शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

पावसाची ओढ, दुबार पेरणीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:09 IST

अमरावती : मान्सून आगमन वेळेआधी झाले असले तरी दोन आठवड्यांपासूण पावसाची उघडीप व सहा दिवसांपासून दडी आहे. त्यामुळे जमिनीत ...

अमरावती : मान्सून आगमन वेळेआधी झाले असले तरी दोन आठवड्यांपासूण पावसाची उघडीप व सहा दिवसांपासून दडी आहे. त्यामुळे जमिनीत आर्द्रता असलेल्या भागात पिके निघाली असली तरी कोवळी पिके माना टाकीत आहेत. याशिवाय काही ठिकाणी पेरले ते उगवलेच नाही, निघाले तेथे खांडण्या आहेत. अशीच स्थिती आणखी चार दिवस राहिल्यास जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट ओढावणार आहे.

जिल्ह्यात १० जूनला मान्सूनचे आगमन झाले तरी आतापर्यंत केवळ दोनच दिवस सार्वत्रिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यात २१६.७ मिमी पाऊस झालेला असला तरी तो विखुुरलेल्या स्वरूपात आहे. कृषी विभागाच्या आवाहनानुसार १०० मिमी पाऊस झाल्यानंतर पेरणी केली असली तरी हवामान विभागाचा अंदाज फोल ठरल्याने शेतकऱ्यांवर आता संकट ओढावले आहे. पेरणीची वेळ अद्यापही गेली नाही. सोयाबीनची पेरणी १५ जुलैपर्यंत करता येते. याशिवाय आंतरपीक घेतल्यास तेही उत्तमच, असे कृषी विभागाने सांगितले.

जिल्ह्यात यंदाच्या खरिपासाठी ६,९८,७९६ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. शुक्रवारपर्यंत ४,२६,६९२ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. ही ६१.०५ टक्केवारी आहे. यामध्ये सर्वाधिक १,७५१६९ हेक्टरमध्ये सोयाबीन, १,५०,८२७ हेक्टरमध्ये कपाशी, ३,९९२ धान, ५,५३७ ज्वार, ७८६२ मका, ७६,५८० तूर, २४२३ मूग, १४६६ उडीद, ८२ भुईमूग, २३७ हेक्टरमध्ये भाजीपाल्याची पिके आहेत. सर्वाधिक ७५ टक्के पेरणी धामणगाव तालुक्यात, तर सर्वांत कमी १६ टक्के पेरणी दर्यापूर तालुक्यात आहे. कोवळ्या पिकांवर आता खुरपडींचा हल्ला झालेला आहे. शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचनाची सुविधा आहे. त्यांच्याद्वारे पिकांना जगविण्यासाठी सिंचन सुरू केले असले तरी जिरायती क्षेत्रातील शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे आहे.

बॉक्स

तालुकानिहाय पाऊस आणि पेरणी (मिमी/हेक्टर)

तालुका पाऊस पेरणी

धारणी ९४.२ ३१,५९३

चिखलदरा २०६.३ १०,८२६

अमरावती १९७.५ ४२,२९१

भातकुली १९६.२ १५,३६०

नांदगाव खं. २७२.६ ५६,४००

चांदूर रेल्वे ३३४.५ २८,७९६

तिवसा २०२.६ ३५८९३

मोर्शी १७१.८ ४३,०७३

वरूड २०९.३ २७,८५०

दर्यापूर २४५ १२,२३३

अंजनगाव २६६.५ २३,७३५

अचलपूर १६१.२ २१,५५६

चांदूर बाजार १८२.२ २६,२४०

धामणगाव २६०.७ ५०,७९३

एकूण २१६.७ ४,२६,६१२

बॉक्स

सोयाबीनचे वाढले पेरणीक्षेत्र

सोयाबीनची सद्यस्थितीत १,७५,२५२ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. यंदा किमान तीन लाख हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक ४२,३७३ हेक्टरमध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पेरणी झालेली आहे. पावसाची स्थिती अशीच राहिल्यास ६० दिवसांचे मूग, उडिदाचे पीक बाद होऊन सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे.

बॉक्स

‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?’

पावसाचा पत्ता नसल्याने शहरासह ग्रामीण भागात आता धोंड्या निघत आहेत. शेतकरी देवाला साकडे घालत आहेत. महागडे बियाणे विकत घेऊन पेरणी केली. आता दुबारचे संकट आहे. बियाण्यांसाठी दुकानात रांगा लागल्या होत्या. अशीच गत रासायनिक खतांची असल्याने शेतकऱ्यांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.

कोट

दरवर्षीच परीक्षा

गतवर्षी सोयाबीन बियाणे बनावट असल्याने उगवलेच नव्हते. दुबार पेरणी झाल्यानंतर सवंगणीच्या हंगामात परतीच्या पावसाने हातचे पीक गेले. यंदाही तशीच गत होणार, असी शंका येत आहे.

- भूषण देशमुख, चांदूर बाजार

मागच्या वर्षी उशिरा पावसाने कपाशीची बोंडसड झाली व कपाशी उपटून टाकावी लागली. यावर्षी सोयाबीन लावले, तर खांडण्या पडल्या आहे. त्यात पाऊस गायब झाल्याने दुबारचे संकट आहे.

- गजानन पाटील, अमरावती

कोट

जमिनीत आद्रता असल्याने सध्या पिकांना धोका नाही. मात्र, अजून चार दिवस पाऊस न आल्यास काही भागात दुबार पेरणीची स्थिती ओढवेल. काही भागात पिकांना सिंचन सुरू आहे.

- विजय चवाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी