शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

राजापेठ उड्डाण पुलाचे भिजतघोंगडे कायम!

By admin | Updated: March 8, 2015 00:13 IST

यापूर्वी आमदार, खासदारांनी भूमिपूजन केल्यानंतरही आजतागायत सुरु न झालेल्या येथील राजापेठ उड्डाणपूल निर्मितीचे भिजत घोंगळे कायम आहे.

अमरावती : यापूर्वी आमदार, खासदारांनी भूमिपूजन केल्यानंतरही आजतागायत सुरु न झालेल्या येथील राजापेठ उड्डाणपूल निर्मितीचे भिजत घोंगळे कायम आहे. गत आठवड्यात या पुलाच्या निर्मितीची महापालिकेने चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबविली. मात्र दोनच कंत्राटदारांच्या निविदा प्राप्त झाल्यात. त्यातही ४३ टक्के जास्त दराने निविदा आहेत. त्यामुळे कंत्राटदारांना ९ मार्च रोजी महापालिका आयुक्तांनी वाटाघाटीकरीता बोलावल्याची माहिती आहे. परंतु महापालिकेने उड्डाणपूल निर्मितीचे काम हे राज्य रस्ते विकास महामंडळाला सोपवावे, अशी मागणी खा. आनंदराव अडसूळ, आ. सुनील देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.एक दोन नव्हे तर चारवेळा निविदा प्रक्रिया राबविल्यानंतरही राजापेठ उड्डाणपूल निर्मितीचा मार्ग सुकर झाला नाही. गत आठवड्यात या पुलाच्या निर्मितीसाठी उघडण्यात आलेल्या निविदेत केवळ दोनच कंत्राटदारांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात नागपूर येथील खरे अ‍ॅन्ड तारकुंडे तर हैद्राबाद येथील नागार्जून कन्स्ट्रक्शन कंपनीचा समावेश होता. एकुण ४८ कोटी रुपये खर्चून राजापेठ उड्डाणपुलाची निर्मिती केली जाणार आहे. मात्र, आतापर्यत राज्यात एकाही महपालिकेने उड्डाणपूल निर्माण केला नसल्याने हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला सोपवावे, अशी जोरदार मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. चौथ्यांदा निविदा प्रक्रिया राबविल्यानंतरही उड्डाणपुलासाठी कंत्राटदारांकडून फार प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाने या पुलाची निविदा प्रक्रिया राबविण्यापुर्वीच राज्य शासनाकडे अतिरिक्त १८ कोटींची मागणी केली आहे. यापुर्वी राज्य शासनाने राजापेठ उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी १० कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. रेल्वे प्रशासनाचा वाटा हा १३ कोटी रुपये असून त्यांच्या हद्दीतील कामे हे रेल्वे प्रशासन करणार असल्याची माहिती आहे. या पुलाच्या निर्मितीसाठी यापुर्वी नागरिकांनी रेल्वे रोको, रास्ता रोको, चक्काजाम आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. राजापेठ रेल्वे क्रॉसींगवर होणारी वाहतूक कोंडी संपविण्यासाठी उड्डाणपूल निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. याकरीता आमदार, खासदार, नगरसेवक आदींनी पुढाकार घेतला. सातत्त्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा देखील करण्यात आला. दोन वेळा नकाशा बदलविण्याचा प्रसंग महापालिकेवर ओढावला. अखेर कसेतरी बडनेरा मार्ग, दस्तुरनगर मार्ग असा हा उड्डाणपूल निर्माण करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. मध्यतंरी निधीअभावी या पुलाच्या निविदा प्रक्रिया राबविणे अशक्य होते. राज्य शासनाने १० कोटींचे अनुदान दिल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्यिाचा मार्ग सुकर झाला. परंतु जास्त दराने निविदा प्राप्त झाल्याने महापालिका प्रशासनापुढे नवे संकट निर्माण झाले आहे. राज्य शासन, रेल्वे, महापालिका असे संयुक्तपणे निधीतून हा पूल निर्माण करण्याचे धोरण आहे. निधीची वाणवा आणि आमदार, खासदारांचा विरोध अशात राजापेठ उड्डाणपुलाची निर्मिती कशी होणार? हा गंभीर प्रश्न आहे.