शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

पावसाने दिलासा पण उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 01:25 IST

जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या झडसदृश स्थितीमुळे वाढ खुंटलेल्या पिकांना दिलासा मिळाला तरी जुलैमधील १७ दिवसांच्या ओढीमुळे किमान एक लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट कायम आहे.

ठळक मुद्देदुबार पेरणीचे संकट कायम : तिसऱ्या दिवशी सार्वत्रिक ३१.६ मिमी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या झडसदृश स्थितीमुळे वाढ खुंटलेल्या पिकांना दिलासा मिळाला तरी जुलैमधील १७ दिवसांच्या ओढीमुळे किमान एक लाख हेक्टरवर दुबार पेरणीचे संकट कायम आहे. उशिरा पावसामुळे अल्पावधीतील पिकांच्या सरासरी उत्पादनात मोठी घट येणार आहे.जिल्ह्यात सद्यस्थितीत सहा लाख ६८,८८६ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. ही ९१ टक्केवारी आहे. जिल्ह्यात अद्यापही ७० हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी बाकी आहे. मात्र, पेरणी झालेल्या झालेल्या क्षेत्रामधील किमान एक लाख हेक्टरमधील पिकांना मोड आल्यामुळे दुबार पेरणीचे संकट कायम आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरसरी ३१.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये चिखलदरा तालुक्यात सर्वाधिक ५७.५ मिमी तर मोर्शी तालुक्यात ४७.७ मिमी पावसाची नोंद झाली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार, अमरावती तालुक्यात २६ मिमी, भातकुली २३.०१, नांदगाव खंडेश्वर ३१, चांदूर रेल्वे २४.०१, धामणगाव रेल्वे ३१, तिवसा ३६.७, मोर्शी ४७.७, वरूड ३९.९, अचलपूर २६.५, चांदूरबाजार ३९.६, दर्यापूर २४.८, अंजनगाव सुर्जी १२.५, धारणी २२.०३ व चिखलदरा तालुक्यात ५७.५ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात चुरणी महसूल मंंडळात ८१.०२, तर अंबाडा मंडळात ७१.०४ मिमी पावसाने अतिवृष्टीची नोंद झाली आहे.जिल्ह्यात सद्यस्थितीत सर्वाधिक २,६६,११६ हेक्टर कपाशी, २,४३,२९३ हेक्टरमध्ये सोयाबीन, धान ५,६०३ हेक्टर, ज्वारी १३,०६५ हेक्टर, १,०६,४९५ हेक्टरमध्ये तूर, १२,४२३ हेक्टरमध्ये मूग, ५,६३४ हेक्टरमध्ये उडीदाची पेरणी झालेली आहे.आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचे संकेतहवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै ते १ आॅगस्ट दरम्यान एक कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यात आहे. त्यामुळे ३१ तारखेनंतर पुन्हा पाऊस वाढण्याची शक्यता आहे. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात भरपूर प्रमाणात पाऊस राहील तसेच २९ व ३० रोजी पूर्व विदर्भात सार्वत्रिक, तर पश्चिम विदर्भात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे.दमयंती, माडू नदीला पूरमोर्शी - तालुक्यातील दमयंती, नळा, माडू नद्यांना संततधार पावसाने पूर आला आहे. तालुक्यात ७२ तासांपासून पाऊस सुरू असल्याने माडू नदीला ३० वर्षांनंतर पहिल्यांदाच पूर आला.

टॅग्स :Rainपाऊस