि.प. सदस्य देवेंद्र भुयार, रवि पडोळे आदी उपस्थित होते.

गुजरातमध्ये शेतकरी नेत्यांसाठी प्रचार करूकेंद्र सरकार हे शेतक-यांविरुद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीत शेतक-यांच्या हितासाठी निवडणूक लढविणाºया उमेदवारांच्या प्रचारासाठी तेथे जाणार, असे खा. शेट्टी म्हणाले. सातबारा कोरा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कर्जमाफीत घोळ; सरकार गंभीर नाहीराज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरी यात घोळ कायम आहे. कर्जमाफीची संख्या किती, हा आकडा जाहीर केला नाही. आॅनलाईन अर्जाच्या नावे आयटी कंपनीने गोंधळ करून ठेवला. त्यामुळे आता बँकांकडे पुन्हा कर्जमाफीची रक्कम वळती करण्यात आली. आयटी निविदा प्रक्रियेत अपहाराला मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक जबाबदार आहे. अज्ञानामुळे कर्जमाफीचा बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप खा. शेट्टी यांनी केला. शेतकरी आंदोलनकर्त्यांना घेऊन येणारी रेल्वे तब्बल १८० किमी भरकटली. त्याबाबत पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

पाकिस्तानातून कांदा आयातीचे पाप सरकारचेचपाकिस्तान हा शत्रू देश असल्याचे भासवून त्याच देशातून कांदा आयात करण्याचे पाप नरेंद्र मोदी सरकारने केल्याचा आरोप खा. शेट्टी यांनी केला. जेव्हा पाकिस्तानात ३०० रूपये किलो दराने टोमॅटो विकले जात होते, तेव्हा भारतातून टोमॅटो मागविण्यास पाकिस्तानने नकार दिला, असे ते म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी