शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

राजापेठ उड्डाण पुलाचे भूमिपूजन नको; आता थेट काम सुरु

By admin | Updated: August 6, 2015 01:27 IST

येथील बहुप्रतिक्षित राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पुलाच्या निर्मितीसाठी आता कोणत्याही भूमिपूजनाची औपचारिकता करणार नाही,...

आयुक्तांचा निर्णय : ४०.५३ कोटी रुपयांत ठरला कंत्राटअमरावती : येथील बहुप्रतिक्षित राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाण पुलाच्या निर्मितीसाठी आता कोणत्याही भूमिपूजनाची औपचारिकता करणार नाही, थेट काम सुरु करुन दोन वर्षांत हा पूल नागरिकांच्या सेवेत दाखल होईल, असा निर्णय आयुक्तांनी घेतल्याची माहिती महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता जीवन सदार यांनी दिली.राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवरील प्रस्तावित उड्डाण पुलाच्या निर्मितीचे काम नागपूर येथील चाफेकर अ‍ॅन्ड कन्स्ट्रक्शन कंपनीकडे सोपविण्याच्या कंत्राटावर शिक्कामोर्तब झाल्याच्या पार्श्वभूमिवर ते पत्रपरिषदेत बोलत होते. सदार यांच्या मते उड्डाण पूल निर्मितीसाठी राबविण्यात आलेल्या कंत्राट प्रक्रियेत पाच कंत्राटदारांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी कमी दराच्या ४१.०६ कोटी रुपयांची निविदा मान्य करण्यात आली. प्रशासनाने वाटाघाटीच्या वेळी सदर कन्स्ट्रक्शन कंपनीकडून ५६.१० लाख रुपये कमी करण्यात यश मिळविले. त्यानुसार उड्डापुलाच्या निर्मितीसाठी ४०.५३ कोटी रुपयांची निविदा मान्य करुन पुढील करारनाम्यासाठी हा प्रस्ताव स्थायी समिती पुढे जाणार आहे. सन २०१३- २०१४ च्या बांधकाम दरानुसार निविदा मंजूर केली असून यात आयुर्विमा, मजूर, डिझाईन, व्यवस्थापन खर्च असे एकुण ३५ टक्के वाढीनुसार निविदेला मान्यता दिली आहे. ३२.६२ कोटी रुपयांची चाफेकर यांनी निविदा सादर केली होती. वाटाघाटीनंतर ही रक्कम ३५.६० कोटी रुपयांची ठरविण्यात आली. पुलाला एकुण पाच अप्रोच मार्ग राहणार असून स्थानिक शंकरनगर परिसरातील ४०० चौरस फूट जागा पुलाच्या निर्मितीसाठी हस्तांतरित केली जाणार आहे. १० कोटी रुपये तिजोरीत जमा आहेत. (प्रतिनिधी)