शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढली

By admin | Updated: July 16, 2014 23:51 IST

खेडेगावातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने अमरावतीसह राज्यभरातील जिल्हा

अमरावती : खेडेगावातील विद्यार्थ्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने अमरावतीसह राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या सुमारे ६१ हजार शाळांसाठी सुरु केलेल्या मूल्यांकनासाठी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. पहिल्याच वर्षी ‘अ’ वर्गातील शाळांची संख्या ५४१ वरुन १५९९ एवढी झाली असून ‘ब’ वर्गातील शाळांची संख्या ६ हजार २४८ वरुन १४ हजार ९१८ पर्यंत वाढ झाली आहे.ग्रामीण भागातील शाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या अमरावती जिल्ह्यातील १ हजार ६०२ सहीत राज्यातील ६० हजारांहून अधिक शाळांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय २०१२-१३ मध्ये घेतला. त्यासाठी शाळात भौतिक आणि शैक्षणिक सुविधा आहेत का, शाळेच्या खोल्या स्वच्छता गृहांची स्थिती, शाळेला मैदान आहे की नाही, शिक्षकांचे परीक्षण गावकऱ्यांचा सहभाग, विद्यार्थ्यांची उपस्थिती यांवर शाळांची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार २०१२-१३ आणि २०१३-१४ मध्ये मुल्यांकन करण्यात आले. शाळांना अ, ब, क, ड, ई अशा प्रकारच्या श्रेणी देण्यात आल्या.या श्रेणीनुसार पहिल्या वर्षी ‘अ’ वर्गातील शाळांची संख्या ५४१ होती ती दुसऱ्या वर्षी १ हजार ५९९ वर पोहचली. ‘ब’ वर्गातील शाळांची संख्या पहिल्या वर्षी ६ हजार २४८ वर होती, ती दुसऱ्या वर्षी १४ हजार ९१८ वर पोहचली आहे.एकीकडे ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील शाळांची संख्या वाढत असताना दुसरीकडे क, ड आणि ई वर्गातील श्रेणी घटून त्यातील बहुसंख्य शाळा ‘अ’ आणि ‘ब’ वर्गात समाविष्ट होवू लागल्या आहेत. पहिल्या वर्षी ‘क’ वर्गातील शाळांची संख्या ४५ हजार १०१ एवढी होती. दुसऱ्या वर्षी ही संख्या ४० हजार ७०८ ने घटली आहे.