शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

रुग्णवाहिकेला ‘दे धक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 01:54 IST

भातकुली तालुक्यातील आष्टीसह टाकरखेडा, साऊर, रामा, खारतळेगाव या मोठ्या गावांसह ३७ गावे येतात. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना गावांमधून आणावे लागते तसेच काही रुग्णांना अमरावती येथेदेखील पाठविले जाते. याकरिता एक रुग्णवाहिका आरोग्य केंद्राला देण्यात आली. रुग्णवाहिकेला आता १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. तथापि, तीन ते चार वर्षांपासून रुग्णवाहिका नादुरुस्त आहे.

ठळक मुद्देरुग्णांच्या जिवाशी खेळ : आष्टीत आरोग्यसेवेचा खेळखंडोबा

लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेडा संभू : नजीकच्या आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सेवेत असलेली रुग्णवाहिका ही ‘धक्कागाडी’ झाली आहे. ती केव्हाही बंद पडते आणि त्यानंतर चार-पाच जणांनी ढकलल्याशिवाय सुरूच होत नाही. यामुळे आरोग्यसेवेचा खेळखंडोबा झाला आहे.भातकुली तालुक्यातील आष्टीसह टाकरखेडा, साऊर, रामा, खारतळेगाव या मोठ्या गावांसह ३७ गावे येतात. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांना गावांमधून आणावे लागते तसेच काही रुग्णांना अमरावती येथेदेखील पाठविले जाते. याकरिता एक रुग्णवाहिका आरोग्य केंद्राला देण्यात आली. रुग्णवाहिकेला आता १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. तथापि, तीन ते चार वर्षांपासून रुग्णवाहिका नादुरुस्त आहे. तिने रुग्णांना अनेकदा दगा दिला. बहुतेक वेळा रुग्ण असतानाच ही रुग्णवाहिका बंद पडल्याने वाहनचालकाला खाजगी वाहनाने रुग्णांना न्यावे लागले. कित्येकदा रुग्णवाहिका धक्का देऊन सुरू करावी लागते. आरोग्य विभागात रुग्णवाहिका दुरुस्त आणि पूर्णत: सज्ज असणे आवश्यक आहे.आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आजवर कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर रुग्णवाहिका बदलून देण्याबाबत आरोग्य विभागाकडे वारंवार गाºहाणे मांडले आहे. परंतु, त्यांची दखल घेतली गेली नाही. आरोग्य विभाग या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.दोन दिवसांपूर्वी धारणी तालुक्यात एक रूग्णवाहिका बंद पडून एका तीन महिन्यांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू झाला. पूर्णा नगरलाही तोच प्रकार घडला त्यामुळे आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राला एखाद्या रूग्णाच्या मृत्यूची प्रतिक्षा आहे का ? असा संतापजनक सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोलमडली असतांना रूग्णवाहिकेसारखी आपातकालीन सेवा नादुरूस्त होत असल्याने रूग्णांची मोठ्या प्रमाणात आबाळ होत आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Healthआरोग्य