शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विभागात 76 टक्क्यांवर स्थिरावला पाऊस, 24 टक्क्यांची तूट : यवतमाळात अल्प पर्जन्यमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2017 17:02 IST

१ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत विभागातील पाच जिल्ह्यांत ७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक पर्जन्यामानाच्या तुलनेत यंदा मान्सून अखेरीस २४ टक्के पावसाची तूट नोंदविली गेली असून त्यात यवतमाळात सर्वात कमी (६१.७ टक्के) पाऊस पडला आहे.

प्रदीप भाकरेअमरावती : १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत विभागातील पाच जिल्ह्यांत ७६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक पर्जन्यामानाच्या तुलनेत यंदा मान्सून अखेरीस २४ टक्के पावसाची तूट नोंदविली गेली असून त्यात यवतमाळात सर्वात कमी (६१.७ टक्के) पाऊस पडला आहे.भारतात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत मान्सून कोसळतो. पावसाच्या या चार महिन्यांत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण ७७७.९ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. मात्र ३० सप्टेंबरला मान्सून संपुष्टात आल्यानंतर विभागात २४ टक्के कमी पाऊस नोंदविला गेला. अमरावतीमध्ये ८१४.५ मि.मी. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत ५४८.१ (६७.३ टक्के), अकोल्यात ६९७.३ मि.मी. च्या तुलनेत ५५० मि.मी. (७८.९ टक्के), यवतमाळच्या ९११.३ मि.मी.च्या वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत ५६२.१ (६१.७ टक्के), बुलडाण्यात ६६७.८ मि.मी.च्या तुलनेत सर्वाधिक ६६४.५ मि.मी. (९९.५ टक्के), तर वाशिम जिल्ह्यात ७९८.७ मि. मी.च्या तुलनेत ३० सप्टेंबरपर्यंत ५८१.३ मि.मी. अर्थात ७२.९ टक्के पाऊस नोंदविला गेला.अकोला आणि बुलडाणा या दोन जिल्ह्याचे प्रत्यक्ष पर्जन्यमान ७६ ते ९९.५ टक्के राहिले, तर उर्वरित अमरावती, यवतमाळ व वाशिममध्ये ५० ते ७५ टक्के पाऊस पडला.यवतमाळात ३८.३ टक्के पावसाची तूटविभागाच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्यात वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत तब्बल ३८.३ टक्के, अमरावतीमध्ये ३३ टक्के, अकोल्यात ११ टक्के, बुलडाण्यात ०.५ टक्के, तर वाशिममध्ये २७.१ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली.सर्वात कमी पावसाचे तालुकेअमरावतीमधील धारणीत ५८ टक्के, अकोल्यातील पातूरमध्ये ६४.६, यवतमाळातील कळंब तालुक्यात ३३.५ टक्के, बुलडाण्यातील शेगाव तालुक्यात ७५.८ टक्के आणि वाशिममधील मंगरुळपीर तालुक्यात ५२.४ टक्के इतका अल्प पाऊस पडला. पाचही जिल्ह्यातील ५६ तालुक्यांच्या तुलनेत या पाच तालुक्यात पर्जन्यमानाची सर्वाधिक तूट नोंदविली गेली.