शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

पावसाळा संपला, आता पडणारा अवकाळी; ३१ टक्क्यांची तूट कायम

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: October 1, 2023 19:49 IST

चांदूर बाजार वगळता, १३ तालुके पावसात माघारले

अमरावती: शासन स्तरावर जून ते सप्टेंबर यादरम्यानची चार महिने पावसाळा गृहित धरण्यात येतो. यादरम्यान सर्व तालुक्यांत २४ बाय ७ सर्व नियंत्रण कक्ष सुरू राहतात. त्यानुसार ३० सप्टेंबरपासून पावसाळा हा संपलेला आहे. जिल्ह्यात अद्याप ३१ टक्के पावसाची तूट कायम आहे. यामध्ये चांदूर बाजार वगळता, उर्वरित १३ तालुके पावसाच्या सरासरीत माघारले आहेत.

जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात ८६२ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ५९७.८ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ही ६९.४ टक्केवारी आहे. यामध्ये केवळ चांदूर बाजार तालुक्याने पावसाची सरासरी पार केलेली आहे. उर्वरित १३ तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली, तर पाच तालुक्यांत ५० ते ६० टक्क्यांच्या दरम्यान पाऊस झाल्याने पाणीटंचाईचे सावट कायम आहे. सोबतच जमिनीत आर्द्रता कमी असल्याने रब्बी हंगामाची चिंता वाढली आहे.र ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड राहिल्याने पिकांची वाढ खुंटून सोयाबीनचा बहर गळाला, तर मूग, उडीद पिके पावसाअभावी बाद झाले.तालुकानिहाय पाऊस (टक्केवारी)

धारणी ५८.१, चिखलदरा ८३.७, अमरावती ६६.७, भातकुली ६७.८, नांदगाव ८४.९, चांदूर रेल्वे ८४.४, तिवसा ९६.१, मोर्शी ८७.४, वरूड ९८.५, दर्यापूर ५४.८, अंजनगाव सुर्जी ६४.४, अचलपूर ५६.९, चांदूर बाजार ११०.८, धामणगाव ७६.८

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊस