शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रुग्णवाहिकेला ‘दे धक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 01:54 IST

भातकुली तालुक्यातील आष्टीसह टाकरखेडा, साऊर, रामा, खारतळेगाव या मोठ्या गावांसह ३७ गावे येतात. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना गावांमधून आणावे लागते तसेच काही रुग्णांना अमरावती येथेदेखील पाठविले जाते. याकरिता एक रुग्णवाहिका आरोग्य केंद्राला देण्यात आली. रुग्णवाहिकेला आता १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. तथापि, तीन ते चार वर्षांपासून रुग्णवाहिका नादुरुस्त आहे.

ठळक मुद्देरुग्णांच्या जिवाशी खेळ : आष्टीत आरोग्यसेवेचा खेळखंडोबा

लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेडा संभू : नजीकच्या आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सेवेत असलेली रुग्णवाहिका ही ‘धक्कागाडी’ झाली आहे. ती केव्हाही बंद पडते आणि त्यानंतर चार-पाच जणांनी ढकलल्याशिवाय सुरूच होत नाही. यामुळे आरोग्यसेवेचा खेळखंडोबा झाला आहे.भातकुली तालुक्यातील आष्टीसह टाकरखेडा, साऊर, रामा, खारतळेगाव या मोठ्या गावांसह ३७ गावे येतात. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना गावांमधून आणावे लागते तसेच काही रुग्णांना अमरावती येथेदेखील पाठविले जाते. याकरिता एक रुग्णवाहिका आरोग्य केंद्राला देण्यात आली. रुग्णवाहिकेला आता १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. तथापि, तीन ते चार वर्षांपासून रुग्णवाहिका नादुरुस्त आहे. तिने रुग्णांना अनेकदा दगा दिला. बहुतेक वेळा रुग्ण असतानाच ही रुग्णवाहिका बंद पडल्याने वाहनचालकाला खाजगी वाहनाने रुग्णांना न्यावे लागले. कित्येकदा रुग्णवाहिका धक्का देऊन सुरू करावी लागते. आरोग्य विभागात रुग्णवाहिका दुरुस्त आणि पूर्णत: सज्ज असणे आवश्यक आहे.आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आजवर कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर रुग्णवाहिका बदलून देण्याबाबत आरोग्य विभागाकडे वारंवार गाºहाणे मांडले आहे. परंतु, त्यांची दखल घेतली गेली नाही. आरोग्य विभाग या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.दोन दिवसांपूर्वी धारणी तालुक्यात एक रूग्णवाहिका बंद पडून एका तीन महिन्यांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू झाला. पूर्णा नगरलाही तोच प्रकार घडला त्यामुळे आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राला एखाद्या रूग्णाच्या मृत्यूची प्रतिक्षा आहे का ? असा संतापजनक सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोलमडली असतांना रूग्णवाहिकेसारखी आपातकालीन सेवा नादुरूस्त होत असल्याने रूग्णांची मोठ्या प्रमाणात आबाळ होत आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Healthआरोग्य