शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

पावसामुळे कापूस भिजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 06:00 IST

अचलपूर तालुक्यात जवळपास १९ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यात कपाशीचे पीक चांगले असतानाच यावर्षीच्या सततच्या पावसाने शेतात फुटलेला कापूस ओलाच असताना वेचण्यात आला. त्यामुळे पहिल्यांदाच कापूस उन्हात वाळू घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.

ठळक मुद्देतुरीचा फुलोर गळाला : संत्राही अडचणीत, शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यात १२ डिसेंबर रोजी रात्रीच्या अवकाळी पावसाने पुन्हा झाडावरील फुटलेला कापूस भिजला, तर तुरीचा फुलोर गळून पडला आहे. संत्रा उत्पादकही अडचणीत आला आहे.अचलपूर तालुक्यात जवळपास १९ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यात कपाशीचे पीक चांगले असतानाच यावर्षीच्या सततच्या पावसाने शेतात फुटलेला कापूस ओलाच असताना वेचण्यात आला. त्यामुळे पहिल्यांदाच कापूस उन्हात वाळू घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. घरासमोरील मोकळ्या जागेत किंवा घराच्या टिनावर हा कापूस शेतकऱ्यांनी वाळविला. पण, त्यातली आर्द्रता कमी होऊ शकली नाही. अखेर पडत्या किमतीत शेतकºयाने वजनात कटोती देत कापूस विकला. दरम्यान पाऊस थांबला.शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्यात. परंतु १२ डिसेंबर रोजी रात्री दरम्यान धो-धो पाऊस बरसला. यात शेतातील होता नव्हता तोही कापूस ओला झाला. याच पावसाने तुरीचाही बार गळाल्याने नुकसान झाले. तुरीचा फुलोर गळून पडला. ढगाळ वातावरणाने तुरीवर रोग, अळ्याही वाढल्या आहेत. ९ हजार ३८६ हेक्टरमधील तूर पिकाचे नुकसान झाले आहेआधीच सुलतानी संकटाने बेजार झालेल्या शेतकऱ्यांवर दोन महिन्यांपूर्वी परतीच्या पावसाने घाला घातला. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली. रासायनिक खते व फवाऱ्यांचा वापर करत शेतकºयांनी कपाशीला उभारी दिली. मात्र, काल परवाच्या पावसाने पुन्हा कापसाच्या वाता झाल्या असून, दरही पडले आहेत. आता केवळ रबीतील गहू व हरभरा या दोन पिकांवर लाखो शेतकऱ्यांची मदार आहे.

आंबिया बहरवर परिणामसततच्या पावसात संत्रा उत्पादक शेतकऱ्याला संत्राझाडांना तडन देता आली नाही. दरम्यान पाऊस थांबल्यामुळे संत्राबगीचे आंबिया बहारकरिता शेतकऱ्यांनी तडनवर सोडले. परंतु गुरूवारी पडलेल्या अवकाळी पावसाने परत जमीन भिजली. यात त्या तडनवर परिणाम झाल्यामुळे पुढे फुटणाऱ्या आंबिया बहारावरही त्याचा परिणाम बघायला मिळणार आहे. बगिचे पाहिजे त्या प्रमाणात फुटणार नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून गुरूवारचा पाऊस तालुक्यात सर्वदूर झाल्याची नोंद आहे.

टॅग्स :cottonकापूसRainपाऊस