शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रुग्णवाहिकेला ‘दे धक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 01:54 IST

भातकुली तालुक्यातील आष्टीसह टाकरखेडा, साऊर, रामा, खारतळेगाव या मोठ्या गावांसह ३७ गावे येतात. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना गावांमधून आणावे लागते तसेच काही रुग्णांना अमरावती येथेदेखील पाठविले जाते. याकरिता एक रुग्णवाहिका आरोग्य केंद्राला देण्यात आली. रुग्णवाहिकेला आता १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. तथापि, तीन ते चार वर्षांपासून रुग्णवाहिका नादुरुस्त आहे.

ठळक मुद्देरुग्णांच्या जिवाशी खेळ : आष्टीत आरोग्यसेवेचा खेळखंडोबा

लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेडा संभू : नजीकच्या आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सेवेत असलेली रुग्णवाहिका ही ‘धक्कागाडी’ झाली आहे. ती केव्हाही बंद पडते आणि त्यानंतर चार-पाच जणांनी ढकलल्याशिवाय सुरूच होत नाही. यामुळे आरोग्यसेवेचा खेळखंडोबा झाला आहे.भातकुली तालुक्यातील आष्टीसह टाकरखेडा, साऊर, रामा, खारतळेगाव या मोठ्या गावांसह ३७ गावे येतात. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना गावांमधून आणावे लागते तसेच काही रुग्णांना अमरावती येथेदेखील पाठविले जाते. याकरिता एक रुग्णवाहिका आरोग्य केंद्राला देण्यात आली. रुग्णवाहिकेला आता १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. तथापि, तीन ते चार वर्षांपासून रुग्णवाहिका नादुरुस्त आहे. तिने रुग्णांना अनेकदा दगा दिला. बहुतेक वेळा रुग्ण असतानाच ही रुग्णवाहिका बंद पडल्याने वाहनचालकाला खाजगी वाहनाने रुग्णांना न्यावे लागले. कित्येकदा रुग्णवाहिका धक्का देऊन सुरू करावी लागते. आरोग्य विभागात रुग्णवाहिका दुरुस्त आणि पूर्णत: सज्ज असणे आवश्यक आहे.आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आजवर कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर रुग्णवाहिका बदलून देण्याबाबत आरोग्य विभागाकडे वारंवार गाºहाणे मांडले आहे. परंतु, त्यांची दखल घेतली गेली नाही. आरोग्य विभाग या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.दोन दिवसांपूर्वी धारणी तालुक्यात एक रूग्णवाहिका बंद पडून एका तीन महिन्यांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू झाला. पूर्णा नगरलाही तोच प्रकार घडला त्यामुळे आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राला एखाद्या रूग्णाच्या मृत्यूची प्रतिक्षा आहे का ? असा संतापजनक सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोलमडली असतांना रूग्णवाहिकेसारखी आपातकालीन सेवा नादुरूस्त होत असल्याने रूग्णांची मोठ्या प्रमाणात आबाळ होत आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Healthआरोग्य