शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढली

By admin | Updated: July 16, 2014 23:51 IST

खेडेगावातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने अमरावतीसह राज्यभरातील जिल्हा

अमरावती : खेडेगावातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने अमरावतीसह राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या सुमारे ६१ हजार शाळांसाठी सुरु केलेल्या मूल्यांकनासाठी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. पहिल्याच वर्षी ‘अ’ वर्गातील शाळांची संख्या ५४१ वरुन १५९९ एवढी झाली असून ‘ब’ वर्गातील शाळांची संख्या ६ हजार २४८ वरुन १४ हजार ९१८ पर्यंत वाढ झाली आहे.ग्रामीण भागातील शाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या अमरावती जिल्ह्यातील १ हजार ६०२ सहीत राज्यातील ६० हजारांहून अधिक शाळांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय २०१२-१३ मध्ये घेतला. त्यासाठी शाळात भौतिक आणि शैक्षणिक सुविधा आहेत का, शाळेच्या खोल्या स्वच्छता गृहांची स्थिती, शाळेला मैदान आहे की नाही, शिक्षकांचे परीक्षण गावकऱ्यांचा सहभाग, विद्यार्थ्यांची उपस्थिती यांवर शाळांची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार २०१२-१३ आणि २०१३-१४ मध्ये मुल्यांकन करण्यात आले. शाळांना अ, ब, क, ड, ई अशा प्रकारच्या श्रेणी देण्यात आल्या.या श्रेणीनुसार पहिल्या वर्षी ‘अ’ वर्गातील शाळांची संख्या ५४१ होती ती दुसऱ्या वर्षी १ हजार ५९९ वर पोहचली. ‘ब’ वर्गातील शाळांची संख्या पहिल्या वर्षी ६ हजार २४८ वर होती, ती दुसऱ्या वर्षी १४ हजार ९१८ वर पोहचली आहे.एकीकडे ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील शाळांची संख्या वाढत असताना दुसरीकडे क, ड आणि ई वर्गातील श्रेणी घटून त्यातील बहुसंख्य शाळा ‘अ’ आणि ‘ब’ वर्गात समाविष्ट होवू लागल्या आहेत. पहिल्या वर्षी ‘क’ वर्गातील शाळांची संख्या ४५ हजार १०१ एवढी होती. दुसऱ्या वर्षी ही संख्या ४० हजार ७०८ ने घटली आहे.