शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पावसामुळे कापूस भिजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 06:00 IST

अचलपूर तालुक्यात जवळपास १९ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यात कपाशीचे पीक चांगले असतानाच यावर्षीच्या सततच्या पावसाने शेतात फुटलेला कापूस ओलाच असताना वेचण्यात आला. त्यामुळे पहिल्यांदाच कापूस उन्हात वाळू घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

ठळक मुद्देतुरीचा फुलोर गळाला : संत्राही अडचणीत, शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यात १२ डिसेंबर रोजी रात्रीच्या अवकाळी पावसाने पुन्हा झाडावरील फुटलेला कापूस भिजला, तर तुरीचा फुलोर गळून पडला आहे. संत्रा उत्पादकही अडचणीत आला आहे.अचलपूर तालुक्यात जवळपास १९ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यात कपाशीचे पीक चांगले असतानाच यावर्षीच्या सततच्या पावसाने शेतात फुटलेला कापूस ओलाच असताना वेचण्यात आला. त्यामुळे पहिल्यांदाच कापूस उन्हात वाळू घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. घरासमोरील मोकळ्या जागेत किंवा घराच्या टिनावर हा कापूस शेतकऱ्यांनी वाळविला. पण, त्यातली आर्द्रता कमी होऊ शकली नाही. अखेर पडत्या किमतीत शेतकºयाने वजनात कटोती देत कापूस विकला. दरम्यान पाऊस थांबला.शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्यात. परंतु १२ डिसेंबर रोजी रात्री दरम्यान धो-धो पाऊस बरसला. यात शेतातील होता नव्हता तोही कापूस ओला झाला. याच पावसाने तुरीचाही बार गळाल्याने नुकसान झाले. तुरीचा फुलोर गळून पडला. ढगाळ वातावरणाने तुरीवर रोग, अळ्याही वाढल्या आहेत. ९ हजार ३८६ हेक्टरमधील तूर पिकाचे नुकसान झाले आहेआधीच सुलतानी संकटाने बेजार झालेल्या शेतकऱ्यांवर दोन महिन्यांपूर्वी परतीच्या पावसाने घाला घातला. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली. रासायनिक खते व फवाऱ्यांचा वापर करत शेतकºयांनी कपाशीला उभारी दिली. मात्र, काल परवाच्या पावसाने पुन्हा कापसाच्या वाता झाल्या असून, दरही पडले आहेत. आता केवळ रबीतील गहू व हरभरा या दोन पिकांवर लाखो शेतकऱ्यांची मदार आहे.

आंबिया बहरवर परिणामसततच्या पावसात संत्रा उत्पादक शेतकऱ्याला संत्राझाडांना तडन देता आली नाही. दरम्यान पाऊस थांबल्यामुळे संत्राबगीचे आंबिया बहारकरिता शेतकऱ्यांनी तडनवर सोडले. परंतु गुरूवारी पडलेल्या अवकाळी पावसाने परत जमीन भिजली. यात त्या तडनवर परिणाम झाल्यामुळे पुढे फुटणाऱ्या आंबिया बहारावरही त्याचा परिणाम बघायला मिळणार आहे. बगिचे पाहिजे त्या प्रमाणात फुटणार नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून गुरूवारचा पाऊस तालुक्यात सर्वदूर झाल्याची नोंद आहे.

टॅग्स :cottonकापूसRainपाऊस