शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

मध्यप्रदेशात संततधार पावसामुळे पूर्णा धरणाचे सात दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 01:13 IST

तालुक्यातील विश्रोळी येथील पूर्णा धरणात गेल्या ४८ तासांपासून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यासह लगतच्या मध्यप्रदेशातील भैसदेही येथे ११२ मिमी, बापजाई येथे ७५ मिमी व सावलमेंढा येथे ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे येत्या २४ तासांत धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहिती पूर्णा प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्देदिलासा : धरणातून १५० घनमीटरने विसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यातील विश्रोळी येथील पूर्णा धरणात ८६.८१ टक्के जलसाठा गोळा झाल्याने धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले. धरणातून १५० घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मध्य प्रदेशात पाण्याचा जोर वाढल्याने विश्रोळी येथील पूर्णा धरणाच्या पाण्याचा पातळीत मोठी वाढ झाली आहे. धरणात शनिवारी ९२ टक्के पाणीसाठा गोळा झाल्याने धरणाचे सर्वच ९ दरवाजे उघडन्यात आले होते. मात्र, रात्री १२ वाजता हे दरवाजे पुन्हा बंद करून केवळ तीन दरवाजेच उघडे ठेवण्यात आले. मात्र, सकाळी पाण्याची आवक अधिक वाढल्याने सकाळी धरणाचे सात दरवाजे २५ सेमी उघडण्यात आले आहे. यामधून १५० घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होत असून, पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणातून वाहणारे हे पाणी देऊरवाडा, काजळी, ब्राम्हणवाडा थडी, थूगाव पिंप्री, निंभोरा, पिंपळखुटा, तोंगलापूर, कुरळपूर्णा या गावातून वाहणाऱ्या नदी-नाल्यांतून ओसंडून वाहत आहे.  तालुक्यातील विश्रोळी येथील पूर्णा धरणात गेल्या ४८ तासांपासून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यासह लगतच्या मध्यप्रदेशातील भैसदेही येथे ११२ मिमी, बापजाई येथे ७५ मिमी व सावलमेंढा येथे ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे येत्या २४ तासांत धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात येणार असल्याची माहिती पूर्णा प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली. चांदूर बाजार तालुक्यात संततधार पाऊस सुरूच आहे.तालुक्यातील विश्रोळी येथील धरणाच्या भागात २६ मिमी पाऊस झाला असल्याचे नोंद झाली आहे तसेच चांदूरबाजार मंडळात २६ मिमी, बेलोरा १८.२० मिमी, तळेगाव मोहना १५.०२ मिमी, आसेगाव पूर्णा १२.२० मिमी, ब्राम्हणवाडा थडी २५ मिमी, शिरजगाव कसबा १२ मिमी, करजगाव ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरी १६.७७ मिमी पाऊस झाला असून तालुक्यात एकूण ६७३.१७ मिमी पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी ४८२.६६ मिमी पाउस झाला होता. पूर्णा धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे अद्याप गावांना नुकसान झाले नाही, तर मध्य प्रदेशात डोंगरदºयातून धरणात पाणीसाठा वाढत आहे. धरणातून विसर्ग वाढल्यास नदी-नाल्यातील पाणीपातळी अचानक वाढू शकते. यामुळे नदीकाठी राहणाºया नागरिकांनी नदीमध्ये जाणे टाळावे. पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये, असे आवाहन तहसीलदार खोडके यांनी केले.

टॅग्स :Purna Riverपूर्णा नदीDamधरण