शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

कृषिमंत्र्यांनी काहीच बोलू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला असावा - राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 18:03 IST

कापसू, तूर, सोयाबीन, धान, ऊसाला हमीभाव नाही. कर्जमाफीचा फज्जा उडाला. शेतकरी विवंचनेत असताना राज्याच्या कृषिमंत्र्यांनी यासंदर्भात काहीच बोलू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला असावा, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी येथे सोमवारी केली.

अमरावती : कापसू, तूर, सोयाबीन, धान, ऊसाला हमीभाव नाही. कर्जमाफीचा फज्जा उडाला. शेतकरी विवंचनेत असताना राज्याच्या कृषिमंत्र्यांनी यासंदर्भात काहीच बोलू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला असावा, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी येथे सोमवारी केली.अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात आमला विश्वेश्र्वर येथे आयोजित सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या दुष्काळ परिषदेत सहभागी होण्यासाठी आले असता त्यांनी पत्रपरिषेदतून केंद्र आणि राज्य सरकारवर प्रहार केला. निसर्गाच्या लहरीपणामुळे विदर्भात कापूस, सोयाबीनचे ६० ते ७० टक्के उत्पादन घटले. विदर्भात बोंडअळीचे आक्रमण हे कृषी खात्याचे अपयश आहे. शेतकºयांना वेळीच प्रगत तंत्रज्ञानाची माहिती दिली नाही. बीेटी आणि बोगस बियाणांमुळे शेतक-यांवर ही परिस्थिती आल्याचा आरोप त्यांनी केला. जेमतेम पीक हाती आले असताना शेतक-यांना बाजारपेठेत हमीभाव नाही, तर दुसरीकडे सरकार शासकीय खरेदी केंद्र सुरू करीत नाही, असे विदारक चित्र आहे. विषारी कीटकनाशक फवारणीने अनेक शेतक-यांचे बळी गेले, हे कृषी खात्याचे अपयश आहे. कृषी अधिकारी हे कृषी सेवा केंद्र, औषध कंपन्यांकडून हप्ते वसुलीत मग्न असल्याचा आरोप त्यांनी केला. बोंडअळीने नुकसान भरपाईचे तातडीने पंचनामे करून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी सरकारकडे मागणी असेल. दलाल, व्यापा-यांच्या पाठीशी हे शासन असल्याने नाफेड, एफसीआय यावर पीएचडी करावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पत्रपरिषदेला रविकांत तुपकर, अमित अढाऊ, प्रवीण मोहोड, शाम अडथळे, जि.प. सदस्य देवेंद्र भुयार, रवि पडोळे आदी उपस्थित होते.

गुजरातमध्ये शेतकरी नेत्यांसाठी प्रचार करूकेंद्र सरकार हे शेतक-यांविरुद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणुकीत शेतक-यांच्या हितासाठी निवडणूक लढविणाºया उमेदवारांच्या प्रचारासाठी तेथे जाणार, असे खा. शेट्टी म्हणाले. सातबारा कोरा झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कर्जमाफीत घोळ; सरकार गंभीर नाहीराज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरी यात घोळ कायम आहे. कर्जमाफीची संख्या किती, हा आकडा जाहीर केला नाही. आॅनलाईन अर्जाच्या नावे आयटी कंपनीने गोंधळ करून ठेवला. त्यामुळे आता बँकांकडे पुन्हा कर्जमाफीची रक्कम वळती करण्यात आली. आयटी निविदा प्रक्रियेत अपहाराला मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक जबाबदार आहे. अज्ञानामुळे कर्जमाफीचा बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप खा. शेट्टी यांनी केला. शेतकरी आंदोलनकर्त्यांना घेऊन येणारी रेल्वे तब्बल १८० किमी भरकटली. त्याबाबत पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले. चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

पाकिस्तानातून कांदा आयातीचे पाप सरकारचेचपाकिस्तान हा शत्रू देश असल्याचे भासवून त्याच देशातून कांदा आयात करण्याचे पाप नरेंद्र मोदी सरकारने केल्याचा आरोप खा. शेट्टी यांनी केला. जेव्हा पाकिस्तानात ३०० रूपये किलो दराने टोमॅटो विकले जात होते, तेव्हा भारतातून टोमॅटो मागविण्यास पाकिस्तानने नकार दिला, असे ते म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टी