शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विभागात 76 टक्क्यांवर स्थिरावला पाऊस, 24 टक्क्यांची तूट : यवतमाळात अल्प पर्जन्यमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 17:02 IST

१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत विभागातील पाच जिल्ह्यांत ७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक पर्जन्यामानाच्या तुलनेत यंदा मान्सून अखेरीस २४ टक्के पावसाची तूट नोंदविली गेली असून त्यात यवतमाळात सर्वात कमी (६१.७ टक्के) पाऊस पडला आहे.

प्रदीप भाकरेअमरावती : १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत विभागातील पाच जिल्ह्यांत ७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक पर्जन्यामानाच्या तुलनेत यंदा मान्सून अखेरीस २४ टक्के पावसाची तूट नोंदविली गेली असून त्यात यवतमाळात सर्वात कमी (६१.७ टक्के) पाऊस पडला आहे.भारतात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत मान्सून कोसळतो. पावसाच्या या चार महिन्यांत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण ७७७.९ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. मात्र ३० सप्टेंबरला मान्सून संपुष्टात आल्यानंतर विभागात २४ टक्के कमी पाऊस नोंदविला गेला. अमरावतीमध्ये ८१४.५ मि.मी. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत ५४८.१ (६७.३ टक्के), अकोल्यात ६९७.३ मि.मी. च्या तुलनेत ५५० मि.मी. (७८.९ टक्के), यवतमाळच्या ९११.३ मि.मी.च्या वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत ५६२.१ (६१.७ टक्के), बुलडाण्यात ६६७.८ मि.मी.च्या तुलनेत सर्वाधिक ६६४.५ मि.मी. (९९.५ टक्के), तर वाशिम जिल्ह्यात ७९८.७ मि. मी.च्या तुलनेत ३० सप्टेंबरपर्यंत ५८१.३ मि.मी. अर्थात ७२.९ टक्के पाऊस नोंदविला गेला.अकोला आणि बुलडाणा या दोन जिल्ह्याचे प्रत्यक्ष पर्जन्यमान ७६ ते ९९.५ टक्के राहिले, तर उर्वरित अमरावती, यवतमाळ व वाशिममध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस पडला.यवतमाळात ३८.३ टक्के पावसाची तूटविभागाच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत तब्बल ३८.३ टक्के, अमरावतीमध्ये ३३ टक्के, अकोल्यात ११ टक्के, बुलडाण्यात ०.५ टक्के, तर वाशिममध्ये २७.१ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली.सर्वात कमी पावसाचे तालुकेअमरावतीमधील धारणीत ५८ टक्के, अकोल्यातील पातूरमध्ये ६४.६, यवतमाळातील कळंब तालुक्यात ३३.५ टक्के, बुलडाण्यातील शेगाव तालुक्यात ७५.८ टक्के आणि वाशिममधील मंगरुळपीर तालुक्यात ५२.४ टक्के इतका अल्प पाऊस पडला. पाचही जिल्ह्यातील ५६ तालुक्यांच्या तुलनेत या पाच तालुक्यात पर्जन्यमानाची सर्वाधिक तूट नोंदविली गेली.