शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रबीचे उच्चांकी ३४ टक्के कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:33 IST

अमरावती : जिल्ह्यात दोन लाखांपर्यंत थकबाकीदारांची ९०० कोटीपर्यंत कर्जमाफी झाल्याने प्रथमच यंदा रबीचे उच्चांकी ३४ टक्क्यांपर्यंत कर्जवाटप होत आहे. ...

अमरावती : जिल्ह्यात दोन लाखांपर्यंत थकबाकीदारांची ९०० कोटीपर्यंत कर्जमाफी झाल्याने प्रथमच यंदा रबीचे उच्चांकी ३४ टक्क्यांपर्यंत कर्जवाटप होत आहे. मात्र, यात जिल्हा बँकेचे रबी कर्जवाटप निरंक असल्याचा अग्रणी बँकेचा अहवाल आहे.

यंदा खरिपाचे विक्रमी पीक कर्जवाटप झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यांपासून रबीचे पीक कर्जवाटपास सुरुवात झाली. यामध्ये जिल्ह्यातील बँकांना ४३० कोटींचे लक्ष्यांक दिले आहे. त्याच्या तुलनेत जिल्ह्यातील बँकांनी सद्यस्थितीत १५ हजार ४७१ खातेदारांना १४७.५० कोटींचे कर्जवाटप केले आहे. ही ३४ टक्केवारी आहे. खरिपासाठी १७२० कोटींचे लक्ष्यांक असताना १,२३,७८१ शेतकरी खातेदारांना १०७३.९४ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही ६२ टक्केवारी आहे व मागील सहा वर्षांत पहिल्यांदा उच्चांकी कर्जवाटप करण्यात आले आहे.

जिल्हा अग्रणी बँकेच्या अहवालानुसार अलाहाबाद बँकेने २.२९ कोटी, आंध्रा बँक ५२ लाख, बँक ऑफ बडोदा २.९३ कोटी, बँक ऑफ इंडिया ५.०२ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र ३१.३९ कोटी, कॅनरा बँक १.३४ कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ३०.०६ कोटी, कार्पोरेशन बँक १ लाख, इंडियन बँक १६ लाख, इंडियन ओव्हरसीज १.२१ कोटी, पंजाब नॅशनल १.३१ कोटी, एसबीआय ५१.६० कोटी, युको ४३ लाख, युनियन बँक ३.२५ कोटी, ॲक्सीस ३.८७ कोटी, आयडीबीआय ७७ लाख, एचडीएफसी ५.९० कोटी, आयसीआयसीआय ४.२२ कोटी, विदर्भ कोकण १.२३ कोटी रुपयांचे रबी कर्जवाटप करण्यात आले आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील बँकांचे वाटप

यंदाच्या रबी हंगामासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना २९४.४० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक देण्यात आले होते. त्याच्या तुलनेत १५,४०० शेतकरी खातेदारांना १४६.२७ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही टक्केवारी ५० आहे. ग्रामीण बँकांना ३.६० कोटींच्या कर्जवाटापाचे लक्ष्यांक असताना ७१ शेतकऱ्यांना १.२३ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही टक्केवारी ३४ आहे. याशिवाय जिल्हा बँकेला १३२ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना वाटप निरंक आहे.