शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

रबीचे उच्चांकी ३४ टक्के कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:33 IST

अमरावती : जिल्ह्यात दोन लाखांपर्यंत थकबाकीदारांची ९०० कोटीपर्यंत कर्जमाफी झाल्याने प्रथमच यंदा रबीचे उच्चांकी ३४ टक्क्यांपर्यंत कर्जवाटप होत आहे. ...

अमरावती : जिल्ह्यात दोन लाखांपर्यंत थकबाकीदारांची ९०० कोटीपर्यंत कर्जमाफी झाल्याने प्रथमच यंदा रबीचे उच्चांकी ३४ टक्क्यांपर्यंत कर्जवाटप होत आहे. मात्र, यात जिल्हा बँकेचे रबी कर्जवाटप निरंक असल्याचा अग्रणी बँकेचा अहवाल आहे.

यंदा खरिपाचे विक्रमी पीक कर्जवाटप झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यांपासून रबीचे पीक कर्जवाटपास सुरुवात झाली. यामध्ये जिल्ह्यातील बँकांना ४३० कोटींचे लक्ष्यांक दिले आहे. त्याच्या तुलनेत जिल्ह्यातील बँकांनी सद्यस्थितीत १५ हजार ४७१ खातेदारांना १४७.५० कोटींचे कर्जवाटप केले आहे. ही ३४ टक्केवारी आहे. खरिपासाठी १७२० कोटींचे लक्ष्यांक असताना १,२३,७८१ शेतकरी खातेदारांना १०७३.९४ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही ६२ टक्केवारी आहे व मागील सहा वर्षांत पहिल्यांदा उच्चांकी कर्जवाटप करण्यात आले आहे.

जिल्हा अग्रणी बँकेच्या अहवालानुसार अलाहाबाद बँकेने २.२९ कोटी, आंध्रा बँक ५२ लाख, बँक ऑफ बडोदा २.९३ कोटी, बँक ऑफ इंडिया ५.०२ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र ३१.३९ कोटी, कॅनरा बँक १.३४ कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया ३०.०६ कोटी, कार्पोरेशन बँक १ लाख, इंडियन बँक १६ लाख, इंडियन ओव्हरसीज १.२१ कोटी, पंजाब नॅशनल १.३१ कोटी, एसबीआय ५१.६० कोटी, युको ४३ लाख, युनियन बँक ३.२५ कोटी, ॲक्सीस ३.८७ कोटी, आयडीबीआय ७७ लाख, एचडीएफसी ५.९० कोटी, आयसीआयसीआय ४.२२ कोटी, विदर्भ कोकण १.२३ कोटी रुपयांचे रबी कर्जवाटप करण्यात आले आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील बँकांचे वाटप

यंदाच्या रबी हंगामासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना २९४.४० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक देण्यात आले होते. त्याच्या तुलनेत १५,४०० शेतकरी खातेदारांना १४६.२७ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही टक्केवारी ५० आहे. ग्रामीण बँकांना ३.६० कोटींच्या कर्जवाटापाचे लक्ष्यांक असताना ७१ शेतकऱ्यांना १.२३ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. ही टक्केवारी ३४ आहे. याशिवाय जिल्हा बँकेला १३२ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना वाटप निरंक आहे.